शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

अजिंठा घाटात बस उलटली, कुंपणामुळे दरीपासून संरक्षण मिळाल्याने मोठा अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 20:20 IST

या अपघातात ९ प्रवाशी जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे

सिल्लोड: एसटी बसचालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने पुणे ते रावेर बस अजिंठा घाटात (घोडी पटांगण जवळ) उलटली. दैव बलवत्तर होते म्हणून बस एक हजार फूट खोल दरीत गेली नाही. या अपघातात  मात्र ९ प्रवाशी जखमी झाले असून त्यातील तिघे गंभीर आहेत.  ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास अजिंठा घाटात घडली.

पुणे ते रावेर एसटी बस  (एमएच ४० वाय ५१९७)  शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास रावेर कडे जात होती. घाटात समोरून जळगावकडून एक ट्रक व त्यामागे एक एसटी बस येत होती. पाठीमागून ट्रकला बस ओव्हरटेक करत होती. ही बाब समोरून येणाऱ्या पुणे ते रावेर बसचे चालक दीपक सोनवणे यांच्या लक्षात आली. अपघात होऊ नये म्हणून त्यांनी अचानक ब्रेक लावला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुणे ते रावेर बस घाटातून डोंगरात जाऊन उलटली. सुदैवाने ही बस डोंगराला असलेल्या तारेमुळे खोल असलेल्या दरीत गेली नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

या अपघातात पुणे रावेर बस मधील प्रवासी सुमित्रा दिनकर निर्खे (४८) सुशिलाबाई दिनकर निर्खे (७०) विजय हरी सूर्यवंशी (७२)  तिघे रा.जामनेर जि.जळगाव हे गंभीर जखमी झाले. तर याच बस मधील प्रवासी सरुबाई शामराव पाटील (६५), निखिल किरण पाटील (१३) रा.श्रीरामपूर, वसंत विठ्ठल पठारे (६५) संध्या वसंतराव पठारे (६३)रा.सोयगाव ,जयमाला विजय सूर्यवंशी (६०) रा.जामनेर ,ज्योती साईचंद्र बासनेवल (४०) रा.छत्रपती संभाजीनगर असे एकूण ९ प्रवाशी या अपघातात जखमी झाले. सर्व जखमी प्रवाशांना अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी काहींना जामनेर तर काहींना छत्रपती संभाजी नगर येथे हलविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अजिंठा ग्रामीण रुग्णालयात डॉ.जी.बी.मांगिडवार,श्रीमती ज्योती गिरी,संतोषी जाधव,स्वाती भोरकडे,मोनाली बनसोडे,गणेश मांगुळकर,बोर्डे,नरवडे,वाघमारे या आरोग्य कर्मचाऱ्यांनी जखमी वर उपचार केले.अजिंठा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी पोलीस फोर्स घेऊन घटनास्थळी भेट देऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले व या प्रकरणी पोलीस ठाण्यात अपघात दाखल केला.

मोठा अपघात टळला बसमध्ये एकूण ६६ प्रवाशी प्रवास करत होते. मात्र सुदैवाने इतर प्रवाशी  गंभीर जखमी झाले नाहीत. पुणे रावेर बस चालकाने ब्रेक लावला नसता तर बस समोरील ट्रक आणि त्याला ओव्हरटेक करणारी दुसरी बस यांचा अपघात झाला असता. अजिंठा घाटातील रस्ता अरुंद असल्याने येथे नेहमी अपघात होत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघात