शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मोफत जेवणासाठी दहा लाखांची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 22:38 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सोमवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या प्रश्नावर चर्चा करून दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मोफत जेवणासाठी दहा लाख रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘विद्यार्थ्यांना दुष्काळ आला की फुकट खायची सवय लागते’ या कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या वक्तव्यामुळे सर्वत्र टीका आणि निषेध व्यक्त होत होता.

ठळक मुद्देव्यवस्थापन परिषद : कुलगुरूंच्या वक्तव्यानंतर अखेर दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा, माहिती लपवल्यावरून सदस्यांनी प्रशासनाला धरले धारेवर

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सोमवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या प्रश्नावर चर्चा करून दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मोफत जेवणासाठी दहा लाख रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘विद्यार्थ्यांना दुष्काळ आला की फुकट खायची सवय लागते’ या कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या वक्तव्यामुळे सर्वत्र टीका आणि निषेध व्यक्त होत होता.बैठकीस कुलगुरू डॉ.चोपडे, प्रकुलगुरू डॉ़ अशोक तेजनकर, कुलसचिव डॉ़ साधना पांडे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ़ किशोर शितोळे, डॉ़ फुलचंद सलामपुरे, डॉ़ वाल्मीक सरवदे, संजय निंबाळकर, डॉ़ शंकर अंभोरे, डॉ़ राजेश करपे, डॉ़ नरेंद्र काळे, डॉ़ राहुल म्हस्के, डॉ़ वैशाली खापर्डे उपस्थित होते़ गेल्या काही दिवसांपासून दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मोफत जेवणाची व्यवस्था करण्याची मागणी होत होती. त्यासाठी विद्यापीठाने दहा लाख रुपयांची तरतूद करावी आणि उर्वरित रक्कम सामाजिक संस्थांकडून केली जाईल, अशी बाजू मांडण्यात आली होती. एकीकडे दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न गंभीर बनत असताना कुलगुरूंच्या वक्तव्याने सर्वत्र टीका केली जात होती. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत यावर गंभीर चर्चा होण्याचे संकेत मिळाले होते. बैठकीत सदस्यांनी विद्यार्थ्यांच्या जेवणाची परिस्थिती मांडली. अखेर सर्वांच्या एकमताने दहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ निधीतून १० लाख रुपये खर्च करण्यासाठी मान्यता दिली. तीन ते चार महिने विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे. बैठकीस डॉ. नरेंद्र काळे, डॉ. राजेश करपे, किशोर शितोळे, संजय निंबाळकर, डॉ. शंकर अंभोरे आदी उपस्थित होते.संशोधकांचा पेचपेट परीक्षा झाली. त्यावेळी एका-एका विषयासाठी दोनशे ते तीनशे विद्यार्थ्यांनी अर्ज केले. परंतु जागा ४० ते ६० असतात. पुणे विद्यापीठाने विद्या परिषदेत निवृत्तीनंतरही प्राध्यापकांना विद्यार्थी घेता येणार, असा निर्णय घेतला. आपल्या येथे पेट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्या तुलनेत गाईड कमी आहेत. परंतु विद्यार्थ्यांना संशोधन करता आले पाहिजे. त्यामुळे आपल्याकडेही वयाची अट वाढविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यास कुलगुरूंनी संमती दर्शविली. आगामी कालावधीत निर्णय घेऊन यूजीसीकडे हा विषय पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.‘नॅक’वरून गोंधळबैठकीच्या सुरुवातीलाच नॅकच्या तयारीचा आढावा घेण्यात आला़ १३ ते १५ डिसेंबरदरम्यान नॅकच्या धर्तीवर घेण्यात आलेल्या रंगीत तालमीत राज्याबाहेरील दहा तज्ज्ञांवर किती खर्च झाला, त्यांनी दिलेला अहवाल, उपाययोजना यासंदर्भात सदस्यांनी विचारणा केली़ या समितीने सादर केलेला अहवाल दडवून ठेवला़ तो जोपर्यंत सदस्यांना देत नाही, तोपर्यंत बैठक होणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली. माहिती लपविल्याने आक्षेप घेत सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले़आज विद्यापीठाचा अर्थसंकल्पडॉ़ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आगामी वर्षातील अर्थसंकल्प नेहमीप्रमाणे ५३ कोटी तुटीचा असणार आहे़ हा अर्थसंकल्प मंगळवारी होणाऱ्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे़ सूत्रांच्या माहितीनुसार ३१२ कोटींचा हा अर्थसंकल्प असणार आहे.

टॅग्स :universityविद्यापीठdroughtदुष्काळStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबाद