शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
3
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
4
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
5
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
6
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
7
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
8
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
9
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
10
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
11
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
12
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
14
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
15
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
16
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
17
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
18
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
19
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
20
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यात आजपासून टँकर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 00:37 IST

तीन महिन्यांच्या टंचाई आराखड्यानुसार आज शनिवारी ३० जून हा टँकर्सद्वारे पाणीपुरवठ्याचा अखेरचा दिवस होता.

ठळक मुद्देमुदतवाढीची अपेक्षा : जिल्ह्यातील पाचशे गावांच्या घशाला कोरड

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : तीन महिन्यांच्या टंचाई आराखड्यानुसार आज शनिवारी ३० जून हा टँकर्सद्वारे पाणीपुरवठ्याचा अखेरचा दिवस होता. यासंदर्भात तहसीलदारांनी गटविकास अधिकाऱ्यांना तशा पूर्वसूचनाही दिलेल्या आहेत. अजूनही जिल्ह्यातील जवळपास ५०० गावे तहानलेलीच आहेत. या गावांना उद्या १ जुलैपासून टँकर्सद्वारे पाणीपुरवठ्यासाठी मुदतवाढ द्यावी, असा ठरावही जि. प. स्थायी समितीने घेतला आहे. असे असले तरी यासंदर्भात भक्कम पाठपुरावा झाल्याशिवाय प्रशासकीय यंत्रणा हलणार नाही, हे मात्र नक्की.जिल्ह्यात यंदा अनेक तालुक्यांमध्ये पावसाने सरासरीही ओलांडली नाही. काही तालुक्यात तर ५० मि.मी.पेक्षा कमी पाऊस झालेला आहे. त्यामुळे २९ जूनपर्यंत जिल्ह्यातील ४७८ गावे आणि ४१ वाड्यांना ५९७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. जिल्हा परिषदेने एप्रिल महिन्यात तीन महिन्यांचा टंचाई आराखडा सादर केला होता. टंचाई आराखड्याची मुदत ३० जून रोजी संपली आहे. त्यामुळे उद्या रविवारी १ जुलैपासून जिल्ह्यात टँकर्सद्वारे पाणीपुरवठा होईल की नाही, याबाबत जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभागही अनभिज्ञ आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील जवळपास ५०० गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. ज्या तालुक्यांमध्ये बºयापैकी पाऊस झाला तेथे भूजल पातळी वाढली असून, विहिरी, विंधन विहिरींना पाणी आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अवघे ४५ टँकर्स बंद करण्यात आले आहेत. यामध्ये वैजापूर तालुक्यातील एकही टँकर बंद झालेला नाही. बंद झालेल्या टँकरपैकी औरंगाबाद तालुक्यातील ४ टँकर्स, गंगापूर तालुक्यातील १ टँकर, खुलताबाद तालुक्यातील ३ टँकर, पैठण तालुक्यातील १० टँकर्स, फुलंब्री तालुक्यातील ९ टँकर्स, सिल्लोड तालुक्यातील १७ टँकर्स, सोयगाव तालुक्यातील १ टँकर, असे एकूण ४५ टँकर्सचा समावेश आहे. कालपर्यंत वैजापूर, गंगापूर, औरंगाबाद, फुलंब्री आणि सिल्लोड तालुक्यांमध्ये सर्वाधिक गावे तहानलेलीच आहेत.आजपर्यंत औरंगाबाद तालुक्यातील ८१ गावे व २६ वस्त्यांसाठी १०५ टँकर्स, गंगापूर तालुक्यातील १०३ गावांसाठी ११८, कन्नड तालुक्यातील ३६ गावे आणि २ वस्त्यांसाठी ३८, खुलताबाद तालुक्यातील ३१ गावे आणि ५ वस्त्यांसाठी ३१, पैठण तालुक्यातील ४० गावांसाठी ४६, फुलंब्री तालुक्यातील ५७ गावांसाठी ८१, सिल्लोड तालुक्यात ५६ गावे व ६ वस्त्यांसाठी ८९, सोयगाव तालुक्यातील २ गावांसाठी ३, वैजापूर तालुक्यातील ७२ गावे आणि २ वस्त्यांसाठी ८६ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला.

टॅग्स :water shortageपाणीकपातAurangabadऔरंगाबादzpजिल्हा परिषद