शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
2
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
3
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
4
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
5
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
6
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
7
भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी...
8
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय
9
बाहुबली नेते राजा भैय्या यांच्या मुलांनी आईवर केले गंभीर आरोप, म्हणाले, "आमच्या घरात…’’  
10
ललिता पंचमी व्रत २०२५: शुक्रवारी इच्छापूर्तीसाठी 'असे' करा ललिता पंचमीचे व्रत; टाळा 'ही' एक चूक!
11
"हो मला बाबा व्हायचंय...", ५९व्या वर्षी सलमान खानला हवंय मूल, म्हणाला...
12
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
14
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
15
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
16
"पैशाचं सोंग आणता येत नाही, मग सरकार शेतकऱ्यांना जीवन संपवू देणार का?’’, विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
17
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
18
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
19
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
20
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका

औैरंगाबाद जिल्ह्यात ५ हजार हेक्टरने वाढले उसाचे क्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 01:05 IST

साखरेचे भाव बाजारपेठेत गडगडले असतानाही यंदा जिल्ह्यात ५०११.७० हेक्टरने उसाचे क्षेत्र वाढले आहे. मागील वर्षी बोंडअळीच्या उद्रेकामुळे कपाशीऐवजी ऊस लागवडीला शेतकºयांनी प्राधान्य दिले आहे.

ठळक मुद्देबदलती पीक परिस्थिती : कपाशीऐवजी उसाकडे शेतकऱ्यांचा कल; १७ लाख मे.टन उसाचे होणार उत्पादन

लोकमत न्यूज नेटवर्कऔैरंगाबाद : साखरेचे भाव बाजारपेठेत गडगडले असतानाही यंदा जिल्ह्यात ५०११.७० हेक्टरने उसाचे क्षेत्र वाढले आहे. मागील वर्षी बोंडअळीच्या उद्रेकामुळे कपाशीऐवजी ऊस लागवडीला शेतकºयांनी प्राधान्य दिले आहे.औरंगाबाद जिल्ह्याचा विचार केला तर काही भागात कापूस पिकाचे क्षेत्र उसाच्या क्षेत्रात परावर्तीत झाले आहे. मागील २०१६-२०१७ या गाळप हंगामाचा विचार केला, तर जिल्ह्यात २१३२५.३० हेक्टरवर उसाची लागवड झाली होती. यात औरंगाबाद तालुक्यात ४४२ हेक्टर, पैठण ७७८७ हेक्टर, फुलंब्री ४५९.३ हेक्टर, गंगापूर ७५१८.२ हेक्टर, वैजापूर २०२२.५ हेक्टर, खुलताबाद ११००.८ हेक्टर, सिल्लोड ५११.३ हेक्टर, कन्नड १४८४.३ हेक्टरचा समावेश होता. मात्र, या वर्षाच्या उत्तरार्धात सुरूहोणाºया गाळप हंगामासाठी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यांतर्गत २६२८ हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. संत एकनाथ कारखान्यांतर्गत ४५९० हेक्टर, छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्यांतर्गत ४५२५ हेक्टर, मुक्तेश्वर कारखान्यांतर्गत ५३४४ हेक्टर, बारामती अ‍ॅग्रो या कन्नड येथील साखर कारखान्यांतर्गत ६८०९ तर शरद साखर कारखान्यांतर्गत २३४१ हेक्टर असे एकूण २६३३७ हेक्टरवर लागवड झाली. कृषी विभागानुसार यंदा पाऊस समाधानकारक राहिला, तर १७ लाख ९९ हजार मेट्रिक टन उसाचे उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यात सरासरी कपाशीचे क्षेत्र ४ लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्र आहे. मात्र, खरीप हंगामात ३ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रावरच कपाशीची लागवड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मागील हंगामाच्या तुलनेत ६० हजार हेक्टरने कपाशी क्षेत्र कमी होईल. उसाचे क्षेत्र ५०११.७० हेक्टरने वाढणार आहे. अन्य ५५ हजार हेक्टर पीक मका, बाजरी व अन्य कडधान्याच्या क्षेत्रात परावर्तीत होणार आहे.१४ लाख २३ हजार क्विंटल साखरेचे उत्पादनजिल्ह्यात एक सहकारी व चार खाजगी अशा ५ साखर कारखान्यांनी मिळून मागील हंगामात १४ लाख ३५ हजार ३२७ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या कारखान्यांनी १४ लाख ४३ हजार ३२२ मे.टन उसाचे गाळप केले.या पासून ९.९५ टक्के उतारा मिळाला. मात्र, कृषी विभागाच्या अहवालानुसार यंदा जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढणार असून, १७ लाख ९९ हजार मेट्रिक टन उसाचे उत्पादन होणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत येत्या हंगामात ३ लाख ५५ हजार ७७३.४९ मे.टनने ऊस उत्पादन वाढेल. यामुळे साखरेच्या उत्पादनातही वाढ होणार असल्याची माहिती कृषी अधिकाºयांनी दिली.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेAurangabadऔरंगाबादagricultureशेती