शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

जेवढा विलंब, तेवढे मराठवाड्यात येईल कमी पाणी; ३१ ऑक्टोबरपर्यंत समन्यायी पाणीवाटप गरजेचे

By विकास राऊत | Updated: October 26, 2023 12:33 IST

३१ ऑक्टोबरपर्यंत निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही, तर न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान ठरण्याची चिन्हे आहेत.

छत्रपती संभाजीनगर : नाशिक- अहमदनगर जिल्ह्यांतील धरणसमूहांतून जायकवाडीसाठी ११ ते १३ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय अजून झालेला नाही. पाणी सोडण्यास जेवढा विलंब होईल, तेवढे पाणी कमी येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. २३ सप्टेंबर २०१६ रोजी दिलेल्या निर्णयानुसार ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात म्हणजेच ३१ ऑक्टोबरपर्यंत समन्यायी पाणीवाटप होणे गरजेचे आहे. सदरील निर्णयाची अंमलबजावणी न्यायालयाने गाेदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळावर साेपविली आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही, तर न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान ठरण्याची चिन्हे आहेत.

यंदा मराठवाड्यात १५ टक्के पावसाची तूट आहे. या विभागाची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणात सध्या ४७ टक्के जलसाठा आहे. मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यांसाठी संजीवनी असलेल्या जायकवाडी धरणात १५ ऑक्टोबरपर्यंत ४७.२३ टक्के जलसाठा होता. गतवर्षीच्या उपयुक्त पाणीसाठ्यापेक्षा तो ५३ टक्के कमी आहे. त्यामुळे या जिल्ह्यांतील शेतीसिंचनावर परिणाम होईल, शिवाय पिण्याच्या पाण्याची टंचाई होणे शक्य आहे.तातडीने पाणी सोडावे...

न्यायालयाच्या निर्णयानुसार ऊर्ध्व जायकवाडी प्रकल्पातून तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी भगीरथ पाणी परिषदेचे अध्यक्ष अभिजित धानोरकर यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांकडे बुधवारी निवेदनाद्वारे केली आहे. २३ सप्टेंबर २०१६ रोजी दिलेल्या निर्णयानुसार ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात म्हणजेच ३१ ऑक्टोबरपर्यंत समन्यायी पाणीवाटप होणे गरजेचे आहे. सदरील निर्णयाची अंमलबजावणी न्यायालयाने महामंडळावर साेपविली आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही, तर न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान ठरेल. येथून मागे जायकवाडीत तीनदा पाणी सोडले; पण ते कमी प्रमाणात आले, असे धानोरकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

विलंबामुळे कमी आले होते पाणी...वर्ष........ प्रस्तावित पाणी....... प्रत्यक्षात आलेले पाणी२०१४....७.८९ टीएमसी........७.१० टीएमसी२०१५....१२.८४ टीएमसी......१०.४० टीएमसी२०१८....८.९९ टीएमसी........७.९९ टीएमसी

समन्यायी पाणी वाटप कायदा काय म्हणतो?२००५ मध्ये शासनाने समन्यायी पाणीवाटप कायदा मंजूर केला. त्यानुसार मेंढीगिरी समितीच्या काही शिफारशी स्वीकारल्या. त्यात जायकवाडीत दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी सुमारे ४९.८४ टी.एम.सी. म्हणजेच ६५ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा प्रथमत: करण्यात यावा. त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील गोदावरी व नगर जिल्ह्यातील मुळा प्रवरा धरणांतून जायकवाडी धरणामध्ये ६५ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होण्यासाठी कमी पडणारे पाणी सोडावे, असे ठरले होते. त्यानुसार जायकवाडीत दरवर्षीच्या १५ ऑक्टोबर रोजी उपयुक्त पाणीसाठा विचारात घेऊन पुढील रबी व उन्हाळी हंगामासाठी आवर्तन सोडले जाते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीState Governmentराज्य सरकार