शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

नगरसेवकांचा थयथयाट

By admin | Updated: December 28, 2015 23:54 IST

औरंगाबाद : सादर होण्याआधीच सुधारित शहर विकास आराखड्यातील माहिती बाहेर आल्याच्या कारणावरून सोमवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व गोंधळ झाला.

औरंगाबाद : सादर होण्याआधीच सुधारित शहर विकास आराखड्यातील माहिती बाहेर आल्याच्या कारणावरून सोमवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व गोंधळ झाला. आराखड्यातील माहिती छापून आलेले लोकमतचे अंक दाखवीत सदस्यांनी गोपनीयता भंगाचा आरोप केला, तसेच अहवाल फोडणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी केली. महापौरांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यावर शेवटी आराखड्याचे बंद पाकीट स्वीकारण्यात आले. त्यानंतर लगेचच ही सभा आठवडाभरासाठी तहकूब करण्यात आली. आता पुढील सभा झाल्यानंतर हा आराखडा जनतेसाठी प्रसिद्ध केला जाणार आहे. राज्याच्या नगररचना खात्याने दीड महिन्यापूर्वीच सुधारित शहर विकास आराखड्याचे बंद पाकीट मनपा आयुक्तांच्या स्वाधीन केले होते. हा आराखडा आज सर्वसाधारण सभेत ठेवला जाणार होता; परंतु त्याआधीच आराखड्यातील ढोबळ तरतुदींची माहिती ‘लोकमत’च्या हाती आली. लोकमतमध्ये त्याविषयीचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले. त्यामुळे सर्वसाधारण सभा सुरू होताच नगरसेविका समिना शेख यांनी हा मुद्दा उपस्थित केला. हा गोपनीयतेचा भंग आहे, त्यामुळे हा अहवाल फुटला कसा याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. शिवसेनेचे राजू वैद्य, राजेंद्र जंजाळ, एमआयएमचे अब्दुल नाईकवाडी, काँग्रेसचे भाऊसाहेब जगताप, भाजपचे बापू घडामोडे आदींनीही लोकमतचे अंक झळकविले. अधिकाऱ्यांकडूनच हा अहवाल फुटल्याचा आरोप या नगरसेवकांनी केला. याचदरम्यान शिवसेनेचे रावसाहेब आमले यांनी हा आराखडा महिनाभरापूर्वीच बिल्डरांना मिळाला असल्याचा गंभीर आरोप केला. काही नगरसेवकांनी तर हा आराखडा काही दिवस आधीपासूनच व्हॉटस् अ‍ॅपवर फिरत असल्याचीही माहिती दिली. त्यामुळे गोंधळ आणखीनच वाढला. त्यात काही जणांनी अशा परिस्थितीत आराखडा स्वीकारणे योग्य होणार नाही अशी सूचना केली. नगरसेवक नंदकुमार घोडेले, विकास जैन, अंकिता विधाते यांनी त्याला विरोध केला. मनपाच्या सभेत प्रभारी आयुक्त आणि नगररचना खात्याच्या अधिकाऱ्यांनी महापौरांना सुधारित विकास आराखड्याचे बंद पाकीट स्वाधीन केले. नवीन विकास आराखड्याचे नकाशे तसेच विद्यमान जमीन वापर नकाशाचाही यात समावेश आहे; परंतु यातील विद्यमान जमीन वापर नकाशावर आयुक्तांची किंवा नगररचनाच्या अधिकाऱ्यांची स्वाक्षरीच नव्हती. त्यावर काही सदस्यांनी आक्षेप घेतला. सुधारित शहर विकास आराखडा तयार करण्याचे काम राज्याच्या नगररचना खात्याच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. हा आराखडा तयार करण्याची जबाबदारी कोल्हापूर विभागाचे उपसंचालक रजा खान यांच्याकडे होती. त्यांनी हा आराखडा तयार केला. त्यानंतर आता नगररचना खात्याने या आराखड्याबाबतची पुढील जबाबदारी लातूर विभागाचे उपसंचालक शिवराज पाटील यांच्याकडे सोपविली आहे. हा आराखडा सर्वसाधारण सभेत मांडताना त्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते; परंतु ते गैरहजर राहिले. त्यांच्या वतीने सहायक नगररचनाकार दर्जाचे एक कनिष्ठ दर्जाचे अधिकारी सभेला उपस्थित होते. त्यावरही अनेक सदस्यांनी आक्षेप घेतला.