शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठा योजनेत तांत्रिक खोडा; पुढच्या आठवड्यात मंत्रालयात बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 19:09 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) की नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय), चूक नेमकी कुणाची? यावर मुंबईतील बैठकीत होणार मंथन

छत्रपती संभाजीनगर : शहर पाणीपुरवठा योजनेचे काम तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष करून पूर्ण होत असल्याचे प्रकरण समोर आल्यामुळे योजनेचे काम डेडलाइनमध्ये पूर्ण होण्याची शक्यता संपली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) आणि नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) या दाेन्ही संस्था सध्या एकमेकांवर टोलवाटोलवी करीत असून, पुढच्या आठवड्यात तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष करण्यात नेमकी चूक कुणाची, यावर मंत्रालयात तातडीची बैठक होणार आहे. ‘लोकमत’ने चार दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर ते पैठण रस्त्याच्या कामात शहर पाणीपुरवठा योजनेचा गळा कसा घोटला जात आहे, हे उजेडात आणले. याप्रकरणी आता मुंबईत होणाऱ्या बैठकीत चर्चा होणार आहे.

समन्वयाने काम मार्गी लावणे गरजेचेशहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेसंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) आणि नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना सोमवारी शहरातच बोलावले आहे. त्यांच्यासोबतच्या बैठकीत जलवाहिनीसंदर्भात काय स्थिती आहे, हे जाणून घेणार आहे. दोन्ही विभागांनी समन्वयांनी या  योजनेचे काम मार्गी लावणे गरजेचे आहे. - संजय शिरसाट, मंत्री

बैठकीत सगळे समोर येईल...पुढच्या आठवड्यात मुंबईत या प्रकरणात बैठक घेण्याचे नियोजन सुरू आहे. नेमकी चूक कुणाची हे बैठकीत समोर येईल. शिवाय यावर उपाय काय, याचा विचार करण्यात येईल. ‘लोकमत’मधील सगळे वृत्त मागवून घेतले आहे. मंगळवार किंवा बुधवारी या प्रकरणात बैठक होईल. खातेवाटप झालेले नसले तरी संबंधित सचिवांना बैठकीसाठी बोलावून निर्णय घेण्यात येईल.- अतुल सावे, मंत्री

दोषींवर कारवाईच करू...३० मीटरचा रस्ता आहे, त्यामध्ये २२ मीटर रोड व ८ मीटर जलवाहिनीसाठी जागा होती. त्यात दोन जलवाहिनी असतील. ६ जानेवारीपर्यंत एनएचएआय कोर्टात बाजू मांडणार आहे. तांत्रिक चुका करून जर योजनेला विलंब करण्याचा प्रयत्न एमजेपी व एनएचआयकडून होत असेल तर दोन्ही संस्थांमधील जे कुणी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई होईलच. पाणीपुरवठा विभागाच्या सचिवांकडे तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत सगळे मुद्दे मांडण्यात येतील.- डॉ. भागवत कराड, खासदार

आधीच सात किमीचे काम वगळले...छत्रपती संभाजीनगर ते पैठण या ४५ किमी मार्गाच्या कामाला जानेवारी २०२३ मध्ये सुरुवात झाली. अजूनही त्या मार्गाचे काम पूर्ण झाले नसून ७ किमीचे काम नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाने वगळले आहे. यामुळे कंत्राटदार १८ कोटी रुपयांचे काम न करताच थांबले. जलवाहिनीच्या कामामुळेच ७ किमीचे काम डिस्कोप (कामाला वाव नसणे) या निकषाखाली रद्द करण्यात आले. ४९० कोटी रुपयांवरून फक्त २८९ कोटींमध्ये म्हणजे ४१.०२ टक्के कमी दरात हे काम सेठी आणि मेहरा या कंत्राटदार संस्थांकडे जेव्ही (जॉइंट व्हेंचरशिप) नुसार दिले होते.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरWaterपाणीAtul Saveअतुल सावेSanjay Shirsatसंजय शिरसाटBhagwat Karadडॉ. भागवत