शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

सिमेंटचे जंगल वाढले, समस्या तशाच; साताऱ्याला जुनी ग्रामपंचायतच बरी होती म्हणण्याची वेळ

By साहेबराव हिवराळे | Updated: June 6, 2023 18:45 IST

काबाडकष्ट करून सर्वसामान्य लोकांनी येथे हौशीने घरे बांधली अथवा विकत घेतली. पण, त्यांना टँकर आणि जारच्या पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे.

छत्रपती संभाजीनगर : भूखंडांवर एक नव्हे तर पाच-पाच मजली इमारती उभा राहिल्या खऱ्या; पण ज्या कारणास्तव महानगरपालिकेत गेल्यावर पाणी तत्काळ तसेच इतर सेवासुविधा मिळतील, अशी आशा होती, त्या अद्यापही पदरी न पडल्याने सातारा परिसराची जुनी ग्रामपंचायत बरी होती, असे म्हणण्याची रहिवाशांवर वेळ आली आहे.

काबाडकष्ट करून सर्वसामान्य लोकांनी येथे हौशीने घरे बांधली अथवा विकत घेतली. पण, त्यांना टँकर आणि जारच्या पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे.

मनपाने अधिक लक्ष देण्याची गरजसमाजकल्याण विभाग, आदिवासी वसतिगृह असून, पोस्ट कार्यालय तसेच महावितरण कार्यालयदेखील आहे. मनपाने आरोग्य केंद्र देखील सुरू केलेले आहे. दवाखाने, शैक्षणिक संस्थादेखील असून, मोठमोठाली मंगल कार्यालये असल्याने परिसर नावारूपाला आलेला आहे. परंतु, पाणीपुरवठा कायमस्वरूपी करण्याची गरज आहे. टँकरच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे.

बांधकाम व्यवसायाकडे अधिक युवकजिल्हा परिषदेच्या शाळेची गुणवत्ता पाहता येथील विद्यार्थी संख्या दरवर्षी वाढलेलीच आहे. खासगी शाळांनाही लाजवेल अशी गुणवत्ता टिकून ठेवलेली असल्याने पालकही खूश आहेत. बांधकाम व्यवसायाकडे अधिक युवक वळल्याचे दिसते.- जमील पटेल

मंदिरामुळे अनेकांना रोजगारखंडोबा मंदिरामुळे भाविकांची गर्दी असते. त्यामुळे पाने फुले, हळदी-कुंकू, रेवड्या विक्रीतून बऱ्यापैकी व्यवसाय सुरू आहे. परंतु येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा मिळत नसल्याची ओरड आहे. सध्या मंदिराच्या जतन संवर्धनाचे काम शासनाकडून सुरू आहे. त्यात सुधारणा करण्याची मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल नरवडे, कडूबा शिराणे यांनी केली आहे.

पुलाखालून रस्ता कधी होणार?तिन्ही पूल प्रशासनाने तयार केले आणि ते वाहतुकीसाठी खुले केले असले तरी पावसाळ्यात पुलाखालून वाहने चालविणे किंवा वसाहतीची कनेक्टिव्हिटी कशी राहील याकडे अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. काम गतीने पूर्ण करावे.- फिरोज पटेल, माजी सरपंच

दलित वसाहतीला १२ एप्रिलनंतर पाणीच नाहीमनपाच्या सार्वजनिक विहिरीतून जुन्याच जलवाहिनीतून पाणीपुरवठा सातारा गावात आणि दलित वसाहतीत केला जातो. १२ एप्रिलनंतर पाणीपुरवठाच झालेला नाही.- अनिल जाधव

वीजपुरवठा कधीही खंडितसातारा परिसरातील वीजपुरवठा केव्हाही खंडित होतो. फ्यूज कॉल सेंटरवरही फोन उचलत नाहीत. याबाबत पूर्वसूचना त्वरित ग्राहकांना देणे गरजेचे आहे.- आबा चव्हाण

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका