शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

"सत्ताधाऱ्यांचा रंग सरड्यालाही लाजवणारा"; क्या हुआ तेरा वादा? आंदोलनातून ठाकरेसेनेची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 15:13 IST

सरकारने फसवणूक केली, शेतकरी कंगाल झाला असून मराठवाडा तहानलेला, सरकार मात्र घोषणांमध्ये मश्गुल!

छत्रपती संभाजीनगर: "महायुती सरकारने दिलेली आश्वासने केवळ कागदावरच, आणि शेतकरी मात्र संकटात सापडले आहेत," असा गंभीर आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. "क्या हुआ तेरा वादा?" या आंदोलनाची सुरुवात आज, ५ जून रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दानवे म्हणाले की, सरकारने जाहिर केलेल्या अनेक योजना केवळ घोषणांपुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत. कर्जमाफी, हमीभाव, पीकविमा, ऊर्जादाता योजना यांवरून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे.

"सरड्यालाही लाजवेल असा रंग बदलला"सत्ताधारी तिन्ही पक्षांनी कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर अनुदानांची ग्वाही दिली, पण प्रत्यक्षात काहीच झाले नाही. अजित पवारांनी अर्थसंकल्पात कर्जमाफीसंदर्भात मजकूर टाकत शेतकऱ्यांची "क्रूर थट्टा" केली, असा आरोप दानवे यांनी केला. याच काळात १००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, असेही त्यांनी निदर्शनास आणले.

"पीकविमा योजना बंद; विमा कंपन्यांचा फायदा, शेतकऱ्यांचे नुकसान""एक रुपयात पीकविमा" योजनेचा देखील बळी शेतकऱ्यांनी घेतला. विमा कंपन्यांनी दीड लाख कोटींचे प्रीमियम गोळा करून सुमारे ५० हजार कोटींचा लाभ मिळवला, पण प्रत्यक्ष नुकसानभरपाई दिलीच नाही, असे निवेदनात नमूद आहे.

"ऊर्जादाता" नव्हे, अंधारात अन्नदाता!सरकारने 'अन्नदाता बनेल ऊर्जादाता' असे मोठे आश्वासन दिले होते, पण प्रत्यक्षात शेतकरी लोडशेडिंगमुळे त्रस्त आहेत. अनुदानाची रक्कमही वेळेत मिळत नाही. "सबसिडीच्या मोठमोठ्या आकड्यांमागे लपून सरकार शेतकऱ्यांना अंधारात ठेवत आहे," असा घणाघात करण्यात आला.

"मराठवाडा वॉटर ग्रीडची केवळ घोषणा"२०१८ पासून प्रस्तावित असलेला ४५ हजार कोटींचा मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प अद्यापही केवळ फायलीतच अडकलेला आहे. पाण्याच्या टंचाईने मराठवाडा आजही टँकरवर अवलंबून आहे. निधी, इच्छाशक्ती आणि अंमलबजावणीचा अभाव या तिन्ही गोष्टी प्रकल्पाच्या विलंबाचे कारण ठरत आहेत, असे निवेदनात स्पष्ट केले.

महिलांपासून वृद्धांपर्यंत, सरकारचा विश्वासघातमहिला सन्मान निधीच्या वितरणात दिरंगाई, उज्वला गॅस योजनेतील ठप्पावस्था, महिला सुरक्षेची दुरवस्था याकडेही लक्ष वेधण्यात आले. दररोज ७० महिलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांवरही सरकार मौन बाळगते, असे आरोप करण्यात आले. वृद्धांसाठी घोषित केलेली पेन्शनवाढ, स्वतंत्र ओपीडी सुविधा आदी गोष्टी फक्त आश्वासनापुरत्याच राहिल्या असल्याचेही नमूद करण्यात आले.

तरुणाईलाही गंडवले, नोकऱ्यांचे स्वप्न खोटे ठरले'छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र', 'एरोनॉटिकल हब', २५ लाख नोकऱ्या आणि विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती यासारख्या योजना फसव्या ठरल्या आहेत. "या सरकारमुळे बेरोजगारीचा उद्रेक झाला आहे," असा स्पष्ट उल्लेख निवेदनात आहे.

"जाहीरातबाजी थांबवा, कृती करा!"शिवसेनेच्या वतीने सरकारला इशारा देण्यात आला आहे की, जर या योजनांची प्रभावी अंमलबजावणी त्वरित केली नाही, तर जनतेचा उद्रेक होणार हे निश्चित आहे. केवळ गाजावाजा आणि प्रचारकी भाषणांवर न थांबता कृतीतूनच विश्वास मिळवावा, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

याप्रसंगी महानगरप्रमुख राजू वैद्य,उपजिल्हाप्रमुख किशोर कच्छवाह, विजय वाघमारे, चंद्रकांत गवई, संतोष जेजुरकर, संतोष खेंडके, अरविंद धिवर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात,हरीभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, विधानसभा संघटक गोपाल कुलकर्णी, दिग्विजय शेरखाने, शहर संघटक सचिन तायडे, महिला आघाडी सहसंपर्क संघटक दुर्गा भाटी, जिल्हा संघटक आशा दातार,जिल्हा समन्वयक विद्या अग्निहोत्री, महानगर संघटक सुकन्या भोसले, मीना फसाटे, शहर संघटक सुनिता सोनवणे, विधानसभा संघटक मीरा देशपांडे, राजश्री राणा आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरShiv SenaशिवसेनाAmbadas Danweyअंबादास दानवेFarmerशेतकरी