शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

आजारी आई-वडिलांचा आधार पावसाने हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 15:57 IST

ऑन द स्पॉट रिपोर्टिंग : पाण्यात पडल्यामुळे रुपालीच्या नाकातोंडात पाणी गेले. त्यामुळे तिला काहीच करता आले नाही.

ठळक मुद्देमुकुंदनगर येथील घटना दुसरी सहकारी बचावली रस्त्यासाठी नागरिकांनी ७ तास अंत्यसंस्कार रोखले

औरंगाबाद : घरात अठराविश्वे दारिद्र्य, आजारी आई-वडिलांमुळे कमावणारे कोणीच नाही. त्यामुळे शेंद्रा येथील कंपनीत काम करून घर चालविणाऱ्या तरुणीला मंगळवारी रात्रीच्या भयंकर पावसाने कायमचे हिरावुन नेले. अवघे १०० मिटर अंतरावर घर असताना रेल्वे पटरीच्या शेजारील नाल्याला आलेल्या पुरात ७०० मिटर वाहुन जात रुपाली दादाराव गायकवाड (२१, मुकुंदनगर, मुकुंदवाडी) हीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिच्यासोबतची म्रपाली रघुनाथ म्हस्के (१८, रा. मुकुंदनगर) ही २०० मिटर वाहत गेली, पण नशिब बल्लवत्तर म्हणून वाहत्या पाण्यात हाती आलेल्या एका झाडाला पकडल्यामुळे ती बचावली. ही घटना मंगळवारी रात्री साडेसात वाजेदम्यान घडली.

रुपाली व आम्रपाली शेंद्रा येथील धुत ट्रान्समिशन कंपनीत काम करतात. यावरच दोघींचे घर चालत होते. रुपालीचे आई-वडील दोघे नेहमीच आजारी पडतात. मोठ्या बहिणीचे लग्न झाले असून, एक भाऊ लहान आहे. त्यामुळे घर चालविण्याची जबाबदारी रुपालीवरच होती. शेंद्रा येथून कंपनीचे काम संपवून दोघी मंगळवारी रात्री घरी येत होत्या. रेल्वे गेटनंबर ५६ पासून पुढील भागात रस्ता नसल्यामुळे दोघी रेल्वे पटरीनेच घराकडे चालत गेल्या. रेल्वे पटरीच्या शेजारी छोटेखानी नाल्याच्या पलीकडेच १०० मिटर अंतरावर दोघींचे घर होते. पाणी वेगाने वाहत होते. बचावलेल्या आम्रपालीने रुपालीला सांगितले, आतमध्ये नको जायचे. पण रुपाली म्हणाली, थोडेसे पाणी आहे. आपण पलीकडे जाऊ शकतो. दोघी एकमेकींच्या हाताला धरुन पाण्यात उतरल्या. तेव्हा जायच्या रस्त्यावर असलेले दगड वाहुन गेले होते. त्याठिकाणी खड्डा पडला होता. यात एकीचा पाय घसरला आणि दोघी वाहुन जाऊ लागल्या. तेवढ्यात आम्रपालीने आरडाओरड केली. पाण्यात पडल्यामुळे रुपालीच्या नाकातोंडात पाणी गेले. त्यामुळे तिला काहीच करता आले नाही. पाणी वेगाने वाहत होते. २०० मीटर वाहुन गेल्यावर आम्रपालीने एका झाडाला पकडले. त्यामुळे ती बचावली. तेवढ्यात काही लोक पळत आले. त्यांनी तात्काळ तिला बाहेर काढले. मात्र रुपाली वेगाने पाण्यासोबत वाहुन गेली. नागरिकांनी तिकडेही धाव घेतली, मात्र तिला वाचवू शकले नाही. घटनास्थळापासून ७०० मिटर अंतरावर तिचा मृतदेह रात्री ९.३० वाजता सापडला. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त करण्यात येत असून, केवळ रस्ता नसल्यामुळे कमावत्या मुलीचा जीव गेला. याला महापालिका प्रशासन आणि राजकीय पक्ष जबाबदार असल्याचा आरोपही नागरिकांनी केला.

हेही वाचा - जालना रोडचे झाले तळे; नॅशनल हायवे ॲथॉरिटीने केलेला १३ कोटींचा खर्च खड्ड्यात

'लोकमत'ने पोलिसांना कळविलेघटनास्थळीच नागरिकांनी घाटीतून आणलेला रूपालीचा मृतदेह ठेवला होता. रस्ता झाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेत आक्रोश व्यक्त करण्यात येत होता. ही माहिती समजताच ‘लोकमत’ प्रतिनिधी व छायाचित्रकार घटनास्थळी पोहोचले, तेव्हा महापालिका प्रशासन, पोलीस कोणीही तेथे नव्हते. मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोज पगारे यांना याची माहिती ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने दिली. त्यानंतर निरीक्षक पगारे, दुय्यम निरीक्षक ब्रह्मा गिरी यांच्यासह पोलिसांचा फाैजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलीस विभागाने मनपाच्या अधिकाऱ्यांना कळविले. मनपाच्या अधिकाऱ्यांनी मृत मुलीच्या कुटुंबीयांना नियमाप्रमाणे आर्थिक मदत आणि परिसरातील नागरिकांनी रस्ता बनवून देण्याचे आश्वासन दिले. यानंतर दुपारी ४ वाजता मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूAurangabadऔरंगाबादfloodपूर