शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

चहा विक्रेत्याच्या घरास राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे गेले तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 19:56 IST

रस्त्याच्या निर्मितीसाठी मोठे मोठे दगड फोडण्यासाठी दिलीप बिल्डकॉन लि. भोपाळ कंपनीतर्फे भूसुरुंगाचे ब्लास्ट करण्यात आले.

ठळक मुद्देधारूर तालुक्यातील युवकाची व्यथा  नुकसानभरपाईसाठी विभागीय आयुक्तालयासमोर केले बेमुदत उपोषण

- राम शिनगारे औरंगाबाद : चहा विकून कमावलेल्या पैशांतून स्वप्नातील दोन खोल्यांचे पक्के घर बांधले. या घरापासून अवघ्या १५ मीटर अंतरावरून जाणाऱ्या खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या बाह्यवळण रस्त्याचे काम सुरूहोते. या रस्त्याच्या निर्मितीसाठी मोठे मोठे दगड फोडण्यासाठी दिलीप बिल्डकॉन लि. भोपाळ कंपनीतर्फे भूसुरुंगाचे ब्लास्ट करण्यात आले. यात चहा विकणाऱ्या युवकाच्या घराला तडे गेले. या घराची नुकसानभरपाई मिळण्यासाठी त्याने थेट विभागीय आयुक्तालयासमोर गुरुवारपासून (दि.२८) बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे खामगाव ते पंढरपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ चे काम सुरू आहे. यातील माजलगाव ते केज या भागाचे काम दिलीप बिल्डकॉन लि. भोपाळ कंपनीतर्फे करण्यात येत आहे. याच रस्त्यावर धारूर तालुक्यातील चोरांबा गावातील अशोक मच्छिंद्र चव्हाण या युवकाचे घर आहे. आरणवाडी साठवण तलावामुळे बाह्यवळण रस्ता काढण्यात आला. त्यासाठी कंपनीतर्फे भूसुरुंगाच्या माध्यमातून दगड, खडक फोडण्यात आले. यात अशोकच्या नव्याने बांधकाम सुरू असलेल्या दोन खोल्यांच्या घराला तडे गेले आहेत. यात न्याय मिळण्यासाठी तो १४ महिन्यांपासून विविध कार्यालयांत खेटे मारत आहे. त्याने घरात वडील नसल्यामुळे एकट्या आईला मदत करण्यासाठी पाचवीत असतानाच शिक्षण सोडून दिले. गावातील चहाच्या हॉटेलवर काम करून घर चालविले. पुढे स्वत:च चहाची टपरी टाकली. त्यातच काही वर्षांपासून घर सोडून गेलेले वडील परतले. चहाच्या टपरीतून मिळणाऱ्या पैशांतून शेतात दोन खोल्यांचे पक्के घर बांधले.

या शेतातून राष्ट्रीय महामार्ग गेला. या महामार्गाच्या निर्मितीसाठी मोठमोठे सुरुंगाचे स्फोट केले. यात कष्टातून बांधलेल्या घराला सर्व बाजंूनी तडे गेले. नियमानुसार या घराची नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी रस्ते निर्माण करणाऱ्या कंपनीची आहे. अशोक चव्हाण याने धारूरचे तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, बीडचे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांना निवेदनाद्वारे न्याय मागितला. मात्र, कोणीही त्याची दखल घेत नव्हते. दोन वेळा धारूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले. आत्मदहनाचा इशारा दिला. प्रत्येकवेळी आश्वासनावरच बोळवण करण्यात आली. कंपनीने एका वेळा १०० रुपयांच्या बाँडवर घराच्या नुकसानभरपाईपोटी ३ तीन लाख रुपये चेकद्वारे देण्यात येतील, असेही लिहून दिले. यासही सहा महिन्यांचा कालावधी उलटला आहे. तरी त्या युवकास पैसे देण्यात येत नाही.

उलट त्याच्या हॉटेलवर जाऊन कंपनीने पाळलेले गावगुंड त्रास देत आहे. एकुलता एक असल्याचे सांगून वडिलांना धमकावले जात आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी एकवेळा १० ते १२ गुंड प्रवृत्तीच्या मुलांना सोबत आणून त्याला मारहाणही केली. याविरोधात धारूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी त्यालाच उचलून नेत तीन वर्षे कारागृहात सडविण्याची धमकी दिली. तरीही हार मानली नसल्याचे ‘लोकमत’शी बोलताना अशोक चव्हाण याने सांगितले.

सुनील केंद्रेकरांकडून न्यायाची आशाविभागीय आयुक्तपदी सुनील केंदे्रकर यांची नियुक्ती होताच त्याला न्याय मिळण्याची आशा वाटली. बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी असताना सुनील केंद्रेकर यांनी धडाकेबाज कामगिरी केली होती. त्याच्या चहाच्या टपरीवर पेपर येतात. त्यातून त्याने केंद्रेकरांच्या कामाविषयी ऐकले होते. लोकांची चर्चा सतत होत होती. ते लक्षात ठेवून आपल्याला न्याय मिळेल. या आशेने त्याने आयुक्तालय गाठले. आठ दिवसांपूर्वी विभागीय आयुक्तांना निवेदन दिले. त्यानंतर  गुरुवारपासून (दि.२८) बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

पहिल्याच दिवशी विभागीय आयुक्तालयाकडून दखलउपोषणाच्या पहिल्याच दिवशी विभागीय आयुक्तालयातील पुनर्वसन उपायुक्तांनी दखल घेतली आहे. या अन्यायाशी संबंधित राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता यांना तातडीचे पत्र पाठवून यावर तात्काळ तोडगा काढण्याचे आदेश दिले आहे. या आदेशाची प्रत उपोषणकर्त्याला सायंकाळी देण्यात आली. 

टॅग्स :Divisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयhighwayमहामार्गagitationआंदोलन