शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
3
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
4
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
5
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
6
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
7
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
8
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
9
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
10
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
11
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
12
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
13
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
14
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
15
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
16
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
17
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
18
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
19
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
20
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत

औरंगाबादच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न आता जनहित याचिकेच्या माध्यमातून हायकोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 12:22 IST

औरंगाबाद शहरातील सुमारे १७ लाख लोकांच्या हिताशी निगडित प्रश्न

औरंगाबाद : औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न आता जनहित याचिकेच्या माध्यमातून न्यायमंदिरात मांडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खंडपीठाचे न्या. सी.व्ही. भडंग व न्या. संदीपकुमार माेरे यांनी या याचिकेला जनहित याचिका म्हणून मान्यता दिली आहे.

याचिकेतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा कुठल्याही विशिष्ट समुदायाशी किंवा व्यक्तींशी निगडित नसून, सुमारे १७ लाख लोकसंख्या असलेल्या औरंगाबाद शहराशी निगडित असल्याने यासंदर्भात दाखल याचिकेला जनहित याचिका नियमातील नियम ४ (ड) नुसार जनहित याचिका म्हणून ग्राह्य धरीत असल्याचे खंडपीठाने आदेशात म्हटले आहे. या जनहित याचिकेवर शुक्रवारी सुनावणी अपेक्षित आहे.

सिडकोतील एन-३ येथील रहिवाशांना महापालिकेतर्फे नियमित पाणीपुरवठा व्हावा यासाठी श्रीहरी शिदोरे यांच्या वतीने ॲड. अमित मुखेडकर यांनी खंडपीठात मूळ याचिका दाखल केली होती, तसेच महापालिकेने शहराला पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करण्याचे निर्देश देण्याची विनंतीसुद्धा याचिकाकर्त्यांनी केली होती.

शहराच्या नवीन पाणीपुरवठ्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान प्रकल्पासंदर्भात खंडपीठाने अनेक आदेश दिले असल्याचे, तसेच शहराला नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचेही सुनावणीदरम्यान खंडपीठाच्या निदर्शनास आले. खंडपीठाने वरीलप्रमाणे निर्देश देऊन ही जनहित याचिका योग्य त्या खंडपीठापुढे सादर करण्याचे सांगितले.

पंप हाउसच्या बांधकामासोबतची जलवाहिन्या टाकण्याचे आणि त्यासाठीचे खोदकाम व इतर आनुषंगिक कामेही एकाच वेळी व्हावीत, अशी अपेक्षा खंडपीठाने व्यक्त केली आहे. न्यायालयाचे मित्र सचिन देशमुख, मुख्य सरकारी वकील डी.आर. काळे, मनपाकडून ॲड. संभाजी टोपे, याचिकाकर्ते अमित मुखेडकर व केंद्राकडून असिस्टंट सॉलिसिटर जनरल अजय तल्हार काम पाहत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका