शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

सत्ताधारी-विरोधकांची झुंज ही नौटंकीची; प्रकाश आंबेडकर यांची महायुती-आघाडीवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 19:50 IST

आंबेडकर यांनी मुस्लीम समाजाला इशारा दिला की, एका समाजावर निवडणुका जिंकता येत नाहीत. सर्वसमावेशक मतांवरच निवडणुका जिंकता येतात.

छत्रपती संभाजीनगर : महायुती आणि महाविकास आघाडी हे दोघे निवडणुकांत कोंबड्यासारखे झुंजतात. आपल्याला वाटते ही खरीच झुंज आहे. पण, ही नौटंकीची झुंज आहे, हे लक्षात घ्यावे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल, तर वंचितच्या उमेदवारास मतदान करावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान यांच्या प्रचारार्थ आमखास मैदानावर शनिवारी रात्री आंबेडकर यांची सभा झाली. यावेळी उमेदवार अफसर खान, जावेद कुरेशी, प्रभाकर बकले, किशन चव्हाण, अमित भुईगळ, सय्यद जफर यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महायुती व महाविकास आघाडीचे निवडणुकीत नात्यागोत्याचेच उमेदवार आहेत. हे सर्व श्रीमंत मराठा समाजाचे उमेदवार आहेत. जरांगे पाटलांनी ज्या गरीब मराठ्यासाठी लढा उभारला होता. त्याच्यातला एकही उमेदवार दिलेला नाही. सत्ता मराठा घराणेशाहीच्याच हातामध्ये राहणार आहे. ज्या घराणेशाहीला सत्ता देणार आहात तो शरीराचा एक डावा हात आहे आणि दुसरा उजवा हात आहे. सत्ता डाव्या हाताकडे आली काय किंवा उजव्या हाताकडे आली, ती शरीराकडेच आली म्हणजे कुटुंबाकडे आली, अशी परिस्थिती आहे. मुस्लीम बांधवांना आवाहन आहे की, हिंदू समाजाचा मतदार सेक्युलर विचाराचा आहे. देशात सेक्युलर राजकारण उभे राहिले पाहिजे, यासाठी आपल्या समाजाच्या विरोधात जाऊन त्याने मतदान दिले. त्याची कदर करायला हवी. मुसलमानांना वेगळे पाडण्याचे भाजपचे जे राजकारण आहे, ते यशस्वी करण्याचे काम होता कामा नये.

महाविकास आघाडीसोबत युती करताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडे आमची मागणी होती की, सेक्युलर मतदाराला आश्वासन द्यावे की, पाच वर्षे तुम्ही भाजपसोबत जाणार नाही. आश्वासन दिले नाही ते दिले नाही. आता निवडणुकीच्या काळात मोदी सांगत सुटले आहेत की, उद्धवसेना आपल्यासोबत आल्याशिवाय राहणार नाही. हे संकेत आहेत उद्याचे. शिवसेना ही सेक्युलर झाली, असे तुम्हाला कसे वाटले हा माझा मुस्लीम बांधवांना प्रश्न आहे, जर आता मुस्लीम समाज चुकला, तर परत ही संधी मिळणार नाही.

एमआयएमने खंजीर खुपसलाआंबेडकर यांनी मुस्लीम समाजाला इशारा दिला की, एका समाजावर निवडणुका जिंकता येत नाहीत. सर्वसमावेशक मतांवरच निवडणुका जिंकता येतात. मागच्या निवडणुकीत वंचितने एमआयएमसोबत युतीमध्ये मुस्लीम उमेदवार दिला होता. विधानसभेत याच एमआयएमने वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला. एकट्या मुस्लीम मतावर एमआयएमचा उमेदवार जिंकून आला नाही, तो इथल्या ओबीसींच्या मतावर जिंकून आला. ओवैसी असेल किंवा इतर कोणी असतील, युती केल्यानंतर युतीचा धर्म निभावावा लागतो, तो निभावता येत नसेल तर युती करू नका, असे ते म्हणाले.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर