शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

विद्यापीठ नामांतराच्या नावगुणानं चमत्कार दाखविला अन् नांदेडकरांना स्वतंत्र विद्यापीठ मिळालं

By विजय सरवदे | Published: January 14, 2023 8:01 PM

नामांतराच्या नावगुणानं आपला चमत्कार दाखविला अन् नांदेडकरांना स्वतंत्र विद्यापीठ मिळालं व तेही हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावाच्या विद्यापीठाच्या रूपात.

नामांतर लढ्याला प्रेरणादायी इतिहास आहे. दलित पँथरसह अनेक पुरोगामी संघटना आणि कार्यकर्ते हा लढा नेटाने रेटून नेत होते. दुसऱ्या बाजूने विरोधकही गप्प नव्हते. तेही दंड थोपटून नामांतराला कडाडून विरोध करीत होते. या लढ्यात मराठवाड्यातील दलितांची हजारो घरे बेचिराख झाली, अनेक भीमसैनिक शहीद झाले. त्यांचे स्मरण आणि तब्बल १७ वर्षे चाललेल्या या लढ्याचा विजयोत्सव म्हणून दरवर्षी दि. १४ जानेवारीला विद्यापीठ नामविस्तार वर्धापन उत्साहाने साजरा केला जातो. यानिमित्ताने नामांतर लढ्यात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या मान्यवरांच्या काही आठवणी...

विद्यापीठ नामांतर लढ्याचा पायगुणडॉ. सुधीर गव्हाणे यांनी सांगितले की, नामांतर लढा ‘याची देही, याची डोळा’ पाहण्याची नि अनुभवण्याची संधी मला १९७८ ते १९९४ दरम्यान मला मिळाली. याविषयावर व इतिहासावर संशोधनपर ग्रंथ लिहिण्याचं कार्यही मला करता आलं. नामांतराची बाजू आग्रहपूर्वक मांडणारा मी लेखक-पत्रकार होतो. सामाजिक न्याय नि समता चळवळीचा मी एक कडवा समर्थक होतो नि आजही आहे. ‘नामांतर लढा: एक शोधयात्रा’ या पुस्तकाच्या लेखनासाठी मी महिनाभर अत्याचारग्रस्त गावात जाऊन रिपोर्टाज लिहिले. मी अवघा वीस-बावीस वर्षांचा होतो. जातीपाती पलीकडे जाऊन सत्यदर्शी पत्रकारिता लेखन मी करू शकलो. दलितांची घरे जाळली गेली, कुणाची हत्या झाली, दलितद्वेषाची लाट निर्माण झाली, दलित व सवर्ण संघर्ष विकोपाला पोहोचला होता. बहुजनांमध्ये आपसात लढाई लावली गेली. वर्तमानपत्र माध्यमांची उपयोग भल्याभल्या पत्रकार नि संपादकांनी आगीत आपल्या शब्दांनी तेल ओतायचं काम केलं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या प्रकांड पंडिताचा अभिमान वाटायच्या ऐवजी द्वेषमूलकतेचं ते माध्यम केलं गेलं. उच्चवर्णीय स्वातंत्र्य सैनिकांनी तर आत्मदहनाची जाहीर धमकी दिली. विद्यापीठाचं नामांतर झाल्यास या विद्यापीठात बुद्धवंदना म्हणावी लागेल, पदवीवर डॉ. आंबेडकर व तथागत गौतम बुद्धाचे फोटो छापले जातील, सवर्ण समाजाची मुलं या विद्यापीठातून प्रवेश घेणार नाहीत व घेतला तर प्रवेश रद्द करतील, अशा वदंता जाणीवपूर्वक छापल्या व पसरविल्या गेल्या. नामांतरीत विद्यापीठाचं गेट रात्रीतून उडविलं जाऊन जमीनदोस्त केलं जाईल, अशा अफवाही पसरविल्या गेल्या. 

दलित नि सवर्ण या दोन समाजांत विषारी वातावरण केलं गेलं. परंतु , गेल्या तीन दशकांत यापैकी काहीही घडलं नाही. दोन्ही समाजांनी समंजसपणा व शहाणपणा दाखविला नि असं काही घडलं नाही. मराठवाडा प्रदेशाच्या अस्मितेचा बाऊ केला गेला, जणू डॉ. आंबेडकर यांचं नाव दिल्यानं मराठवाडा प्रदेशाची अस्मिता चुरडली जाणार होती. खरे तर आग लावणारे हा विषय धगधगत ठेवू इच्छित होते. पण, अशावेळी समाजाचं शहाणपण उच्च पातळीचंच राहिलं. असत्याला पाय नि चेहरा नसतो हेच या आगलावी वृत्तीच्या व्यक्तींना समजायला लागलं नि नवं काही असं घडलं तर समाज शास्वत राहिलेला आपण पाहिलं आहे. नामांतराच्या नावगुणानं आपला चमत्कार दाखविला अन् नांदेडकरांना स्वतंत्र विद्यापीठ मिळालं व तेही हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावाच्या विद्यापीठाच्या रूपात. मराठवाडा प्रदेशातील हे नवं विद्यापीठ स्वामीजींचं मोठं स्मारक ठरलं. हा नामांतराचा पायगुणच होता हे कसं नाकारता येईल?

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादswami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडAurangabadऔरंगाबाद