शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
3
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
4
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
5
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
6
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
7
"नवोदित कलाकारांनीही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
8
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
9
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
10
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
11
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
12
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
13
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
14
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी
15
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
16
चिंताजनक! तासाला १०० मृत्यू, कोरोनानंतर 'ही' समस्या घेतेय सायलेंट महामारीचं रुप, WHO चा अलर्ट
17
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
18
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
19
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
20
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...

बोगस बियाणे, खत विक्रेत्यांवर कारवाईसाठी कृषी विभाग सज्ज; जिल्ह्यात दहा भरारी पथके तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 14:30 IST

दरवर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बनावट रासायनिक बियाणे, खते विक्री करून स्वत:चे उखळ पांढरे करून घेणारे लोक सक्रिय होतात.

छत्रपती संभाजीनगर : खरीप हंगामात बोगस बियाणे आणि खतांची विक्री करणारे रॅकेट सक्रिय होते. या पार्श्वभूमीवर कृषी विभागही सज्ज झाला आहे. बनावट बियाणे, अवैध आणि विनापरवाना खते, जादा दराने खते आणि बियाणांची विक्री करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यासाठी जिल्हास्तरीय एक आणि ९ तालुक्यांत प्रत्येकी एक, अशा १० भरारी पथकांची स्थापना करण्यात आली. बोगस माल जप्त करणे आणि संबंधिताविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदविणे, अथवा न्यायालयात थेट खटला भरण्याचे अधिकार या पथकांना देण्यात आले आहेत.

दरवर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बनावट रासायनिक बियाणे, खते विक्री करून स्वत:चे उखळ पांढरे करून घेणारे लोक सक्रिय होतात. एवढेच नव्हे तर परवानाधारक दुकानदार शेतकऱ्यांना अनुदानित रासायनिक खत आणि बियाणे विक्री करण्यासाठी अन्य माल घेण्याची सक्ती करतात. अशाप्रकारे लिंकिंग करून शेतकऱ्यांना लुबाडले जाते. असे प्रकार रोखण्यासाठी प्रभारी विभागीय कृषी सहसंचालक प्रकाश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एक जिल्हास्तरीय भरारी पथक स्थापन केले आहे. जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी प्रकाश पाटील या पथकाचे प्रमुख आहेत. या पथकात वैजापूर, छत्रपती संभाजीनगर आणि सिल्लोड उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा परिषद मोहीम अधिकारी पी. ए. ताजने, वैध मापन शास्त्र विभागाचे उपनियंत्रक एस. वाय. मुंढे सदस्य आहेत. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक एच. एस. कातोरे पथकाचे सचिव आहेत.

प्रत्येक भरारी पथकात पाच अधिकारीतालुकास्तरीय भरारी पथकात पाच अधिकारी आहेत. यात तालुका कृषी अधिकारी हे पथक प्रमुख असतील तर जि. प. तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी आणि तसेच वैधमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक हे सदस्य आहेत. पंचायत समिती कृषी अधिकारी सदस्य सचिव आहेत.-

थेट तक्रार कराखरीप हंगामात शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे आणि खते उपलब्ध व्हावेत यासाठी कृषी विभागाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना बनावट बियाणे आणि खतांविषयी माहिती मिळाल्यास तातडीने भरारी पथकांशी संपर्क साधावा, अथवा थेट आमच्या कार्यालयाकडे लेखी तक्रार नोंदवावी..-प्रकाश देशमुख, कृषी अधीक्षक

तालुकास्तरावर कृषीचे तक्रार निवारण कक्षछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बोगस बियाणे, रासायनिक खतांच्या बाबतीत काही तक्रार करायची असेल तर त्यांना सहज तक्रार करता यावी, यासाठी तालुकास्तरीय तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत नऊ कक्ष कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती कृषी - अधीक्षक प्रकाश देशमुख यांनी दिली.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर