शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

जेवढा विलंब, तेवढे मराठवाड्यात येईल कमी पाणी; ३१ ऑक्टोबरपर्यंत समन्यायी पाणीवाटप गरजेचे

By विकास राऊत | Updated: October 26, 2023 12:33 IST

३१ ऑक्टोबरपर्यंत निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही, तर न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान ठरण्याची चिन्हे आहेत.

छत्रपती संभाजीनगर : नाशिक- अहमदनगर जिल्ह्यांतील धरणसमूहांतून जायकवाडीसाठी ११ ते १३ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय अजून झालेला नाही. पाणी सोडण्यास जेवढा विलंब होईल, तेवढे पाणी कमी येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. २३ सप्टेंबर २०१६ रोजी दिलेल्या निर्णयानुसार ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात म्हणजेच ३१ ऑक्टोबरपर्यंत समन्यायी पाणीवाटप होणे गरजेचे आहे. सदरील निर्णयाची अंमलबजावणी न्यायालयाने गाेदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळावर साेपविली आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही, तर न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान ठरण्याची चिन्हे आहेत.

यंदा मराठवाड्यात १५ टक्के पावसाची तूट आहे. या विभागाची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणात सध्या ४७ टक्के जलसाठा आहे. मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यांसाठी संजीवनी असलेल्या जायकवाडी धरणात १५ ऑक्टोबरपर्यंत ४७.२३ टक्के जलसाठा होता. गतवर्षीच्या उपयुक्त पाणीसाठ्यापेक्षा तो ५३ टक्के कमी आहे. त्यामुळे या जिल्ह्यांतील शेतीसिंचनावर परिणाम होईल, शिवाय पिण्याच्या पाण्याची टंचाई होणे शक्य आहे.तातडीने पाणी सोडावे...

न्यायालयाच्या निर्णयानुसार ऊर्ध्व जायकवाडी प्रकल्पातून तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी भगीरथ पाणी परिषदेचे अध्यक्ष अभिजित धानोरकर यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांकडे बुधवारी निवेदनाद्वारे केली आहे. २३ सप्टेंबर २०१६ रोजी दिलेल्या निर्णयानुसार ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात म्हणजेच ३१ ऑक्टोबरपर्यंत समन्यायी पाणीवाटप होणे गरजेचे आहे. सदरील निर्णयाची अंमलबजावणी न्यायालयाने महामंडळावर साेपविली आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही, तर न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान ठरेल. येथून मागे जायकवाडीत तीनदा पाणी सोडले; पण ते कमी प्रमाणात आले, असे धानोरकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

विलंबामुळे कमी आले होते पाणी...वर्ष........ प्रस्तावित पाणी....... प्रत्यक्षात आलेले पाणी२०१४....७.८९ टीएमसी........७.१० टीएमसी२०१५....१२.८४ टीएमसी......१०.४० टीएमसी२०१८....८.९९ टीएमसी........७.९९ टीएमसी

समन्यायी पाणी वाटप कायदा काय म्हणतो?२००५ मध्ये शासनाने समन्यायी पाणीवाटप कायदा मंजूर केला. त्यानुसार मेंढीगिरी समितीच्या काही शिफारशी स्वीकारल्या. त्यात जायकवाडीत दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी सुमारे ४९.८४ टी.एम.सी. म्हणजेच ६५ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा प्रथमत: करण्यात यावा. त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील गोदावरी व नगर जिल्ह्यातील मुळा प्रवरा धरणांतून जायकवाडी धरणामध्ये ६५ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होण्यासाठी कमी पडणारे पाणी सोडावे, असे ठरले होते. त्यानुसार जायकवाडीत दरवर्षीच्या १५ ऑक्टोबर रोजी उपयुक्त पाणीसाठा विचारात घेऊन पुढील रबी व उन्हाळी हंगामासाठी आवर्तन सोडले जाते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीState Governmentराज्य सरकार