शहरं
Join us  
Trending Stories
1
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पती-पत्नीचे वाद सोडवणारा पोलिसांचा ‘भरोसा सेल’च पडला एकाकी

By सुमित डोळे | Updated: August 3, 2024 14:35 IST

संवेदनशील विभागाचा कारभार अवघ्या ३ कर्मचाऱ्यांवर; ४ वाजताच बंद, नेहमी वर्दळ राहणाऱ्या कार्यालयात आता स्मशान शांतता

छत्रपती संभाजीनगर : पती-पत्नीचे वाद सोडवून त्यांना पुन्हा गुण्यागोविंदाने एकत्र आणण्याची जबाबदारी असलेला ‘भरोसा सेल’चा आता एकाकी पडला आहे. एकेकाळी सर्वाधिक वर्दळ राहणाऱ्या या कार्यालयात आता स्मशान शांतता पाहायला मिळत आहे. अवघ्या ३ कर्मचाऱ्यांवर चालणारा या भरोसा सेलचा आता ‘भरोसा’च उरला नसण्याची वेळ तक्रारदारांवर आली आहे.

कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळीसारखी प्रकरणे सोडवण्यासाठी २०१७ मध्ये पहिल्यांदा राज्य सरकारने भरोसा सेल संकल्पनेची घोषणा केली होती. त्यानंतर प्रत्येक शहर व जिल्हास्तरावर पोलिस आयुक्त व अधीक्षक कार्यालयात हा सेल सुरू करण्यात आला. त्याला पोलिस निरीक्षक पदाचा अधिकारी प्रभारी म्हणून नेणे बंधनकारक असून स्वतंत्र दालन, कर्मचारी व समुपदेशकांची नियुक्ती करण्याचे आदेश आहेत. किरकोळ कारणातूनही पती-पत्नीमध्ये घटस्फोट, विभक्त होण्यासह एकमेकांना गंभीर मारहाण करण्यापर्यंत वाद पोहोचतात. समुपदेशनानंतरही समाधान न झाल्यास अखेर प्रकरण न्यायालय किंवा पोलिस ठाण्यांकडे वर्ग करण्यात येते. वकील, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्त्यांसह पोलिस अधिकारी यात समुपदेशन करुन दाम्पत्यांमध्ये समेट घडवण्यासाठी प्रयत्न करतात.

कौटुंबिक कलहांत वाढचार वर्षांमध्ये कौटुंबिक कलहांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. २०२१मध्ये कौटुंबिक वादाच्या २,०६७ तक्रारींपैकी केवळ ४४१ प्रकरणांत समझोत्यासाठी पोलिसांना यश आले, तर २०२४च्या चार महिन्यांमध्येच शहरात ५४६ पती-पत्नीचे वाद पोलिसांपर्यंत पोहोचले.

वर्षे - तक्रारी -समझोता२०२१ -२०६७ -४४१२०२२ - २२२६ -५१०२०२३ -१८७३ -३८३२०२४ -५४६ २०९

वर्षे -कौटुंबिक हिंसाचाराचे गुन्हे२०२० -२०६२०२१ -२८८२०२२ -२७३२०२३ -२४९

दुपारी ३ला विभाग बंद-सिल्लेखाना परिसरात शहर पोलिसांच्या ‘भरोसा सेल’साठी मनपाच्या इमारतीत स्वतंत्र मजला देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत स्वतंत्र निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली ८ कर्मचारी व समुपदेशक येथे कार्यरत होते.-गेल्या काही दिवसांपासून मात्र केवळ २ ते ३ कर्मचारीच कार्यरत आहेत.-सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहणारा विभाग आता दुपारी ३ वाजताच बंद होतो, हे विशेष.

पोलिस भरती, सेवानिवृत्ती तर बदली-गुरुवारी दुपारी २:३० वाजता विभागाची पाहणी केली असता दोन समुपदेशक महिला तर एक पोलिस कर्मचारी विभागात होते. बाहेर तक्रारदार प्रतीक्षेत बसले होते. दिवसाला किमान २० तक्रारदार असतात. त्यांची तक्रार ऐकून घेण्यासाठी देखील तेथे कोणी उपस्थित नसते.-यातील एक कर्मचारी नुकतेच सेवानिवृत्त झाले. एका कर्मचाऱ्याची बदली झाली तर उर्वरित सर्व कर्मचारी पोलिस भरतीत व्यस्त असल्याचे सांगण्यात आले. तक्रारदारांना मात्र पोलिस विभागाच्या या अती ‘व्यस्ततेचा’ मनस्ताप सहन करावा लागत आहे.

टॅग्स :PoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद