शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

दाखल गुन्हा, दोषारोपपत्र रद्द; खंडपीठाच्या निर्णयाने अमेरिकेत नोकरीला जाण्याचा मार्ग मोकळा

By बापू सोळुंके | Updated: September 12, 2023 20:09 IST

छळ कसा केल्याचे तक्रारीत नसेल तर खटला चालविणे म्हणजे कायद्याचा दुरूपयोग ठरेल: खंडपीठाचे निरीक्षण

छत्रपती संभाजीनगर : तक्रारदाराचा नेमका कसा छळ केला ,याचा तक्रारीत उल्लेख नसल्यामुळे अर्जदारा विरुद्ध खटला चालवीने हा कायद्याचा दुरुपयोग ठरेल, असे निरीक्षण नोंदवीत मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. जी. अवचट आणी न्या. संजय देशमुख यांनी अर्जदार ज्ञानेश्वर गुलाब गिरी यांच्या विरुद्ध दाखल गुन्हा आणि दोषारोप पत्र रद्द करण्याचा आदेश दिला.  न्यायालयाच्या या निर्णयाने अर्जदाराचा नोकरीसाठी अमेरिकेला जाण्याचा मार्ग मोकळा झाला. 

अर्जदाराच्या वहिनीने २९ ऑक्टोबर २०२२ रोजी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात  सासरच्या पाच जणांविरोधातविरोधात छळाची तक्रार नोंदविली होती.  या तक्रारीमध्ये भादंवि कलम  ४९८ आणि विनयभंगाचे कलम ३५४ प्रमाणे आरोप करण्यात आले होते. तर अर्जदार ज्ञानेश्वर गिरीविरोधात कुठलेही आरोप नव्हते. मात्र त्यांचे नाव या गुन्ह्यामध्ये गोवण्यात आले होते.  गिरी आणि त्यांच्या कुटुंबातील इतरांना न्यायलायाने जामीन मंजूर केला आहे.  यानंतर पोलिसांनी  या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. यातही अर्जदार यांच्या विरुद्ध कुठलाही पुरावा आढळला नव्हता. त्यामुळे त्यांनी ॲड. एम. पी. भास्कर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात  फौजदारी अर्ज दाखल केला होता.    

यात त्यांनी त्यांच्याविरोधातील दोषारोपपत्र रद्द करण्याची विनंती केली होती. या अर्जावर ११ सप्टेंबर रोजी सुनावणी झाली असता  अर्जदाराचा या गुन्ह्याशी संबंध नाही, तसेच त्यांच्याविरोधात कोणताही पुरावा आढळून आला नाही. तसेच त्यांना अमेरिकन कंपनीची नोकरीसाठी संधी आलेली आहे. त्यांना १३ सप्टेंबर रोजी विमानाने अमेरिकेला पोहोचवायचे असल्याचे ॲड. भास्कर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. हे सर्व मुद्दे विचारात घेऊन  न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला. सरकार तर्फे ॲड. मोरमपल्ले यांनी काम पाहिले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCourtन्यायालयAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठCrime Newsगुन्हेगारी