‘फक्त तुझ्याचसाठी’च्या टीमसोबत सखीमंच सदस्यांची धम्माल
By Admin | Updated: July 21, 2016 01:04 IST2016-07-21T00:41:22+5:302016-07-21T01:04:37+5:30
जालना : ‘फक्त तुझ्याचसाठी’ या मराठी चित्रपटाच्या संपूर्ण टिमसोबत सखीमंच सदस्यांना संवाद साधण्याची संधी बुधवारी लोकमतने उपलब्ध करुन दिली.

‘फक्त तुझ्याचसाठी’च्या टीमसोबत सखीमंच सदस्यांची धम्माल
जालना : ‘फक्त तुझ्याचसाठी’ या मराठी चित्रपटाच्या संपूर्ण टिमसोबत सखीमंच सदस्यांना संवाद साधण्याची संधी बुधवारी लोकमतने उपलब्ध करुन दिली. यावेळी मंचच्या सदस्यांनी चित्रपटातील कलावंतांसोबत नृत्य करुन मनमुराद आंनद लुटला.
राज्यात १९ आॅगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. तत्पूर्वीच जालना शहरातील खेरुडकर मंगल कार्यालयात या चित्रपटातील नायक यश कपूर दिग्दर्शक प्यारेलाल शर्मा, निर्माता करण पटेल, क्रियेटीव्ह डायरेक्टर स्वपन रे आणि या चित्रपटात अॅटम साँग करणारी मिस महाराष्ट्र अंकिता या टीमने चित्रपटाचा आशय आणि कथेचा परिचय सखी मंचच्या सदस्यांना करुन दिला. याप्रसंगी यावेळी लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी राजेश भिसे, जिल्हा व्यवस्थापक मकरंद शहापूरकर उपस्थित होते.
यश कपूर म्हणाला, सामाजिक आशयाला धरून हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. संसारामध्ये पती- पत्नीने एकमेकांना समजावून घेतले, तर संसार चांगला फुलण्यास मदत होते. त्यामुळे पहिली दुसरी कोणीच नाही. फक्त तुझ्याचसाठी असे चित्रपटाचे नाव देण्यात आल्याचे दिग्दर्शक प्यारेलाल यांनी आवर्जून सांगितले. प्रेयसी की जीवनसाथी म्हणून आई वडिलांनी पसंत केलेली मुलगी या दोघींतून नायकाला एकीला पसंत करावे लागते. तेव्हा आई-वडिलांनी पसंत केलेल्या मुलीशीच नायक विवाह करतो. परंतु त्यानंतर खऱ्या आयुष्याला सुरूवात होते. विविध वळणांवर हा चित्रटपट नेत असल्याचे नायक यश कपूर यांनी सखींशी संवाद साधताना सांगितले. कितीही मॉडर्न झालो तरी आई-वडिलांनी पसंत केलेल्या मुलीशीच आपण विवाह केला पाहिजे, असे त्याने सांगितले. आई-वडिल हेच आपले दैवत असले पाहिजे, असा आग्रह त्याने यावेळी धरला. कारण आई-वडिलांची पसंत हिच परिपूर्ण असते. हेच या चित्रपटाचा गाभा आहे. नव्या पिढीला सुध्दा चित्रपट आवडेल, असे त्याने आवर्जून सांगितले.
विशेष म्हणजे या चित्रटात मराठी संस्कृती आपल्या दिसून येणार असून, प्रथमच विविध प्रकारचे स्टंट यामध्ये वापरण्यात आले असल्याचे यशने सांगितले. स्त्रीचे कुटुंबात काय स्थान असावे, हे या चित्रपटात दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता पानसरे यांनी केले. (प्रतिनिधी)