शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

पाडापाडीची कारवाई लेबर कॉलनीत होणारच; न्यायालयाकडून दिलासा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 12:22 IST

शुक्रवारी दिवसभर जिल्हाधिकारी जनहित याचिकेच्या सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात होते.

औरंगाबाद : विश्वासनगर लेबर कॉलनीवर पाडापाडीची कारवाई होणारच, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले. शुक्रवारी दिवसभर जिल्हाधिकारी जनहित याचिकेच्या सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात होते. खंडपीठाने याचिका फेटाळल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले; तर दुसरीकडे, लेबर कॉलनी वासीयांचे पुनर्वसन करावे, नंतरच कारवाई करावी, अशी मागणी भाजप शहर जिल्हाध्यक्ष संंजय केणेकर यांनी पत्रकार परिषदेत केली. पाडापाडीच्या कारवाईला विरोध असल्याचे सांगून त्यांनी वरळीतील बीडीडी चाळीप्रमाणे तेथील रहिवाशांचे पुनवर्सन करण्याची मागणी केली. या वेळी लेबर कॉलनीमधील रहिवासी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले, न्यायालयाने स्पष्टपणे निकाल दिला आहे. आजवर अनेकदा मुदत देण्यात आली आहे. सध्या तेथील इमारती धोकादायक असून पावसाळ्यात दुर्घटना घडल्यास जीवितहानी झाल्यास काय करणार, असा मुद्दा आहे. या आठवड्यात पाडापाडीची कारवाई सुरू होईल.

पुनर्वसन करण्याची मागणीपर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील बीडीडी चाळीप्रमाणे निर्णय घेऊन लेबर कॉलनीवासीयांचे पुनर्वसन करण्याची मागणी भाजप शहराध्यक्ष केणेकर यांनी केली. तत्कालीन विभागीय आयुक्तांच्या तांत्रिक चुकीमुळे लेबर कॉलनीचे पुनर्वसन झाले नाही, त्यामुळे लेबर कॉलनीवासीयांना ३५ वर्षांपेक्षा जास्त संघर्ष करावा लागला. कोर्टाने दिलेला निर्णय स्वीकारून जिल्हा प्रशासनाला व पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे. महाविकास आघाडी सरकारने बीडीडी सरकारी निवासस्थानाबाबतीत धोरणात्मक निर्णय घेत तेथील सदनिकाधारकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी घ्यावी.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद