शहरं
Join us  
Trending Stories
1
काय झालास तू? 'व्होट बँके'साठी महाभियोग प्रस्ताव आणल्याचा आरोप, ठाकरेंना अमित शाहांनी घेरले
2
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
3
"त्यांच्यावर बोलायला मी रिकामा नाही"; राहुल गांधींच्या आरोपांची मुख्यमंत्री फडणवीसांनी उडवली खिल्ली
4
सीतामढी जिल्ह्यात 'HIV ब्लास्ट', आतापर्यंत 7400 HIV ग्रस्त आढळले? डॉक्टर म्हणाले, बाधितांनी निगेटिव्हसोबत लग्न करू नये
5
इस्रायली पंतप्रधानांचा PM मोदींना फोन, या संदर्भात व्यक्त केला आनंद; गाझावरही चर्चा
6
भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
7
संस्थेची गाडी, हातात अर्ज अन् चर्चांना उधाण; तानाजी सावंतांच्या मुलाने भरला भाजपचा उमेदवारी अर्ज?
8
'उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का?'; मुंढवा जमीन घोटाळ्याच्या FIR वर हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल
9
स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO)
10
STवर ४ हजार कोटींचा आर्थिक भार, देणी कधीपर्यंत फेडणार?; प्रताप सरनाईकांनी तारीखच सांगितली
11
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: लक्ष्मी देवीसह स्वामी सेवा करा; धनधान्य, वैभव, कालातीत कृपा लाभेल!
12
IND vs SA T20: संजू सॅमसनला Playing XI मध्ये का घेतलं नाही? माजी क्रिकेटरने सांगितलं 'लॉजिक'
13
समसप्तक वसुमान योगात कालाष्टमी २०२५: ६ राशींना धनलाभ योग, चौपट भरभराट; पण पैसे उसने देऊ नका!
14
अयोध्येच्या राम मंदिरात दर्शन घ्यायला केव्हा जाणार? अखिलेश यादव यांनी काय उत्तर दिलं पाहा
15
"काय बोलायचं ते मी ठरवेन, तुम्ही सांगू नका..."; अमित शाह-राहुल गांधींमध्ये लोकसभेत खडाजंगी
16
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
17
“ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले”; जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला
18
चालत्या बसमधून उचलून २ महिने जेलमध्ये डांबलं; टॉपर विद्यार्थ्याला अडकवणारे पोलीस CCTV मुळे फसले
19
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
20
IPL 2026 Auction : मिनी लिलावाच्या फायनल यादीत घोळ! विराट-क्रिसचं नाव झालेले ‘गायब’, आता...
Daily Top 2Weekly Top 5

"सत्ताधाऱ्यांचा रंग सरड्यालाही लाजवणारा"; क्या हुआ तेरा वादा? आंदोलनातून ठाकरेसेनेची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 15:13 IST

सरकारने फसवणूक केली, शेतकरी कंगाल झाला असून मराठवाडा तहानलेला, सरकार मात्र घोषणांमध्ये मश्गुल!

छत्रपती संभाजीनगर: "महायुती सरकारने दिलेली आश्वासने केवळ कागदावरच, आणि शेतकरी मात्र संकटात सापडले आहेत," असा गंभीर आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. "क्या हुआ तेरा वादा?" या आंदोलनाची सुरुवात आज, ५ जून रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दानवे म्हणाले की, सरकारने जाहिर केलेल्या अनेक योजना केवळ घोषणांपुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत. कर्जमाफी, हमीभाव, पीकविमा, ऊर्जादाता योजना यांवरून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे.

"सरड्यालाही लाजवेल असा रंग बदलला"सत्ताधारी तिन्ही पक्षांनी कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर अनुदानांची ग्वाही दिली, पण प्रत्यक्षात काहीच झाले नाही. अजित पवारांनी अर्थसंकल्पात कर्जमाफीसंदर्भात मजकूर टाकत शेतकऱ्यांची "क्रूर थट्टा" केली, असा आरोप दानवे यांनी केला. याच काळात १००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, असेही त्यांनी निदर्शनास आणले.

"पीकविमा योजना बंद; विमा कंपन्यांचा फायदा, शेतकऱ्यांचे नुकसान""एक रुपयात पीकविमा" योजनेचा देखील बळी शेतकऱ्यांनी घेतला. विमा कंपन्यांनी दीड लाख कोटींचे प्रीमियम गोळा करून सुमारे ५० हजार कोटींचा लाभ मिळवला, पण प्रत्यक्ष नुकसानभरपाई दिलीच नाही, असे निवेदनात नमूद आहे.

"ऊर्जादाता" नव्हे, अंधारात अन्नदाता!सरकारने 'अन्नदाता बनेल ऊर्जादाता' असे मोठे आश्वासन दिले होते, पण प्रत्यक्षात शेतकरी लोडशेडिंगमुळे त्रस्त आहेत. अनुदानाची रक्कमही वेळेत मिळत नाही. "सबसिडीच्या मोठमोठ्या आकड्यांमागे लपून सरकार शेतकऱ्यांना अंधारात ठेवत आहे," असा घणाघात करण्यात आला.

"मराठवाडा वॉटर ग्रीडची केवळ घोषणा"२०१८ पासून प्रस्तावित असलेला ४५ हजार कोटींचा मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प अद्यापही केवळ फायलीतच अडकलेला आहे. पाण्याच्या टंचाईने मराठवाडा आजही टँकरवर अवलंबून आहे. निधी, इच्छाशक्ती आणि अंमलबजावणीचा अभाव या तिन्ही गोष्टी प्रकल्पाच्या विलंबाचे कारण ठरत आहेत, असे निवेदनात स्पष्ट केले.

महिलांपासून वृद्धांपर्यंत, सरकारचा विश्वासघातमहिला सन्मान निधीच्या वितरणात दिरंगाई, उज्वला गॅस योजनेतील ठप्पावस्था, महिला सुरक्षेची दुरवस्था याकडेही लक्ष वेधण्यात आले. दररोज ७० महिलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांवरही सरकार मौन बाळगते, असे आरोप करण्यात आले. वृद्धांसाठी घोषित केलेली पेन्शनवाढ, स्वतंत्र ओपीडी सुविधा आदी गोष्टी फक्त आश्वासनापुरत्याच राहिल्या असल्याचेही नमूद करण्यात आले.

तरुणाईलाही गंडवले, नोकऱ्यांचे स्वप्न खोटे ठरले'छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र', 'एरोनॉटिकल हब', २५ लाख नोकऱ्या आणि विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती यासारख्या योजना फसव्या ठरल्या आहेत. "या सरकारमुळे बेरोजगारीचा उद्रेक झाला आहे," असा स्पष्ट उल्लेख निवेदनात आहे.

"जाहीरातबाजी थांबवा, कृती करा!"शिवसेनेच्या वतीने सरकारला इशारा देण्यात आला आहे की, जर या योजनांची प्रभावी अंमलबजावणी त्वरित केली नाही, तर जनतेचा उद्रेक होणार हे निश्चित आहे. केवळ गाजावाजा आणि प्रचारकी भाषणांवर न थांबता कृतीतूनच विश्वास मिळवावा, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

याप्रसंगी महानगरप्रमुख राजू वैद्य,उपजिल्हाप्रमुख किशोर कच्छवाह, विजय वाघमारे, चंद्रकांत गवई, संतोष जेजुरकर, संतोष खेंडके, अरविंद धिवर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात,हरीभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, विधानसभा संघटक गोपाल कुलकर्णी, दिग्विजय शेरखाने, शहर संघटक सचिन तायडे, महिला आघाडी सहसंपर्क संघटक दुर्गा भाटी, जिल्हा संघटक आशा दातार,जिल्हा समन्वयक विद्या अग्निहोत्री, महानगर संघटक सुकन्या भोसले, मीना फसाटे, शहर संघटक सुनिता सोनवणे, विधानसभा संघटक मीरा देशपांडे, राजश्री राणा आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरShiv SenaशिवसेनाAmbadas Danweyअंबादास दानवेFarmerशेतकरी