विम्याची भरपाई हप्त्यापेक्षा कमीच

By Admin | Updated: June 17, 2016 00:42 IST2016-06-17T00:10:21+5:302016-06-17T00:42:19+5:30

औरंगाबाद : गतवर्षी खरिपात पिकांचे नुकसान झाल्यामुळे जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मंजूर झाली आहे.

Sum assured is less than the premium | विम्याची भरपाई हप्त्यापेक्षा कमीच

विम्याची भरपाई हप्त्यापेक्षा कमीच

औरंगाबाद : गतवर्षी खरिपात पिकांचे नुकसान झाल्यामुळे जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मंजूर झाली आहे. मात्र, यातील अनेक शेतकऱ्यांना त्यांनी विमा हप्त्यापोटी जेवढी रक्कम भरली, त्याहीपेक्षा कमी रक्कम नुकसानभरपाई म्हणून मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणाची चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी अन्नदाता शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
संघटनेच्या वतीने गुरुवारी कृषी सहसंचालक कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेऊन ही व्यथा मांडण्यात आली. औरंगाबाद तालुक्यातील पिंप्रीराजा येथील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी केवळ ०.९८ टक्के प्रमाणे पीक विमा मंजूर झाला आहे. कृष्णा पवार यांच्यासह येथील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनसह इतरही पिकांचा विमा भरला होता. पवार यांनी सांगितले की, सोयाबीन पिकासाठी आम्ही हेक्टरी ५७७ रुपये प्रमाणे प्रीमियम भरले होते. आता आम्हाला नुकसानभरपाई मंजूर झाली आहे; परंतु प्रत्यक्षात भरपाईची ही रक्कम हेक्टरी १०६ रुपये इतकीच आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेत ही रक्कम जमा झाली आहे. बँकेकडे विचारणा केली असता त्यांनी ०.९८ टक्के म्हणजे एक टक्कापेक्षाही कमी भरपाई मंजूर झाल्याची माहिती दिली.

Web Title: Sum assured is less than the premium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.