शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

छत्रपती संभाजीनगरहून हैदराबादचे विमान ७० टक्के ‘फुल्ल’, मग का होतेय विमानसेवा बंद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 14:10 IST

महिन्याला ७ हजारांवर विमान प्रवासी, जुलैपासून सकाळचे विमान होणार बंद

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरहून महिन्याला ७ हजारांवर प्रवासी विमानाने हैदराबादला ये-जा करीत आहेत. हैदराबादचे विमान ७० टक्के प्रवाशांनी भरून जात आहे. तरीही इंडिगोने हैदराबादचे सकाळच्या वेळेतील १ विमान बंद करण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

छत्रपती संभाजीनगरहून सकाळच्या वेळेत सुरू असलेली इंडिगोची हैदराबादची विमानसेवा १ जुलैपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही विमानसेवा ‘ऑपरेशनल रिझन’मुळे १ जुलै ते २५ ऑक्टोबर दरम्यान रद्द करण्यात येत असल्याचे कारण इंडिगोने दिले आहे. त्यामुळे आता हैदराबादला जाण्यासाठी केवळ सायंकाळच्या वेळेत विमानसेवा उपलब्ध राहणार आहे.

निर्णयाचा तातडीने पुनर्विचार कराइंडिगो कंपनीच्या निर्णयामुळे स्थानिक नागरिक, उद्योजक आणि पर्यटकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. या निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करावा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आल्याचे औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या (एटीडीएफ) सिव्हिल एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष सुनीत कोठारी यांनी इंडिगोकडे केली आहे.

दरमहा किती प्रवासी?महिना- प्रवाशांची संख्या - आसन क्षमतेच्या तुलनेत टक्केवारीजानेवारी २०२४- ७,४५४ - ७७.०७ %

फेब्रुवारी २०२४- ७,०३७ - ७७.७७ %मार्च २०२४- ७,६७२ - ७९.३२ %

एप्रिल २०२४- ६,८७५ - ७३.४५ %मे २०२४- ८,०१० - ८२.८२ %

जून २०२४- ७,२५४- ७७.५० %जुलै २०२४- ७,५४० - ७७.९६ %

ऑगस्ट २०२४- ७,६१३ - ७८.७१ %सप्टेंबर २०२४- ७,१२३ - ७६.१० %

ऑक्टोबर २०२४- ७,६९१- ८०.८२ %नोव्हेंबर २०२४- ८,३९५ - ८९.६९ %

डिसेंबर २०२४- ८,७०५ - ९०.०० %जानेवारी २०२५- ८,६८३ - ८९.७७ %

फेब्रुवारी २०२५- ८,०४४ - ९२.०८ %मार्च २०२५- ८,३५१ - ८६.३४ %

एप्रिल २०२५ - ८,१०५ - ८६.५९ %

हैदराबादचे विमान सुरळीत सुरू राहीलहैदराबादकडे जाणाऱ्या विमानासाठी प्रवासी भरपूर आहेत. इंडिगोच्या सीईओ सचदेवा यांना भेटून विमानसेवा पूर्ववत ठेवण्यासाठी सांगणार आहे. विमानतळ जास्त आणि विमानांची संख्या कमी असल्यामुळे अडचणी आहेत. इंडिगो आणि एअर इंडियाने एअरबस या कंपनीकडे प्रत्येकी ४०० विमानांची मागणी नोंदविली आहे. विमान मिळताच सेवा सुरळीत होऊन नवीन कनेक्टिव्हिटी मिळेल.- डॉ. भागवत कराड, खासदार

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरairplaneविमानtourismपर्यटन