आवाज दो रोटी, कपडा,पानी लो
By Admin | Updated: June 24, 2016 01:29 IST2016-06-24T00:35:38+5:302016-06-24T01:29:27+5:30
प्रशांत तेलवाडकर , औरंगाबाद औरंगाबाद शहरात कोणतीही गरीब व्यक्ती उपाशीपोटी झोपू नये, या उद्देशाने सहा महिन्यांपूर्वी ‘रोटी बँके’ ला सुरुवात झाली होती. आता यापुढचे पाऊल म्हणजे

आवाज दो रोटी, कपडा,पानी लो
प्रशांत तेलवाडकर , औरंगाबाद
औरंगाबाद शहरात कोणतीही गरीब व्यक्ती उपाशीपोटी झोपू नये, या उद्देशाने सहा महिन्यांपूर्वी ‘रोटी बँके’ ला सुरुवात झाली होती. आता यापुढचे पाऊल म्हणजे, जे गरीब वृद्ध, अनाथ, निराधार, अपंग आहेत, अशांना घरपोच अन्न, कपडा, पिण्याचे पाणी देण्यासाठी पुढील महिन्यात मोबाईल रोटी बँक सुरू होत आहे. ‘आवाज दो रोटी, कपडा, पानी लो’ असे या उपक्रमाचे नाव ठेवण्यात आले आहे.
एका वेळेचे अन्नही ज्यांना मिळणे कठीण असते अशा लोकांसाठी जिन्सी-बायजीपुरा रोडवरील ‘हारुण मुकाती इस्लामिक सेंटर’चा ‘रोटी बँक’ उपक्रम वरदान ठरला आहे. अन्नदानासाठी शहरातील अनेक परिवार, मंगल कार्यालयांनी पुढाकार घेतला आणि या उपक्रमाला प्रतिसाद मिळाला. अनेक गरीब वृद्ध, विधवा, घटस्फोटित, एकट्या राहणाऱ्या महिला, ज्या उपाशीपोटी झोपत; पण इज्जतीने राहत, अशा महिलांना ‘रोटी बँक’ अन्नदायी ठरली. हारुण मुकाती इस्लामिक सेंटरने नुकताच शहरात सर्वेक्षण केले असता त्यात १७५०० लोकांच्या घरात, झोपडीत आजही चूल पेटत नसल्याचे आढळून आले आहे. यात वृद्ध, निराधार, अपंग, एकटे राहणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. हे लोक अन्न घेण्यासाठी ‘रोटी बँके’पर्यंत येऊ शकत नाहीत. अशांना घरपोच अन्न, कपडे, पाणी देण्यासाठी ‘मोबाईल रोटी, कपडा बँक’ला पुढील महिन्यात सुरुवात करण्यात येणार आहे.
यासाठी चार रिक्षा दररोज शहरात फिरणार आहेत. त्यातील एक रिक्षा घाटी, मध्यवर्ती बसस्थानक व रेल्वेस्टेशन परिसरात अन्न, कपडे वाटणार आहे. तर अन्य तीन रिक्षा शहराच्या विविध भागांत गरीब वृद्ध, निराधारांना अन्न, पाणी देणार आहेत. सकाळी व सायंकाळी ठरवून दिलेल्या ठिकाणी रिक्षा थांबणार (पान २ वर)