शहरं
Join us  
Trending Stories
1
निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार, बॉम्ब टाकण्याचे आदेश, शेख हसीना दोषी, कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा 
2
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
3
भाजपाचा यू टर्न! काशिनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगिती; पालघर साधू हत्याकांडात झाले होते आरोप
4
Delhi Blast : नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
5
Video: माकडाच्या उडीने REEL मध्ये आलं वेगळंच 'थ्रिल' !! घाबरलेल्या मुलीने पुढे काय केलं बघा
6
चाणक्यनीती: कोणी त्रास देत असेल तर अशा हितशत्रूंशी लढण्यासाठी वापरा 'या' ३ गुप्त रणनीती! |
7
"मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
8
भारत सरकार शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठवणार? नियम काय सांगतात?
9
भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
10
ATM मध्ये दोनदा 'कॅन्सल' बटन दाबल्यास तुमचे पैसे सुरक्षित राहतात? व्हायरल दाव्याचे सत्य काय?
11
Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
12
काय सांगता! वय ९१ वर्षे, रोज १२ तास काम करतात, फिटनेसचे रहस्य वाचून अवाक् व्हाल
13
Amravati: अमरावतीत उपजिल्हा रुग्णालयात तीन बालकांसह गर्भवतीचा दुदैवी अंत!
14
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
15
ओवेसींच्या पाठिंब्याने आमदार बनले काँग्रेसचे नवीन यादव; विजयानंतर पाया पडून मानले आभार
16
UPI Transaction Failed: UPI ट्रान्झॅक्शन फेल झालं? घाबरू नका, त्वरित फॉलो करा 'या' स्टेप्स
17
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला घातल्या गोळ्या!
18
"भारत कुठल्याही युद्धासाठी तयार...!", जनरल द्विवेदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा; चीनसंदर्भातही बोलले
19
नासिरशी निकाहाचा व्हिडीओ व्हायरल होताच पुन्हा गायब झाली सरबजीत कौर; वकिलाने केलं मोठं वक्तव्य! म्हणाला-
20
Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार
Daily Top 2Weekly Top 5

औैरंगाबाद जिल्ह्यात ५ हजार हेक्टरने वाढले उसाचे क्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 01:05 IST

साखरेचे भाव बाजारपेठेत गडगडले असतानाही यंदा जिल्ह्यात ५०११.७० हेक्टरने उसाचे क्षेत्र वाढले आहे. मागील वर्षी बोंडअळीच्या उद्रेकामुळे कपाशीऐवजी ऊस लागवडीला शेतकºयांनी प्राधान्य दिले आहे.

ठळक मुद्देबदलती पीक परिस्थिती : कपाशीऐवजी उसाकडे शेतकऱ्यांचा कल; १७ लाख मे.टन उसाचे होणार उत्पादन

लोकमत न्यूज नेटवर्कऔैरंगाबाद : साखरेचे भाव बाजारपेठेत गडगडले असतानाही यंदा जिल्ह्यात ५०११.७० हेक्टरने उसाचे क्षेत्र वाढले आहे. मागील वर्षी बोंडअळीच्या उद्रेकामुळे कपाशीऐवजी ऊस लागवडीला शेतकºयांनी प्राधान्य दिले आहे.औरंगाबाद जिल्ह्याचा विचार केला तर काही भागात कापूस पिकाचे क्षेत्र उसाच्या क्षेत्रात परावर्तीत झाले आहे. मागील २०१६-२०१७ या गाळप हंगामाचा विचार केला, तर जिल्ह्यात २१३२५.३० हेक्टरवर उसाची लागवड झाली होती. यात औरंगाबाद तालुक्यात ४४२ हेक्टर, पैठण ७७८७ हेक्टर, फुलंब्री ४५९.३ हेक्टर, गंगापूर ७५१८.२ हेक्टर, वैजापूर २०२२.५ हेक्टर, खुलताबाद ११००.८ हेक्टर, सिल्लोड ५११.३ हेक्टर, कन्नड १४८४.३ हेक्टरचा समावेश होता. मात्र, या वर्षाच्या उत्तरार्धात सुरूहोणाºया गाळप हंगामासाठी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यांतर्गत २६२८ हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. संत एकनाथ कारखान्यांतर्गत ४५९० हेक्टर, छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्यांतर्गत ४५२५ हेक्टर, मुक्तेश्वर कारखान्यांतर्गत ५३४४ हेक्टर, बारामती अ‍ॅग्रो या कन्नड येथील साखर कारखान्यांतर्गत ६८०९ तर शरद साखर कारखान्यांतर्गत २३४१ हेक्टर असे एकूण २६३३७ हेक्टरवर लागवड झाली. कृषी विभागानुसार यंदा पाऊस समाधानकारक राहिला, तर १७ लाख ९९ हजार मेट्रिक टन उसाचे उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यात सरासरी कपाशीचे क्षेत्र ४ लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्र आहे. मात्र, खरीप हंगामात ३ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रावरच कपाशीची लागवड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मागील हंगामाच्या तुलनेत ६० हजार हेक्टरने कपाशी क्षेत्र कमी होईल. उसाचे क्षेत्र ५०११.७० हेक्टरने वाढणार आहे. अन्य ५५ हजार हेक्टर पीक मका, बाजरी व अन्य कडधान्याच्या क्षेत्रात परावर्तीत होणार आहे.१४ लाख २३ हजार क्विंटल साखरेचे उत्पादनजिल्ह्यात एक सहकारी व चार खाजगी अशा ५ साखर कारखान्यांनी मिळून मागील हंगामात १४ लाख ३५ हजार ३२७ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या कारखान्यांनी १४ लाख ४३ हजार ३२२ मे.टन उसाचे गाळप केले.या पासून ९.९५ टक्के उतारा मिळाला. मात्र, कृषी विभागाच्या अहवालानुसार यंदा जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढणार असून, १७ लाख ९९ हजार मेट्रिक टन उसाचे उत्पादन होणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत येत्या हंगामात ३ लाख ५५ हजार ७७३.४९ मे.टनने ऊस उत्पादन वाढेल. यामुळे साखरेच्या उत्पादनातही वाढ होणार असल्याची माहिती कृषी अधिकाºयांनी दिली.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेAurangabadऔरंगाबादagricultureशेती