शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

पती-पत्नीचे वाद सोडवणारा पोलिसांचा ‘भरोसा सेल’च पडला एकाकी

By सुमित डोळे | Updated: August 3, 2024 14:35 IST

संवेदनशील विभागाचा कारभार अवघ्या ३ कर्मचाऱ्यांवर; ४ वाजताच बंद, नेहमी वर्दळ राहणाऱ्या कार्यालयात आता स्मशान शांतता

छत्रपती संभाजीनगर : पती-पत्नीचे वाद सोडवून त्यांना पुन्हा गुण्यागोविंदाने एकत्र आणण्याची जबाबदारी असलेला ‘भरोसा सेल’चा आता एकाकी पडला आहे. एकेकाळी सर्वाधिक वर्दळ राहणाऱ्या या कार्यालयात आता स्मशान शांतता पाहायला मिळत आहे. अवघ्या ३ कर्मचाऱ्यांवर चालणारा या भरोसा सेलचा आता ‘भरोसा’च उरला नसण्याची वेळ तक्रारदारांवर आली आहे.

कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळीसारखी प्रकरणे सोडवण्यासाठी २०१७ मध्ये पहिल्यांदा राज्य सरकारने भरोसा सेल संकल्पनेची घोषणा केली होती. त्यानंतर प्रत्येक शहर व जिल्हास्तरावर पोलिस आयुक्त व अधीक्षक कार्यालयात हा सेल सुरू करण्यात आला. त्याला पोलिस निरीक्षक पदाचा अधिकारी प्रभारी म्हणून नेणे बंधनकारक असून स्वतंत्र दालन, कर्मचारी व समुपदेशकांची नियुक्ती करण्याचे आदेश आहेत. किरकोळ कारणातूनही पती-पत्नीमध्ये घटस्फोट, विभक्त होण्यासह एकमेकांना गंभीर मारहाण करण्यापर्यंत वाद पोहोचतात. समुपदेशनानंतरही समाधान न झाल्यास अखेर प्रकरण न्यायालय किंवा पोलिस ठाण्यांकडे वर्ग करण्यात येते. वकील, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्त्यांसह पोलिस अधिकारी यात समुपदेशन करुन दाम्पत्यांमध्ये समेट घडवण्यासाठी प्रयत्न करतात.

कौटुंबिक कलहांत वाढचार वर्षांमध्ये कौटुंबिक कलहांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. २०२१मध्ये कौटुंबिक वादाच्या २,०६७ तक्रारींपैकी केवळ ४४१ प्रकरणांत समझोत्यासाठी पोलिसांना यश आले, तर २०२४च्या चार महिन्यांमध्येच शहरात ५४६ पती-पत्नीचे वाद पोलिसांपर्यंत पोहोचले.

वर्षे - तक्रारी -समझोता२०२१ -२०६७ -४४१२०२२ - २२२६ -५१०२०२३ -१८७३ -३८३२०२४ -५४६ २०९

वर्षे -कौटुंबिक हिंसाचाराचे गुन्हे२०२० -२०६२०२१ -२८८२०२२ -२७३२०२३ -२४९

दुपारी ३ला विभाग बंद-सिल्लेखाना परिसरात शहर पोलिसांच्या ‘भरोसा सेल’साठी मनपाच्या इमारतीत स्वतंत्र मजला देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत स्वतंत्र निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली ८ कर्मचारी व समुपदेशक येथे कार्यरत होते.-गेल्या काही दिवसांपासून मात्र केवळ २ ते ३ कर्मचारीच कार्यरत आहेत.-सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहणारा विभाग आता दुपारी ३ वाजताच बंद होतो, हे विशेष.

पोलिस भरती, सेवानिवृत्ती तर बदली-गुरुवारी दुपारी २:३० वाजता विभागाची पाहणी केली असता दोन समुपदेशक महिला तर एक पोलिस कर्मचारी विभागात होते. बाहेर तक्रारदार प्रतीक्षेत बसले होते. दिवसाला किमान २० तक्रारदार असतात. त्यांची तक्रार ऐकून घेण्यासाठी देखील तेथे कोणी उपस्थित नसते.-यातील एक कर्मचारी नुकतेच सेवानिवृत्त झाले. एका कर्मचाऱ्याची बदली झाली तर उर्वरित सर्व कर्मचारी पोलिस भरतीत व्यस्त असल्याचे सांगण्यात आले. तक्रारदारांना मात्र पोलिस विभागाच्या या अती ‘व्यस्ततेचा’ मनस्ताप सहन करावा लागत आहे.

टॅग्स :PoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद