तापमान १२ अंशावर
By Admin | Updated: December 19, 2014 00:55 IST2014-12-19T00:40:39+5:302014-12-19T00:55:16+5:30
जालना : गेल्या चार दिवसांपासून सर्वदूर पसरलेल्या कडाक्याच्या थंडीने जालनेकर गारठून गेले आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा थंडीचा जोर वाढला असून

तापमान १२ अंशावर
जालना : गेल्या चार दिवसांपासून सर्वदूर पसरलेल्या कडाक्याच्या थंडीने जालनेकर गारठून गेले आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा थंडीचा जोर वाढला असून गुरूवारी तापमान १२ अंश सेल्सियसपर्यंत घसरले.
शहरासह परिसरात रविवारपासून थंडीचा कडाका वाढला. दिवसभर कडाक्याच्या थंडीने परिसर गारठून गेला. त्यामुळे अबालवृद्ध हैराण झाले असून दिवसभर उबदार कपड्यांचा वापर करून अनेकजण थंडीपासून बचाव करीत आहेत. सायंकाळनंतर अनेक ठिकाणी रस्त्यावर शेकोट्या पेटवून नागरिक थंडीपासून बचाव करताना आढळून येत आहेत.
खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रातील डॉ. पंडित वासरे यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या तापमान १२ अंश सेल्सियसपर्यंत घसरले असले तरी ही स्थिती सर्वसाधारण आहे. जर तापमान ८ अंशापेक्षा कमी झाल्यास थंडीचा त्रास अधिक जाणवू शकतो. परंतु आतापर्यंत २००६ मध्येच ८ अंशापर्यंत तापमान घसरले होते. कमाल तापमान २१ अंश आहे.