शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

‘सत्ता पालट म्हणजे समग्र परिवर्तन नव्हे’

By admin | Updated: September 14, 2014 00:21 IST

औरंगाबाद : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून देशात झालेला सत्तापालट म्हणजेच समग्र परिवर्तन असे मानणे हा निव्वळ भाबडेपणा आहे.

औरंगाबाद : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून देशात झालेला सत्तापालट म्हणजेच समग्र परिवर्तन असे मानणे हा निव्वळ भाबडेपणा आहे. सत्तापालटातून बदल घडवण्याची संधी असली, तरी स्पष्ट विचारशैली, पुरोगामी धोरणे व त्यांची कार्यक्षम अंमलबजावणी यातूनच खरा बदल होत असतो, असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक व पत्रकार विनय हर्डीकर यांनी व्यक्त केले. एका व्याख्यानानिमित्त ते शहरात आले असताना त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. लोकसभा निवडणुकांचा अन्वयार्थ मांडताना ते म्हणाले, या निवडणुकीचा निकाल हारण्याइतकाच जिंकण्यासाठीही अनपेक्षित होता. भाजपा कमी मते मिळवूनही जास्त जागांवर निवडून आला. मंत्रिमंडळ बनवण्याची प्रक्रियाही कुठल्या मानापमानाविना पार पडली. आता यामागे संघाची शिस्त आहे का पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा धाक, हे अलाहिदा! गेल्या चार महिन्यांचा सरकारचा कार्यकाळ पाहिला तर एकाही मंत्र्याने धोरणात्मक भाष्य केले आहे, असे दिसत नाही. ती जबाबदारी पंतप्रधान एकटेच निभावत आहेत. त्यांची भाषणे मात्र अगदीच सुभाषितांचा संग्रह वाटतात! पराभवानंतरचा काँग्रेस पक्षही आत्मपरीक्षण न करता निव्वळ राहुल गांधींच्या कौतुकातच मग्न राहिल्याचे ते म्हणाले. सध्याचे राजकीय चित्र पाहता येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये संधीसाधूंच्या घोडेबाजाराची चलती असल्याची भावनाही हर्डीकर यांनी व्यक्त केली.