शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

औरंगाबाद जिल्ह्यात आजपासून टँकर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 00:37 IST

तीन महिन्यांच्या टंचाई आराखड्यानुसार आज शनिवारी ३० जून हा टँकर्सद्वारे पाणीपुरवठ्याचा अखेरचा दिवस होता.

ठळक मुद्देमुदतवाढीची अपेक्षा : जिल्ह्यातील पाचशे गावांच्या घशाला कोरड

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : तीन महिन्यांच्या टंचाई आराखड्यानुसार आज शनिवारी ३० जून हा टँकर्सद्वारे पाणीपुरवठ्याचा अखेरचा दिवस होता. यासंदर्भात तहसीलदारांनी गटविकास अधिकाऱ्यांना तशा पूर्वसूचनाही दिलेल्या आहेत. अजूनही जिल्ह्यातील जवळपास ५०० गावे तहानलेलीच आहेत. या गावांना उद्या १ जुलैपासून टँकर्सद्वारे पाणीपुरवठ्यासाठी मुदतवाढ द्यावी, असा ठरावही जि. प. स्थायी समितीने घेतला आहे. असे असले तरी यासंदर्भात भक्कम पाठपुरावा झाल्याशिवाय प्रशासकीय यंत्रणा हलणार नाही, हे मात्र नक्की.जिल्ह्यात यंदा अनेक तालुक्यांमध्ये पावसाने सरासरीही ओलांडली नाही. काही तालुक्यात तर ५० मि.मी.पेक्षा कमी पाऊस झालेला आहे. त्यामुळे २९ जूनपर्यंत जिल्ह्यातील ४७८ गावे आणि ४१ वाड्यांना ५९७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. जिल्हा परिषदेने एप्रिल महिन्यात तीन महिन्यांचा टंचाई आराखडा सादर केला होता. टंचाई आराखड्याची मुदत ३० जून रोजी संपली आहे. त्यामुळे उद्या रविवारी १ जुलैपासून जिल्ह्यात टँकर्सद्वारे पाणीपुरवठा होईल की नाही, याबाबत जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभागही अनभिज्ञ आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील जवळपास ५०० गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. ज्या तालुक्यांमध्ये बºयापैकी पाऊस झाला तेथे भूजल पातळी वाढली असून, विहिरी, विंधन विहिरींना पाणी आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अवघे ४५ टँकर्स बंद करण्यात आले आहेत. यामध्ये वैजापूर तालुक्यातील एकही टँकर बंद झालेला नाही. बंद झालेल्या टँकरपैकी औरंगाबाद तालुक्यातील ४ टँकर्स, गंगापूर तालुक्यातील १ टँकर, खुलताबाद तालुक्यातील ३ टँकर, पैठण तालुक्यातील १० टँकर्स, फुलंब्री तालुक्यातील ९ टँकर्स, सिल्लोड तालुक्यातील १७ टँकर्स, सोयगाव तालुक्यातील १ टँकर, असे एकूण ४५ टँकर्सचा समावेश आहे. कालपर्यंत वैजापूर, गंगापूर, औरंगाबाद, फुलंब्री आणि सिल्लोड तालुक्यांमध्ये सर्वाधिक गावे तहानलेलीच आहेत.आजपर्यंत औरंगाबाद तालुक्यातील ८१ गावे व २६ वस्त्यांसाठी १०५ टँकर्स, गंगापूर तालुक्यातील १०३ गावांसाठी ११८, कन्नड तालुक्यातील ३६ गावे आणि २ वस्त्यांसाठी ३८, खुलताबाद तालुक्यातील ३१ गावे आणि ५ वस्त्यांसाठी ३१, पैठण तालुक्यातील ४० गावांसाठी ४६, फुलंब्री तालुक्यातील ५७ गावांसाठी ८१, सिल्लोड तालुक्यात ५६ गावे व ६ वस्त्यांसाठी ८९, सोयगाव तालुक्यातील २ गावांसाठी ३, वैजापूर तालुक्यातील ७२ गावे आणि २ वस्त्यांसाठी ८६ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला.

टॅग्स :water shortageपाणीकपातAurangabadऔरंगाबादzpजिल्हा परिषद