शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
2
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
3
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
4
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
5
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
6
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
7
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
8
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
9
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
10
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
11
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
12
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
13
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
14
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
15
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
16
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
18
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
19
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
20
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!

सिमेंटचे जंगल वाढले, समस्या तशाच; साताऱ्याला जुनी ग्रामपंचायतच बरी होती म्हणण्याची वेळ

By साहेबराव हिवराळे | Updated: June 6, 2023 18:45 IST

काबाडकष्ट करून सर्वसामान्य लोकांनी येथे हौशीने घरे बांधली अथवा विकत घेतली. पण, त्यांना टँकर आणि जारच्या पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे.

छत्रपती संभाजीनगर : भूखंडांवर एक नव्हे तर पाच-पाच मजली इमारती उभा राहिल्या खऱ्या; पण ज्या कारणास्तव महानगरपालिकेत गेल्यावर पाणी तत्काळ तसेच इतर सेवासुविधा मिळतील, अशी आशा होती, त्या अद्यापही पदरी न पडल्याने सातारा परिसराची जुनी ग्रामपंचायत बरी होती, असे म्हणण्याची रहिवाशांवर वेळ आली आहे.

काबाडकष्ट करून सर्वसामान्य लोकांनी येथे हौशीने घरे बांधली अथवा विकत घेतली. पण, त्यांना टँकर आणि जारच्या पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे.

मनपाने अधिक लक्ष देण्याची गरजसमाजकल्याण विभाग, आदिवासी वसतिगृह असून, पोस्ट कार्यालय तसेच महावितरण कार्यालयदेखील आहे. मनपाने आरोग्य केंद्र देखील सुरू केलेले आहे. दवाखाने, शैक्षणिक संस्थादेखील असून, मोठमोठाली मंगल कार्यालये असल्याने परिसर नावारूपाला आलेला आहे. परंतु, पाणीपुरवठा कायमस्वरूपी करण्याची गरज आहे. टँकरच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे.

बांधकाम व्यवसायाकडे अधिक युवकजिल्हा परिषदेच्या शाळेची गुणवत्ता पाहता येथील विद्यार्थी संख्या दरवर्षी वाढलेलीच आहे. खासगी शाळांनाही लाजवेल अशी गुणवत्ता टिकून ठेवलेली असल्याने पालकही खूश आहेत. बांधकाम व्यवसायाकडे अधिक युवक वळल्याचे दिसते.- जमील पटेल

मंदिरामुळे अनेकांना रोजगारखंडोबा मंदिरामुळे भाविकांची गर्दी असते. त्यामुळे पाने फुले, हळदी-कुंकू, रेवड्या विक्रीतून बऱ्यापैकी व्यवसाय सुरू आहे. परंतु येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा मिळत नसल्याची ओरड आहे. सध्या मंदिराच्या जतन संवर्धनाचे काम शासनाकडून सुरू आहे. त्यात सुधारणा करण्याची मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल नरवडे, कडूबा शिराणे यांनी केली आहे.

पुलाखालून रस्ता कधी होणार?तिन्ही पूल प्रशासनाने तयार केले आणि ते वाहतुकीसाठी खुले केले असले तरी पावसाळ्यात पुलाखालून वाहने चालविणे किंवा वसाहतीची कनेक्टिव्हिटी कशी राहील याकडे अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. काम गतीने पूर्ण करावे.- फिरोज पटेल, माजी सरपंच

दलित वसाहतीला १२ एप्रिलनंतर पाणीच नाहीमनपाच्या सार्वजनिक विहिरीतून जुन्याच जलवाहिनीतून पाणीपुरवठा सातारा गावात आणि दलित वसाहतीत केला जातो. १२ एप्रिलनंतर पाणीपुरवठाच झालेला नाही.- अनिल जाधव

वीजपुरवठा कधीही खंडितसातारा परिसरातील वीजपुरवठा केव्हाही खंडित होतो. फ्यूज कॉल सेंटरवरही फोन उचलत नाहीत. याबाबत पूर्वसूचना त्वरित ग्राहकांना देणे गरजेचे आहे.- आबा चव्हाण

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका