शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

पाचवे वर्षे सुरू, तरी मनपा निवडणूक नाही; इच्छुकांची आशा मावळली, प्रशासनाचा एकछत्री अंमल

By मुजीब देवणीकर | Updated: May 2, 2024 18:13 IST

विधानसभा झाल्यावर महापालिका निवडणूका होतील अशी भोळी आशा मनपासाठी इच्छुक नगरसेवक बाळगून आहेत.

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाल २० एप्रिल २०२० मध्ये संपला. निवडणूक आयोग आज निवडणुका घेईल, उद्या घेईल असे वाटत होते. आता तर चार वर्षे उलटले. प्रशासकीय राजवटीने पाचव्या वर्षात पर्दापण केले. त्यानंतरही राज्य सरकार, निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीबाबत कोणत्याही हालचाली नाहीत. लोकसभा निवडणूक संपताच विधानसभा निवडणूकांचे वारे वाहायला लागतील. विधानसभा झाल्यावर महापालिका निवडणूका होतील अशी भोळी आशा मनपासाठी इच्छुक नगरसेवक बाळगून आहेत.

महापालिका स्थापना : १९८२पहिली सार्वत्रिक निवडणूक : १९८८प्रशासकीय राजवट : १९९२ ते १९८८पुन्हा प्रशासन : २०२० पासून आजपर्यंतप्रशासकीय राजवटीची कारणे : २०१९-२०२० कोविड काळ, त्यानंतर ओबीसी आरक्षण मुद्दा.

वॉर्ड वाढणारदरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाने वॉर्ड रचना तयार केली. प्रभाग पद्धतही निश्चित केली नंतर ही प्रक्रियाही गुंडाळून ठेवण्यात आली. आता चार प्रभाग करून निवडणूक घेण्याचा मनोदय राज्य सरकारने व्यक्त केला आहे.२०२० पूर्वी शहरात महापालिकेचे ११५ वॉर्ड होते. यामध्ये वाढ होणार आहे. १२२ ते १२३ वॉर्ड होतील.

इच्छुकांच्या तलवारी म्यानचार वॉर्डांचा एक पॅनल करून निवडणूक लढणे एवढे सोपे राहणार नाही. त्यामुळे अनेक इच्छुकांनी तलवार म्यान केल्या आहेत. सध्या लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी इच्छुकांना पुन्हा कामाला लावले आहे. माजी नगरसेवकांनाही जवळ करणे सुरू केले. विधानसभा निवडणुकीतही हेच होणार आहे. मार्च २०२६ मध्ये मनपा निवडणूक होतील, असा कयास लावण्यात येतोय.

प्रशासकीय राजवट ‘एकला चलो रे...’महापालिकेत सध्या प्रशासकीय राजवट आहे. प्रशासनाने वॉर्डनिहाय विकास जवळपास बंद केला आहे. त्यामुळे दरवर्षी वॉर्डांमध्ये होणारी २०० ते २५० कोटींच्या कामांना जवळपास ‘ब्रेक’ लागला आहे. केंद्रीय पद्धतीने प्रशासनाने विकास कामांवर भर दिलाय. शहराच्या मूलभूत सोयीसुविधांवर अधिक भर देण्यात आल्याचा दावा प्रशासनाने वारंवार केला. अर्थसंकल्प तयार करताना सर्वसामान्य नागरिकांनी सांगितलेल्या गोष्टींवरही भर देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याने अनेकदा प्रशासन ‘एकला चलो रे’ पद्धतीने निर्णय घेत आहे.

ड्रेनेज, पाण्याच्या सर्वाधिक तक्रारीमहापालिकेकडे येणाऱ्या सर्वाधिक तक्रारी ड्रेनेज, पाणीपुरवठ्याशी संबधित असतात. चोकअप काढणे एवढेच काम वॉर्ड कार्यालयांकडून सुरू आहे. ड्रेनेजचा कायस्वरूपी प्रश्न सोडविण्याकडे कल दिसून येत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांसह राजकीय मंडळींचीही नाराजी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

शासनाकडून कोणतीही सूचना नाहीमागील वर्ष ते दीड वर्षांपासून राज्य शासन, निवडणूक आयोगाकडून महापालिकेला निवडणूक घेण्यासंदर्भात कोणतीही सूचना नाही. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी वेळ कमी असल्याने तेव्हा सुद्धा निवडणूक होण्याची शक्यता कमीच आहे. विधानसभेनंतरच निवडणूक होईल, असे वाटते.-राहुल सुर्यवंशी, उपायुक्त, मनपा.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूक