शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

दाखल गुन्हा, दोषारोपपत्र रद्द; खंडपीठाच्या निर्णयाने अमेरिकेत नोकरीला जाण्याचा मार्ग मोकळा

By बापू सोळुंके | Updated: September 12, 2023 20:09 IST

छळ कसा केल्याचे तक्रारीत नसेल तर खटला चालविणे म्हणजे कायद्याचा दुरूपयोग ठरेल: खंडपीठाचे निरीक्षण

छत्रपती संभाजीनगर : तक्रारदाराचा नेमका कसा छळ केला ,याचा तक्रारीत उल्लेख नसल्यामुळे अर्जदारा विरुद्ध खटला चालवीने हा कायद्याचा दुरुपयोग ठरेल, असे निरीक्षण नोंदवीत मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. जी. अवचट आणी न्या. संजय देशमुख यांनी अर्जदार ज्ञानेश्वर गुलाब गिरी यांच्या विरुद्ध दाखल गुन्हा आणि दोषारोप पत्र रद्द करण्याचा आदेश दिला.  न्यायालयाच्या या निर्णयाने अर्जदाराचा नोकरीसाठी अमेरिकेला जाण्याचा मार्ग मोकळा झाला. 

अर्जदाराच्या वहिनीने २९ ऑक्टोबर २०२२ रोजी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात  सासरच्या पाच जणांविरोधातविरोधात छळाची तक्रार नोंदविली होती.  या तक्रारीमध्ये भादंवि कलम  ४९८ आणि विनयभंगाचे कलम ३५४ प्रमाणे आरोप करण्यात आले होते. तर अर्जदार ज्ञानेश्वर गिरीविरोधात कुठलेही आरोप नव्हते. मात्र त्यांचे नाव या गुन्ह्यामध्ये गोवण्यात आले होते.  गिरी आणि त्यांच्या कुटुंबातील इतरांना न्यायलायाने जामीन मंजूर केला आहे.  यानंतर पोलिसांनी  या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. यातही अर्जदार यांच्या विरुद्ध कुठलाही पुरावा आढळला नव्हता. त्यामुळे त्यांनी ॲड. एम. पी. भास्कर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात  फौजदारी अर्ज दाखल केला होता.    

यात त्यांनी त्यांच्याविरोधातील दोषारोपपत्र रद्द करण्याची विनंती केली होती. या अर्जावर ११ सप्टेंबर रोजी सुनावणी झाली असता  अर्जदाराचा या गुन्ह्याशी संबंध नाही, तसेच त्यांच्याविरोधात कोणताही पुरावा आढळून आला नाही. तसेच त्यांना अमेरिकन कंपनीची नोकरीसाठी संधी आलेली आहे. त्यांना १३ सप्टेंबर रोजी विमानाने अमेरिकेला पोहोचवायचे असल्याचे ॲड. भास्कर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. हे सर्व मुद्दे विचारात घेऊन  न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला. सरकार तर्फे ॲड. मोरमपल्ले यांनी काम पाहिले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCourtन्यायालयAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठCrime Newsगुन्हेगारी