शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

औरंगाबादच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न आता जनहित याचिकेच्या माध्यमातून हायकोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 12:22 IST

औरंगाबाद शहरातील सुमारे १७ लाख लोकांच्या हिताशी निगडित प्रश्न

औरंगाबाद : औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न आता जनहित याचिकेच्या माध्यमातून न्यायमंदिरात मांडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खंडपीठाचे न्या. सी.व्ही. भडंग व न्या. संदीपकुमार माेरे यांनी या याचिकेला जनहित याचिका म्हणून मान्यता दिली आहे.

याचिकेतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा कुठल्याही विशिष्ट समुदायाशी किंवा व्यक्तींशी निगडित नसून, सुमारे १७ लाख लोकसंख्या असलेल्या औरंगाबाद शहराशी निगडित असल्याने यासंदर्भात दाखल याचिकेला जनहित याचिका नियमातील नियम ४ (ड) नुसार जनहित याचिका म्हणून ग्राह्य धरीत असल्याचे खंडपीठाने आदेशात म्हटले आहे. या जनहित याचिकेवर शुक्रवारी सुनावणी अपेक्षित आहे.

सिडकोतील एन-३ येथील रहिवाशांना महापालिकेतर्फे नियमित पाणीपुरवठा व्हावा यासाठी श्रीहरी शिदोरे यांच्या वतीने ॲड. अमित मुखेडकर यांनी खंडपीठात मूळ याचिका दाखल केली होती, तसेच महापालिकेने शहराला पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करण्याचे निर्देश देण्याची विनंतीसुद्धा याचिकाकर्त्यांनी केली होती.

शहराच्या नवीन पाणीपुरवठ्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान प्रकल्पासंदर्भात खंडपीठाने अनेक आदेश दिले असल्याचे, तसेच शहराला नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचेही सुनावणीदरम्यान खंडपीठाच्या निदर्शनास आले. खंडपीठाने वरीलप्रमाणे निर्देश देऊन ही जनहित याचिका योग्य त्या खंडपीठापुढे सादर करण्याचे सांगितले.

पंप हाउसच्या बांधकामासोबतची जलवाहिन्या टाकण्याचे आणि त्यासाठीचे खोदकाम व इतर आनुषंगिक कामेही एकाच वेळी व्हावीत, अशी अपेक्षा खंडपीठाने व्यक्त केली आहे. न्यायालयाचे मित्र सचिन देशमुख, मुख्य सरकारी वकील डी.आर. काळे, मनपाकडून ॲड. संभाजी टोपे, याचिकाकर्ते अमित मुखेडकर व केंद्राकडून असिस्टंट सॉलिसिटर जनरल अजय तल्हार काम पाहत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका