शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

अजिंठा घाटात बस उलटली, कुंपणामुळे दरीपासून संरक्षण मिळाल्याने मोठा अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 20:20 IST

या अपघातात ९ प्रवाशी जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे

सिल्लोड: एसटी बसचालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने पुणे ते रावेर बस अजिंठा घाटात (घोडी पटांगण जवळ) उलटली. दैव बलवत्तर होते म्हणून बस एक हजार फूट खोल दरीत गेली नाही. या अपघातात  मात्र ९ प्रवाशी जखमी झाले असून त्यातील तिघे गंभीर आहेत.  ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास अजिंठा घाटात घडली.

पुणे ते रावेर एसटी बस  (एमएच ४० वाय ५१९७)  शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास रावेर कडे जात होती. घाटात समोरून जळगावकडून एक ट्रक व त्यामागे एक एसटी बस येत होती. पाठीमागून ट्रकला बस ओव्हरटेक करत होती. ही बाब समोरून येणाऱ्या पुणे ते रावेर बसचे चालक दीपक सोनवणे यांच्या लक्षात आली. अपघात होऊ नये म्हणून त्यांनी अचानक ब्रेक लावला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुणे ते रावेर बस घाटातून डोंगरात जाऊन उलटली. सुदैवाने ही बस डोंगराला असलेल्या तारेमुळे खोल असलेल्या दरीत गेली नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

या अपघातात पुणे रावेर बस मधील प्रवासी सुमित्रा दिनकर निर्खे (४८) सुशिलाबाई दिनकर निर्खे (७०) विजय हरी सूर्यवंशी (७२)  तिघे रा.जामनेर जि.जळगाव हे गंभीर जखमी झाले. तर याच बस मधील प्रवासी सरुबाई शामराव पाटील (६५), निखिल किरण पाटील (१३) रा.श्रीरामपूर, वसंत विठ्ठल पठारे (६५) संध्या वसंतराव पठारे (६३)रा.सोयगाव ,जयमाला विजय सूर्यवंशी (६०) रा.जामनेर ,ज्योती साईचंद्र बासनेवल (४०) रा.छत्रपती संभाजीनगर असे एकूण ९ प्रवाशी या अपघातात जखमी झाले. सर्व जखमी प्रवाशांना अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी काहींना जामनेर तर काहींना छत्रपती संभाजी नगर येथे हलविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अजिंठा ग्रामीण रुग्णालयात डॉ.जी.बी.मांगिडवार,श्रीमती ज्योती गिरी,संतोषी जाधव,स्वाती भोरकडे,मोनाली बनसोडे,गणेश मांगुळकर,बोर्डे,नरवडे,वाघमारे या आरोग्य कर्मचाऱ्यांनी जखमी वर उपचार केले.अजिंठा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी पोलीस फोर्स घेऊन घटनास्थळी भेट देऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले व या प्रकरणी पोलीस ठाण्यात अपघात दाखल केला.

मोठा अपघात टळला बसमध्ये एकूण ६६ प्रवाशी प्रवास करत होते. मात्र सुदैवाने इतर प्रवाशी  गंभीर जखमी झाले नाहीत. पुणे रावेर बस चालकाने ब्रेक लावला नसता तर बस समोरील ट्रक आणि त्याला ओव्हरटेक करणारी दुसरी बस यांचा अपघात झाला असता. अजिंठा घाटातील रस्ता अरुंद असल्याने येथे नेहमी अपघात होत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघात