शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाणे, खत विक्रेत्यांवर कारवाईसाठी कृषी विभाग सज्ज; जिल्ह्यात दहा भरारी पथके तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 14:30 IST

दरवर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बनावट रासायनिक बियाणे, खते विक्री करून स्वत:चे उखळ पांढरे करून घेणारे लोक सक्रिय होतात.

छत्रपती संभाजीनगर : खरीप हंगामात बोगस बियाणे आणि खतांची विक्री करणारे रॅकेट सक्रिय होते. या पार्श्वभूमीवर कृषी विभागही सज्ज झाला आहे. बनावट बियाणे, अवैध आणि विनापरवाना खते, जादा दराने खते आणि बियाणांची विक्री करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यासाठी जिल्हास्तरीय एक आणि ९ तालुक्यांत प्रत्येकी एक, अशा १० भरारी पथकांची स्थापना करण्यात आली. बोगस माल जप्त करणे आणि संबंधिताविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदविणे, अथवा न्यायालयात थेट खटला भरण्याचे अधिकार या पथकांना देण्यात आले आहेत.

दरवर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बनावट रासायनिक बियाणे, खते विक्री करून स्वत:चे उखळ पांढरे करून घेणारे लोक सक्रिय होतात. एवढेच नव्हे तर परवानाधारक दुकानदार शेतकऱ्यांना अनुदानित रासायनिक खत आणि बियाणे विक्री करण्यासाठी अन्य माल घेण्याची सक्ती करतात. अशाप्रकारे लिंकिंग करून शेतकऱ्यांना लुबाडले जाते. असे प्रकार रोखण्यासाठी प्रभारी विभागीय कृषी सहसंचालक प्रकाश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एक जिल्हास्तरीय भरारी पथक स्थापन केले आहे. जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी प्रकाश पाटील या पथकाचे प्रमुख आहेत. या पथकात वैजापूर, छत्रपती संभाजीनगर आणि सिल्लोड उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा परिषद मोहीम अधिकारी पी. ए. ताजने, वैध मापन शास्त्र विभागाचे उपनियंत्रक एस. वाय. मुंढे सदस्य आहेत. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक एच. एस. कातोरे पथकाचे सचिव आहेत.

प्रत्येक भरारी पथकात पाच अधिकारीतालुकास्तरीय भरारी पथकात पाच अधिकारी आहेत. यात तालुका कृषी अधिकारी हे पथक प्रमुख असतील तर जि. प. तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी आणि तसेच वैधमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक हे सदस्य आहेत. पंचायत समिती कृषी अधिकारी सदस्य सचिव आहेत.-

थेट तक्रार कराखरीप हंगामात शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे आणि खते उपलब्ध व्हावेत यासाठी कृषी विभागाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना बनावट बियाणे आणि खतांविषयी माहिती मिळाल्यास तातडीने भरारी पथकांशी संपर्क साधावा, अथवा थेट आमच्या कार्यालयाकडे लेखी तक्रार नोंदवावी..-प्रकाश देशमुख, कृषी अधीक्षक

तालुकास्तरावर कृषीचे तक्रार निवारण कक्षछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बोगस बियाणे, रासायनिक खतांच्या बाबतीत काही तक्रार करायची असेल तर त्यांना सहज तक्रार करता यावी, यासाठी तालुकास्तरीय तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत नऊ कक्ष कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती कृषी - अधीक्षक प्रकाश देशमुख यांनी दिली.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर