शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

औरंगाबाद जिल्ह्यात आजपासून टँकर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 00:37 IST

तीन महिन्यांच्या टंचाई आराखड्यानुसार आज शनिवारी ३० जून हा टँकर्सद्वारे पाणीपुरवठ्याचा अखेरचा दिवस होता.

ठळक मुद्देमुदतवाढीची अपेक्षा : जिल्ह्यातील पाचशे गावांच्या घशाला कोरड

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : तीन महिन्यांच्या टंचाई आराखड्यानुसार आज शनिवारी ३० जून हा टँकर्सद्वारे पाणीपुरवठ्याचा अखेरचा दिवस होता. यासंदर्भात तहसीलदारांनी गटविकास अधिकाऱ्यांना तशा पूर्वसूचनाही दिलेल्या आहेत. अजूनही जिल्ह्यातील जवळपास ५०० गावे तहानलेलीच आहेत. या गावांना उद्या १ जुलैपासून टँकर्सद्वारे पाणीपुरवठ्यासाठी मुदतवाढ द्यावी, असा ठरावही जि. प. स्थायी समितीने घेतला आहे. असे असले तरी यासंदर्भात भक्कम पाठपुरावा झाल्याशिवाय प्रशासकीय यंत्रणा हलणार नाही, हे मात्र नक्की.जिल्ह्यात यंदा अनेक तालुक्यांमध्ये पावसाने सरासरीही ओलांडली नाही. काही तालुक्यात तर ५० मि.मी.पेक्षा कमी पाऊस झालेला आहे. त्यामुळे २९ जूनपर्यंत जिल्ह्यातील ४७८ गावे आणि ४१ वाड्यांना ५९७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. जिल्हा परिषदेने एप्रिल महिन्यात तीन महिन्यांचा टंचाई आराखडा सादर केला होता. टंचाई आराखड्याची मुदत ३० जून रोजी संपली आहे. त्यामुळे उद्या रविवारी १ जुलैपासून जिल्ह्यात टँकर्सद्वारे पाणीपुरवठा होईल की नाही, याबाबत जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभागही अनभिज्ञ आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील जवळपास ५०० गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. ज्या तालुक्यांमध्ये बºयापैकी पाऊस झाला तेथे भूजल पातळी वाढली असून, विहिरी, विंधन विहिरींना पाणी आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अवघे ४५ टँकर्स बंद करण्यात आले आहेत. यामध्ये वैजापूर तालुक्यातील एकही टँकर बंद झालेला नाही. बंद झालेल्या टँकरपैकी औरंगाबाद तालुक्यातील ४ टँकर्स, गंगापूर तालुक्यातील १ टँकर, खुलताबाद तालुक्यातील ३ टँकर, पैठण तालुक्यातील १० टँकर्स, फुलंब्री तालुक्यातील ९ टँकर्स, सिल्लोड तालुक्यातील १७ टँकर्स, सोयगाव तालुक्यातील १ टँकर, असे एकूण ४५ टँकर्सचा समावेश आहे. कालपर्यंत वैजापूर, गंगापूर, औरंगाबाद, फुलंब्री आणि सिल्लोड तालुक्यांमध्ये सर्वाधिक गावे तहानलेलीच आहेत.आजपर्यंत औरंगाबाद तालुक्यातील ८१ गावे व २६ वस्त्यांसाठी १०५ टँकर्स, गंगापूर तालुक्यातील १०३ गावांसाठी ११८, कन्नड तालुक्यातील ३६ गावे आणि २ वस्त्यांसाठी ३८, खुलताबाद तालुक्यातील ३१ गावे आणि ५ वस्त्यांसाठी ३१, पैठण तालुक्यातील ४० गावांसाठी ४६, फुलंब्री तालुक्यातील ५७ गावांसाठी ८१, सिल्लोड तालुक्यात ५६ गावे व ६ वस्त्यांसाठी ८९, सोयगाव तालुक्यातील २ गावांसाठी ३, वैजापूर तालुक्यातील ७२ गावे आणि २ वस्त्यांसाठी ८६ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला.

टॅग्स :water shortageपाणीकपातAurangabadऔरंगाबादzpजिल्हा परिषद