शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
4
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
5
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
6
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
7
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
8
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
9
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
10
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
11
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
12
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
13
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
14
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
15
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
16
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
17
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
18
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
19
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
20
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंटचे जंगल वाढले, समस्या तशाच; साताऱ्याला जुनी ग्रामपंचायतच बरी होती म्हणण्याची वेळ

By साहेबराव हिवराळे | Updated: June 6, 2023 18:45 IST

काबाडकष्ट करून सर्वसामान्य लोकांनी येथे हौशीने घरे बांधली अथवा विकत घेतली. पण, त्यांना टँकर आणि जारच्या पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे.

छत्रपती संभाजीनगर : भूखंडांवर एक नव्हे तर पाच-पाच मजली इमारती उभा राहिल्या खऱ्या; पण ज्या कारणास्तव महानगरपालिकेत गेल्यावर पाणी तत्काळ तसेच इतर सेवासुविधा मिळतील, अशी आशा होती, त्या अद्यापही पदरी न पडल्याने सातारा परिसराची जुनी ग्रामपंचायत बरी होती, असे म्हणण्याची रहिवाशांवर वेळ आली आहे.

काबाडकष्ट करून सर्वसामान्य लोकांनी येथे हौशीने घरे बांधली अथवा विकत घेतली. पण, त्यांना टँकर आणि जारच्या पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे.

मनपाने अधिक लक्ष देण्याची गरजसमाजकल्याण विभाग, आदिवासी वसतिगृह असून, पोस्ट कार्यालय तसेच महावितरण कार्यालयदेखील आहे. मनपाने आरोग्य केंद्र देखील सुरू केलेले आहे. दवाखाने, शैक्षणिक संस्थादेखील असून, मोठमोठाली मंगल कार्यालये असल्याने परिसर नावारूपाला आलेला आहे. परंतु, पाणीपुरवठा कायमस्वरूपी करण्याची गरज आहे. टँकरच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे.

बांधकाम व्यवसायाकडे अधिक युवकजिल्हा परिषदेच्या शाळेची गुणवत्ता पाहता येथील विद्यार्थी संख्या दरवर्षी वाढलेलीच आहे. खासगी शाळांनाही लाजवेल अशी गुणवत्ता टिकून ठेवलेली असल्याने पालकही खूश आहेत. बांधकाम व्यवसायाकडे अधिक युवक वळल्याचे दिसते.- जमील पटेल

मंदिरामुळे अनेकांना रोजगारखंडोबा मंदिरामुळे भाविकांची गर्दी असते. त्यामुळे पाने फुले, हळदी-कुंकू, रेवड्या विक्रीतून बऱ्यापैकी व्यवसाय सुरू आहे. परंतु येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा मिळत नसल्याची ओरड आहे. सध्या मंदिराच्या जतन संवर्धनाचे काम शासनाकडून सुरू आहे. त्यात सुधारणा करण्याची मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल नरवडे, कडूबा शिराणे यांनी केली आहे.

पुलाखालून रस्ता कधी होणार?तिन्ही पूल प्रशासनाने तयार केले आणि ते वाहतुकीसाठी खुले केले असले तरी पावसाळ्यात पुलाखालून वाहने चालविणे किंवा वसाहतीची कनेक्टिव्हिटी कशी राहील याकडे अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. काम गतीने पूर्ण करावे.- फिरोज पटेल, माजी सरपंच

दलित वसाहतीला १२ एप्रिलनंतर पाणीच नाहीमनपाच्या सार्वजनिक विहिरीतून जुन्याच जलवाहिनीतून पाणीपुरवठा सातारा गावात आणि दलित वसाहतीत केला जातो. १२ एप्रिलनंतर पाणीपुरवठाच झालेला नाही.- अनिल जाधव

वीजपुरवठा कधीही खंडितसातारा परिसरातील वीजपुरवठा केव्हाही खंडित होतो. फ्यूज कॉल सेंटरवरही फोन उचलत नाहीत. याबाबत पूर्वसूचना त्वरित ग्राहकांना देणे गरजेचे आहे.- आबा चव्हाण

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका