शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव एसयूव्ही पुलावरून कोसळून दोघेजण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 18:03 IST

चोरवाघालगाव शिवारातील घटना 

ठळक मुद्देदोघेजण गंभीर जखमी

वैजापूर : भरधाव जाणारी एसयूव्ही जीप पुलावरून खाली कोसळून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी ( दि. ९) रात्री ९.४५ च्या सुमारास तालुक्यातील वैजापूर-गंगापूर राज्य महामार्गावरील चोरवाघालगाव शिवारात घडली. विक्रम वामनराव कुलथे (५५) व चांगदेव पुंजाराम गायकवाड(५५) अशी मृतांची नावे आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूरहून औरंगाबादकडे एक एसयूव्ही जीप जात होती. दरम्यान चोरवाघलगाव शिवारात समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाचा प्रखर प्रकाशझोत चालकाच्या डोळ्यावर पडल्याने त्याला समोरचा रस्ता दिसेनासा झाला. यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि जीप थेट पुलावरून खाली कोसळली. यात जीपमधील विक्रम कुलथे व चांगदेव गायकवाड हे दोघे जागीच ठार झाले. तर चालक आकाश जाधव (२८) व योगेश पंडित (३३) हे दोघे गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती उपजिल्हा रुग्णालयात कळविले. त्यानंतर आपत्कालीन रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचली. रुग्णवाहिकेतील वैदकीय अधिकारी डॉ.अंजर शहा व चालक अनिल सुरासे या दोघांनी नागरिकांच्या मदतीने मृत दोघांसह जखमींना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. आरती ढाकणे यांनी यातील दोघांना तपासून मृत घोषित केले. आकाश जाधव व योगेश पंडित या दोघांनाही गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारार्थ औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान याप्रकरणी रात्री उशिरा पर्यंत पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली नव्हती. 

सध्या या भागात राज्य महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ही बाब स्वागतार्ह असली तरी संबंधीत ठेकेदाराने काम सुरू असताना सुरक्षेची पुरेशी काळजी घेण्यात आली नाही. महामार्गावर काम सुरु असलेल्या ठिकाणी दिशादर्शक किंवा सूचनाफलक लावण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रवाशांना नाहक आपला जीव गमवावा लागत आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद