शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

भरधाव एसयूव्ही पुलावरून कोसळून दोघेजण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 18:03 IST

चोरवाघालगाव शिवारातील घटना 

ठळक मुद्देदोघेजण गंभीर जखमी

वैजापूर : भरधाव जाणारी एसयूव्ही जीप पुलावरून खाली कोसळून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी ( दि. ९) रात्री ९.४५ च्या सुमारास तालुक्यातील वैजापूर-गंगापूर राज्य महामार्गावरील चोरवाघालगाव शिवारात घडली. विक्रम वामनराव कुलथे (५५) व चांगदेव पुंजाराम गायकवाड(५५) अशी मृतांची नावे आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूरहून औरंगाबादकडे एक एसयूव्ही जीप जात होती. दरम्यान चोरवाघलगाव शिवारात समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाचा प्रखर प्रकाशझोत चालकाच्या डोळ्यावर पडल्याने त्याला समोरचा रस्ता दिसेनासा झाला. यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि जीप थेट पुलावरून खाली कोसळली. यात जीपमधील विक्रम कुलथे व चांगदेव गायकवाड हे दोघे जागीच ठार झाले. तर चालक आकाश जाधव (२८) व योगेश पंडित (३३) हे दोघे गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती उपजिल्हा रुग्णालयात कळविले. त्यानंतर आपत्कालीन रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचली. रुग्णवाहिकेतील वैदकीय अधिकारी डॉ.अंजर शहा व चालक अनिल सुरासे या दोघांनी नागरिकांच्या मदतीने मृत दोघांसह जखमींना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. आरती ढाकणे यांनी यातील दोघांना तपासून मृत घोषित केले. आकाश जाधव व योगेश पंडित या दोघांनाही गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारार्थ औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान याप्रकरणी रात्री उशिरा पर्यंत पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली नव्हती. 

सध्या या भागात राज्य महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ही बाब स्वागतार्ह असली तरी संबंधीत ठेकेदाराने काम सुरू असताना सुरक्षेची पुरेशी काळजी घेण्यात आली नाही. महामार्गावर काम सुरु असलेल्या ठिकाणी दिशादर्शक किंवा सूचनाफलक लावण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रवाशांना नाहक आपला जीव गमवावा लागत आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद