शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

सोयाबीनच्या बोगस बियाणांप्रकरणी पुरवठादार, बियाणे निरीक्षकांवर फौजदारी कारवाई करा; खंडपीठाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 7:21 PM

सुमोटो : ‘लोकमत’सह इतर वृत्तपत्रांमधील वृत्ताची खंडपीठाकडून दखल

ठळक मुद्देमाहिती सादर करण्याचे शासनाला आदेश

औरंगाबाद : सोयाबीनचे बोगस बियाणे पुरविणाऱ्या कंपन्या, पुरवठादार व बियाणे निरीक्षकांचा शोध घेऊन त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. श्रीकांत कुलकर्णी यांनी दिले आहेत. सोयाबीनच्या बियाणांची पेरणी केल्यानंतर उगवले नसल्याबाबत ‘लोकमत’सह इतर दैनिकांनी आणि वृत्त वाहिन्यांनी बातमी प्रसारित केली होती. यामुळे अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे बातमीत म्हटले होते. या बातमीलाच खंडपीठाने सुमोटो याचिका म्हणून शुक्रवारी दाखल करून घेतले.  

लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली आणि नगर जिल्ह्यांमध्ये बनावट सोयाबीन बियाणांची विक्री झाली असून, त्यांची उगवणच झाली नाही, असे बातम्यांमध्ये म्हटले होते. न्यायालयाचे मित्र म्हणून अ‍ॅड. पी. पी. मोरे यांची खंडपीठाने नेमणूक केली असून, याचिकेवर  ३ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

सोयाबीन उगवण न झाल्याने शेतकरी, तसेच देशाचेही मोठे नुकसान झाले आहे. या क्षेत्रातील शेतकरी अत्यंत गरीब असून, त्यांना पुन्हा नव्याने पेरणी करणे अत्यंत जिकिरीचे जाणार आहे. धान्य पिकविण्यासाठी शेतकरी धडपडत असताना त्याच्या माथी बोगस बियाणे मारले जात आहे. बियाणे कायद्यांतर्गत बोगस बियाणे उत्पादित आणि विक्री करणाऱ्यांविरोधात किती कारवाया प्रत्येक तालुक्यात करण्यात आल्या, किती बियाणे तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले, याची माहिती सादर करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. जिल्हा व तालुका कृषी अधिकारी, तसेच बियाणे निरीक्षक अशा प्रकरणांत काय कारवाई करतात, याचेही स्पष्टीकरण खंडपीठाने मागविले आहे. पाच वर्षांत अशा किती कारवाया केल्या याचीही माहिती सादर करण्याचे निर्देशित केले आहे. येथून पुढे अशा बोगस बियाणांची बियाणे निरीक्षकाकडे तक्रार करून प्रयोगशाळेमध्ये तपासणी करून शेतकऱ्यांनी पोलिसांत तक्रारी द्याव्यात. पोलिसांनी अशा तक्रारी दाखल करून घ्याव्यात, असे आदेश खंडपीठाने दिले आहेत. शासनाच्या वतीने सरकारी वकील अ‍ॅड. ज्ञानेश्वर काळे काम पाहत आहेत.

माहिती सादर करण्याचे शासनाला आदेशबियाणे कायद्यानुसार कारवाई करताना शेतकऱ्यांकडून आलेल्या तक्रारी पोलिसांनी घ्याव्यात तसेच औरंगाबाद खंडपीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक तालुक्यातील बोगस बियाणांच्या प्रकरणांची माहिती सादर करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले आहेत.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ