शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पैठणसाठी रविवार ठरला अपघात वार; दोघांचा अपघातात तर एकाचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 13:25 IST

कार उलटून पती ठार; ५ महिन्यांच्या बाळासह पत्नी बचावली

पैठण/ पाचोड: पैठण तालुक्यासाठी रविवार हा अपघात वार ठरला असून या दिवशी तालुक्यात ४ दुर्दैवी घटना घडल्या. अपघाताच्या दोन घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. तर पोहण्यासाठी गेलेल्या एकाचा मृत्यू झाला असून अन्य एक तरूण वाहून गेला आहे. २६ तासानंतरही हा तरूण सापडलेला नाही.

कार उलटून पती ठार; ५ महिन्यांच्या बाळासह पत्नी बचावलीपाचोड : धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आडगाव जावळे शिवारात रविवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास एक कार राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेल्या लोखंडी पट्ट्यावर आदळून झालेल्या अपघातात पतीचा मृत्यू झाला असून, पत्नी व पाच महिन्यांचा मुलगा जखमी झाला असून, त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव येथील विष्णू बाबासाहेब गाडगे (वय २४ वर्षे) हे पत्नी व लहान बाळासह एका कारमधून (एमएच ०१ सीजे ६११०) छत्रपती संभाजीनगरहून गावाकडे जात असताना आडगाव जावळे शिवार एका छोट्या वळणावर विष्णू गाडगे यांचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे ही कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या लोखंडी पट्ट्यावर जाऊन आदळली. या अपघातात विष्णू बाबासाहेब गाडगे हे गंभीर जखमी झाले; तर रोहिणी विष्णू घाडगे (वय १९ वर्षे) व पाच महिन्यांचा मुलगा यांनाही मार लागला. याबाबत माहिती मिळताच पाचोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शरद्चंद्र रोडगे यांनी टोलनाक्यावर फोन करून घटनास्थळी रुग्णवाहिका पाठवली. त्यानंतर तातडीने रुग्णवाहिका दाखल झाली. तिच्यातून तिन्ही जखमींना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम ठाकरे यांनी विष्णू बाबासाहेब गाडगे यांना तपासून मृत घोषित केले. जखमी रोहिणी विष्णू गाडगे व पाच महिन्यांच्या बाळावर उपचार सुरू आहेत. या घटनेची पाचोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शरद्चंद्र रोडगे करीत आहेत.

पोहण्यासाठी गेलेल्या एकाचा मृत्यूपैठण : सकाळी व्यायाम झाल्यानंतर जायकवाडी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या एका ३५ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास, तर तेलवाडी येथील दक्षिण जायकवाडीजवळून गेलेल्या कॅनॉलमध्ये पोहण्यासाठी गेलेला एक २४ वर्षीय तरुण पाण्यात वाहून गेल्याची घटना शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

पैठण शहरातील अन्नपूर्णानगर भागात राहणारा प्रमोद कोल्हे हा तरुण रविवारी सकाळी सकाळी व्यायाम झाल्यानंतर ९ च्या सुमारास दोन मित्रांसह पोहण्यासाठी जायकवाडी धरणात गेला होता. पोहत असताना प्रमोद कोल्हे हा पाण्यात बुडाला. ही बाब त्याच्या मित्रांच्या निदर्शनास येताच, त्यांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यात यश आले नाही. ही माहिती प्रमोदच्या अन्य मित्रांना समजताच त्यांनी धरणाकडे धाव घेतली. त्यानंतर, पोलिस निरीक्षक संजय देशमुख, पोलिस उपनिरीक्षक दशरथ बुरकुल, जमादार विलास सुखधान आदींनीही घटनास्थळी दाखल होऊन काही युवकांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले. दोन तासांनंतर प्रमोदचा मृतदेह सापडला. त्यानंतर, तो पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पैठण येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, याबाबत पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघात