शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठा योजनेत तांत्रिक खोडा; पुढच्या आठवड्यात मंत्रालयात बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 19:09 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) की नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय), चूक नेमकी कुणाची? यावर मुंबईतील बैठकीत होणार मंथन

छत्रपती संभाजीनगर : शहर पाणीपुरवठा योजनेचे काम तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष करून पूर्ण होत असल्याचे प्रकरण समोर आल्यामुळे योजनेचे काम डेडलाइनमध्ये पूर्ण होण्याची शक्यता संपली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) आणि नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) या दाेन्ही संस्था सध्या एकमेकांवर टोलवाटोलवी करीत असून, पुढच्या आठवड्यात तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष करण्यात नेमकी चूक कुणाची, यावर मंत्रालयात तातडीची बैठक होणार आहे. ‘लोकमत’ने चार दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर ते पैठण रस्त्याच्या कामात शहर पाणीपुरवठा योजनेचा गळा कसा घोटला जात आहे, हे उजेडात आणले. याप्रकरणी आता मुंबईत होणाऱ्या बैठकीत चर्चा होणार आहे.

समन्वयाने काम मार्गी लावणे गरजेचेशहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेसंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) आणि नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना सोमवारी शहरातच बोलावले आहे. त्यांच्यासोबतच्या बैठकीत जलवाहिनीसंदर्भात काय स्थिती आहे, हे जाणून घेणार आहे. दोन्ही विभागांनी समन्वयांनी या  योजनेचे काम मार्गी लावणे गरजेचे आहे. - संजय शिरसाट, मंत्री

बैठकीत सगळे समोर येईल...पुढच्या आठवड्यात मुंबईत या प्रकरणात बैठक घेण्याचे नियोजन सुरू आहे. नेमकी चूक कुणाची हे बैठकीत समोर येईल. शिवाय यावर उपाय काय, याचा विचार करण्यात येईल. ‘लोकमत’मधील सगळे वृत्त मागवून घेतले आहे. मंगळवार किंवा बुधवारी या प्रकरणात बैठक होईल. खातेवाटप झालेले नसले तरी संबंधित सचिवांना बैठकीसाठी बोलावून निर्णय घेण्यात येईल.- अतुल सावे, मंत्री

दोषींवर कारवाईच करू...३० मीटरचा रस्ता आहे, त्यामध्ये २२ मीटर रोड व ८ मीटर जलवाहिनीसाठी जागा होती. त्यात दोन जलवाहिनी असतील. ६ जानेवारीपर्यंत एनएचएआय कोर्टात बाजू मांडणार आहे. तांत्रिक चुका करून जर योजनेला विलंब करण्याचा प्रयत्न एमजेपी व एनएचआयकडून होत असेल तर दोन्ही संस्थांमधील जे कुणी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई होईलच. पाणीपुरवठा विभागाच्या सचिवांकडे तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत सगळे मुद्दे मांडण्यात येतील.- डॉ. भागवत कराड, खासदार

आधीच सात किमीचे काम वगळले...छत्रपती संभाजीनगर ते पैठण या ४५ किमी मार्गाच्या कामाला जानेवारी २०२३ मध्ये सुरुवात झाली. अजूनही त्या मार्गाचे काम पूर्ण झाले नसून ७ किमीचे काम नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाने वगळले आहे. यामुळे कंत्राटदार १८ कोटी रुपयांचे काम न करताच थांबले. जलवाहिनीच्या कामामुळेच ७ किमीचे काम डिस्कोप (कामाला वाव नसणे) या निकषाखाली रद्द करण्यात आले. ४९० कोटी रुपयांवरून फक्त २८९ कोटींमध्ये म्हणजे ४१.०२ टक्के कमी दरात हे काम सेठी आणि मेहरा या कंत्राटदार संस्थांकडे जेव्ही (जॉइंट व्हेंचरशिप) नुसार दिले होते.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरWaterपाणीAtul Saveअतुल सावेSanjay Shirsatसंजय शिरसाटBhagwat Karadडॉ. भागवत