शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

चहा विक्रेत्याच्या घरास राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे गेले तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 19:56 IST

रस्त्याच्या निर्मितीसाठी मोठे मोठे दगड फोडण्यासाठी दिलीप बिल्डकॉन लि. भोपाळ कंपनीतर्फे भूसुरुंगाचे ब्लास्ट करण्यात आले.

ठळक मुद्देधारूर तालुक्यातील युवकाची व्यथा  नुकसानभरपाईसाठी विभागीय आयुक्तालयासमोर केले बेमुदत उपोषण

- राम शिनगारे औरंगाबाद : चहा विकून कमावलेल्या पैशांतून स्वप्नातील दोन खोल्यांचे पक्के घर बांधले. या घरापासून अवघ्या १५ मीटर अंतरावरून जाणाऱ्या खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या बाह्यवळण रस्त्याचे काम सुरूहोते. या रस्त्याच्या निर्मितीसाठी मोठे मोठे दगड फोडण्यासाठी दिलीप बिल्डकॉन लि. भोपाळ कंपनीतर्फे भूसुरुंगाचे ब्लास्ट करण्यात आले. यात चहा विकणाऱ्या युवकाच्या घराला तडे गेले. या घराची नुकसानभरपाई मिळण्यासाठी त्याने थेट विभागीय आयुक्तालयासमोर गुरुवारपासून (दि.२८) बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे खामगाव ते पंढरपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ चे काम सुरू आहे. यातील माजलगाव ते केज या भागाचे काम दिलीप बिल्डकॉन लि. भोपाळ कंपनीतर्फे करण्यात येत आहे. याच रस्त्यावर धारूर तालुक्यातील चोरांबा गावातील अशोक मच्छिंद्र चव्हाण या युवकाचे घर आहे. आरणवाडी साठवण तलावामुळे बाह्यवळण रस्ता काढण्यात आला. त्यासाठी कंपनीतर्फे भूसुरुंगाच्या माध्यमातून दगड, खडक फोडण्यात आले. यात अशोकच्या नव्याने बांधकाम सुरू असलेल्या दोन खोल्यांच्या घराला तडे गेले आहेत. यात न्याय मिळण्यासाठी तो १४ महिन्यांपासून विविध कार्यालयांत खेटे मारत आहे. त्याने घरात वडील नसल्यामुळे एकट्या आईला मदत करण्यासाठी पाचवीत असतानाच शिक्षण सोडून दिले. गावातील चहाच्या हॉटेलवर काम करून घर चालविले. पुढे स्वत:च चहाची टपरी टाकली. त्यातच काही वर्षांपासून घर सोडून गेलेले वडील परतले. चहाच्या टपरीतून मिळणाऱ्या पैशांतून शेतात दोन खोल्यांचे पक्के घर बांधले.

या शेतातून राष्ट्रीय महामार्ग गेला. या महामार्गाच्या निर्मितीसाठी मोठमोठे सुरुंगाचे स्फोट केले. यात कष्टातून बांधलेल्या घराला सर्व बाजंूनी तडे गेले. नियमानुसार या घराची नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी रस्ते निर्माण करणाऱ्या कंपनीची आहे. अशोक चव्हाण याने धारूरचे तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, बीडचे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांना निवेदनाद्वारे न्याय मागितला. मात्र, कोणीही त्याची दखल घेत नव्हते. दोन वेळा धारूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले. आत्मदहनाचा इशारा दिला. प्रत्येकवेळी आश्वासनावरच बोळवण करण्यात आली. कंपनीने एका वेळा १०० रुपयांच्या बाँडवर घराच्या नुकसानभरपाईपोटी ३ तीन लाख रुपये चेकद्वारे देण्यात येतील, असेही लिहून दिले. यासही सहा महिन्यांचा कालावधी उलटला आहे. तरी त्या युवकास पैसे देण्यात येत नाही.

उलट त्याच्या हॉटेलवर जाऊन कंपनीने पाळलेले गावगुंड त्रास देत आहे. एकुलता एक असल्याचे सांगून वडिलांना धमकावले जात आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी एकवेळा १० ते १२ गुंड प्रवृत्तीच्या मुलांना सोबत आणून त्याला मारहाणही केली. याविरोधात धारूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी त्यालाच उचलून नेत तीन वर्षे कारागृहात सडविण्याची धमकी दिली. तरीही हार मानली नसल्याचे ‘लोकमत’शी बोलताना अशोक चव्हाण याने सांगितले.

सुनील केंद्रेकरांकडून न्यायाची आशाविभागीय आयुक्तपदी सुनील केंदे्रकर यांची नियुक्ती होताच त्याला न्याय मिळण्याची आशा वाटली. बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी असताना सुनील केंद्रेकर यांनी धडाकेबाज कामगिरी केली होती. त्याच्या चहाच्या टपरीवर पेपर येतात. त्यातून त्याने केंद्रेकरांच्या कामाविषयी ऐकले होते. लोकांची चर्चा सतत होत होती. ते लक्षात ठेवून आपल्याला न्याय मिळेल. या आशेने त्याने आयुक्तालय गाठले. आठ दिवसांपूर्वी विभागीय आयुक्तांना निवेदन दिले. त्यानंतर  गुरुवारपासून (दि.२८) बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

पहिल्याच दिवशी विभागीय आयुक्तालयाकडून दखलउपोषणाच्या पहिल्याच दिवशी विभागीय आयुक्तालयातील पुनर्वसन उपायुक्तांनी दखल घेतली आहे. या अन्यायाशी संबंधित राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता यांना तातडीचे पत्र पाठवून यावर तात्काळ तोडगा काढण्याचे आदेश दिले आहे. या आदेशाची प्रत उपोषणकर्त्याला सायंकाळी देण्यात आली. 

टॅग्स :Divisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयhighwayमहामार्गagitationआंदोलन