शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

स्कूलबस चुकल्याने टेन्शन, आई-वडिलांसह शिक्षकांच्या भीतीने मुलाने थेट घरच सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 14:30 IST

पुंडलिकनगर पोलिसांची शोधासाठी धावाधाव; कोणाला आढळल्यास कळवण्याचे पोलिसांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : उशिरा उठल्याने आठवड्याभरात तीन वेळा स्कूल बस सुटली. त्यावरून कुटुंबाने त्याला समजावूनही सांगितले. मात्र, बुधवारी देखील अवघ्या सात मिनिटांच्या फरकाने बस सुटल्याच्या तणावातून १४ वर्षीय इंद्रसेन गजानन देशमुख हा घरी परतलाच नाही. या घटनेला ४८ तास उलटले असून इंद्रसेन बेपत्ताच झाल्याची धक्कादायक बाब गुरुवारी समोर आली. त्याच्या शोधासाठी पुंडलिकनगर पोलिसांसह कुटुंबाची गुरुवारी रात्रीपर्यंत धावाधाव सुरू होती.

कृषी यंत्रांचे व्यापारी गजानन देशमुख कुटुंबासह तापडिया पार्कमध्ये राहतात. त्यांचा १४ वर्षीय मुलगा इंद्रसेन शाळेत बसने ये-जा करतो. ३० जुलै रोजी इंद्रसेन शाळेसाठी घराबाहेर पडला. मात्र, दुपारी ३ वाजूनही तो परतला नाही. चिंताग्रस्त आईने शाळेत संपर्क साधल्यावर शिक्षकांनी तो शाळेत आला नसल्याचे सांगितले. बसचालकाने देखील तो बसमध्ये आलाच नसल्याचे सांगितले. यामुळे देखमुख कुटुंब पुरते घाबरून गेले. त्यांनी तत्काळ पुंडलिकनगरचे पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांच्याकडे तक्रार केली. अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलीस उपनिरीक्षक सुनील म्हस्के यांनी तत्काळ त्याचा शोध सुरू केला.

रागावण्याची भीतीइंद्रसेनची बस साधारण ६:५० पर्यंत घरापर्यंत जाते. मात्र, गेल्या काही दिवसांत इंद्रसेनकडून काही मिनिटांच्या उशिरामुळे बस सुटली. त्यावरून आई-वडिलांनी त्याला समजावून सांगितले. बुधवारी देखील ६:५० वाजता बस येऊन गेली. तर इंद्रसेन ६:५७ वाजता पोहोचला. तोपर्यंत बस गेल्याचे कळताच तो तणावाखाली गेला असावा. आता आई-वडील, शिक्षकही रागावतील, या भीतीनेच तो निघून गेल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

पाचोडपर्यंत शोधपोलिस तपासात इंद्रसेन घरातून थेट सिडको बसस्थानकावर पोहोचला. तेथे एकाला बीडला जायचे असल्याचे सांगत मदत मागत पाचोडपर्यंत पोहोचला. तेथून पुढे तो कुठे गेला, हे कळले नाही. तो मनाने गेला की त्याला पुढे पळवले गेले, याचा पोलिस तपास करत आहेत.

काय म्हणतात मानसोपचारतज्ज्ञ?माझं कोणीच ऐकत नाही, मला समजून घेत नाही, घेणार नाही, ही भावना निर्माण झाल्यावर मुले असे पाऊल उचलण्याची शक्यता असते. इतर मुलांकडून चिडणे, शिक्षकांच्या रागावण्याच्या भीतीने निराशेत समजून घेणाऱ्या व्यक्तीच्या शोधात मुले घर सोडतात. नैराश्य, चिंता आणि असुरक्षिततेची भावना सतावत राहते. अशा प्रकरणात पालकांनी शांतपणे, एकांतात मुलांशी संवाद साधायला हवा. मुलांच्या भावना समजून घ्याव्यात. प्रेमाने, समजुतीने आणि सकारात्मकतेने मार्गदर्शन करावं. आपली बाजू समजून घेतली जातेय, ही भावना मुलांमध्ये निर्माण हाेणे अत्यंत आवश्यक असते. चिडचिडपणा, राग वाढत असल्यास तज्ज्ञांकडून समुपदेशन घ्यावे.- संदीप शिसाेदिया, मानसोपचारतज्ज्ञ.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर