शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

स्कूलबस चुकल्याने टेन्शन, आई-वडिलांसह शिक्षकांच्या भीतीने मुलाने थेट घरच सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 14:30 IST

पुंडलिकनगर पोलिसांची शोधासाठी धावाधाव; कोणाला आढळल्यास कळवण्याचे पोलिसांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : उशिरा उठल्याने आठवड्याभरात तीन वेळा स्कूल बस सुटली. त्यावरून कुटुंबाने त्याला समजावूनही सांगितले. मात्र, बुधवारी देखील अवघ्या सात मिनिटांच्या फरकाने बस सुटल्याच्या तणावातून १४ वर्षीय इंद्रसेन गजानन देशमुख हा घरी परतलाच नाही. या घटनेला ४८ तास उलटले असून इंद्रसेन बेपत्ताच झाल्याची धक्कादायक बाब गुरुवारी समोर आली. त्याच्या शोधासाठी पुंडलिकनगर पोलिसांसह कुटुंबाची गुरुवारी रात्रीपर्यंत धावाधाव सुरू होती.

कृषी यंत्रांचे व्यापारी गजानन देशमुख कुटुंबासह तापडिया पार्कमध्ये राहतात. त्यांचा १४ वर्षीय मुलगा इंद्रसेन शाळेत बसने ये-जा करतो. ३० जुलै रोजी इंद्रसेन शाळेसाठी घराबाहेर पडला. मात्र, दुपारी ३ वाजूनही तो परतला नाही. चिंताग्रस्त आईने शाळेत संपर्क साधल्यावर शिक्षकांनी तो शाळेत आला नसल्याचे सांगितले. बसचालकाने देखील तो बसमध्ये आलाच नसल्याचे सांगितले. यामुळे देखमुख कुटुंब पुरते घाबरून गेले. त्यांनी तत्काळ पुंडलिकनगरचे पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांच्याकडे तक्रार केली. अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलीस उपनिरीक्षक सुनील म्हस्के यांनी तत्काळ त्याचा शोध सुरू केला.

रागावण्याची भीतीइंद्रसेनची बस साधारण ६:५० पर्यंत घरापर्यंत जाते. मात्र, गेल्या काही दिवसांत इंद्रसेनकडून काही मिनिटांच्या उशिरामुळे बस सुटली. त्यावरून आई-वडिलांनी त्याला समजावून सांगितले. बुधवारी देखील ६:५० वाजता बस येऊन गेली. तर इंद्रसेन ६:५७ वाजता पोहोचला. तोपर्यंत बस गेल्याचे कळताच तो तणावाखाली गेला असावा. आता आई-वडील, शिक्षकही रागावतील, या भीतीनेच तो निघून गेल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

पाचोडपर्यंत शोधपोलिस तपासात इंद्रसेन घरातून थेट सिडको बसस्थानकावर पोहोचला. तेथे एकाला बीडला जायचे असल्याचे सांगत मदत मागत पाचोडपर्यंत पोहोचला. तेथून पुढे तो कुठे गेला, हे कळले नाही. तो मनाने गेला की त्याला पुढे पळवले गेले, याचा पोलिस तपास करत आहेत.

काय म्हणतात मानसोपचारतज्ज्ञ?माझं कोणीच ऐकत नाही, मला समजून घेत नाही, घेणार नाही, ही भावना निर्माण झाल्यावर मुले असे पाऊल उचलण्याची शक्यता असते. इतर मुलांकडून चिडणे, शिक्षकांच्या रागावण्याच्या भीतीने निराशेत समजून घेणाऱ्या व्यक्तीच्या शोधात मुले घर सोडतात. नैराश्य, चिंता आणि असुरक्षिततेची भावना सतावत राहते. अशा प्रकरणात पालकांनी शांतपणे, एकांतात मुलांशी संवाद साधायला हवा. मुलांच्या भावना समजून घ्याव्यात. प्रेमाने, समजुतीने आणि सकारात्मकतेने मार्गदर्शन करावं. आपली बाजू समजून घेतली जातेय, ही भावना मुलांमध्ये निर्माण हाेणे अत्यंत आवश्यक असते. चिडचिडपणा, राग वाढत असल्यास तज्ज्ञांकडून समुपदेशन घ्यावे.- संदीप शिसाेदिया, मानसोपचारतज्ज्ञ.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर