शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

दामिनी पोलीस पथकाबद्दल तरुण वर्गात दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 18:48 IST

तरुण मुला- मुलींना एकटे पाहून त्यांच्याकडून पैसे लुटण्याचा प्रकार

ठळक मुद्दे पथक मुला- मुलींना पकडते व त्यांच्याकडे पैशाची मागणी करते.

औरंगाबाद : महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नेमण्यात आलेल्या दामिनी पथकाची सध्या तरुण वर्गात दहशत वाढली आहे. तरुण मुला- मुलींना एकटे पाहून त्यांच्याकडून पैसे लुटण्याच्या आमिषाने हे पथक मुला- मुलींना पकडते व त्यांच्याकडे पैशाची मागणी करते.  हा अनुभव आता नवीन राहिला नाही.

शहरातील विविध पर्यटनस्थळी दामिनी पथकाच्या गाड्या बघायला मिळतात. दामिनी पथक हे महिलांच्या सुरक्षेसाठी आहे. मुलगा आणि मुलगी दोघे एकटे दिसले की, त्यांना वाईट- साईट बोलले जाते. धमकावले जाते. अनेकदा महिला रक्षकांकडून शिवीगाळ केली जाते. मुलगा-मुलगी प्रेमीयुगुल असो की मित्र-मैत्रिणी, त्यांचा खालच्या भाषेत उद्धार केला जातो. घाबरलेल्या तरुणांकडे हे रक्षक पैशाची मागणी करतात. मोबाईल जप्त करतात. मुलगा- मुलगी रस्त्याने बोलत जात असले तरी हे पथक त्यांना त्रास देते. विशेषत: विद्यापीठ परिसरात हा त्रास वाढला आहे.

यासंदर्भात सत्यजित मस्के, पल्लवी बोरडकर, अन्वय गायकवाड, योगेश बहादुरे, भगवान श्रावणे व आकाश गायकवाड यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. सत्यजित मस्के म्हणाला, समाजाला सुरक्षा देण्यासाठी निर्माण झालेल्या पोलीस यंत्रणेचा एक भाग असलेल्या दामिनी पथकाकडून विद्यापीठ परिसरात गस्त घालत असताना नाहक त्रास देण्यात येत आहे. विनाकारण दमदाटी केली जात आहे. या पथकाची तक्रार आम्ही विद्यापीठ प्रशासनाकडे केली होती. परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. मनस्ताप देण्याचे काम या पथकाकडून होत आहे. 

मुलींसोबत होणारी छेडछाड रोखण्यासाठी दामिनी पथकाची स्थापना  झालेली आहे. परंतु छेडछाड, मित्र-मैत्रिणी, बहीण-भाऊ यांच्यातील फरक दामिनी पथकाला समजायला हवा. विद्यापीठ आवारात सातच्या नंतर मुले- मुली गप्पा मारीत असतील तर त्यांना अडविण्याची काय गरज, असा सवाल पल्लवी बोरडकर या मुलीने विचारला आहे. व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा घालण्याचे काम दामिनी पथकाकडून होत आहे. मुला- मुलींना उठाबशा काढायला लावणे, पैशाची मागणी करणे, घाबरवून सोडणे हे प्रकार वाढलेले आहेत. याला वेळीच आळा घालण्याची मागणी अन्वय गायकवाड याने केली आहे. दामिनी पथकाची गरज आहे. परंतु  बऱ्याचदा केवळ संशय म्हणून मुला-मुलींना अडवलं जातं व मानसिक त्रास देण्याची भूमिका घेतली जाते, हे चुकीचे आहे, असे योगेश बहादुरे यांचे म्हणणे पडले. भगवान श्रावणे व आकाश गायकवाड हेही दामिनी पथक व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच करीत असल्याचा आरोप केला आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादStudentविद्यार्थीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी