शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

अशी झाली फजिती; बाजीराव बसले लोटा घेऊन, चोरांनी मोबाइल नेला हिसका देऊन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 19:29 IST

गंगापूर तालुक्यातील सिद्धपूरची घटना; लोकलज्जेच्या भीतीने दिली नाही तक्रार

- जयेश निरपळगंगापूर : मोबाइलच्या व्यसनाने एखाद्या वेळी कशी फटफजिती होते, याची प्रचिती गंगापूर तालुक्यातील सिद्धपूर येथे एका इसमाला चांगलीच आली. उघड्यावर बसून शौच करणारा हा इसम मोबाइलवरूनही बोटे चाळीत होता. तेवढ्यात चोरट्यांनी त्याच्या हातातील मोबाइल हिसकावून पोबारा केला. नंतर गावकऱ्यांच्या मदतीने यातील एका चोराला पकडल्याने मोबाइल मिळाला, मात्र ही घटना गावात सगळीकडे हसून चवीने चघळली जात असल्याचे पाहून हा इसम मात्र खजील झाला होता.

मोबाइलचे वेड नुसते शहरी भागातील नागरिकांनाच लागले आहे असे नाही, तर ग्रामीण भागातील तरुणांसह मध्यमवयीन व वृद्धांनाही आता मोबाइलशिवाय करमेनासे झाले आहे. हे व्यसन एवढे घट्ट आहे की, खाताना, बसताना, झोपताना तरुणांना मोबाइलशिवाय काहीही सुचत नसल्याचे दिसत आहे.

सिद्धपूर येथील बाजीराव (नाव बदललेले आहे) हे शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उघड्यावर लोटा घेऊन मोकळे होण्यासाठी गेले होते. मोकळे होतानाही बाजीराव आपल्या १८ हजारांच्या मोबाईलवरून बोटे फिरवीत होते. पण तेवढ्यात तीन अनोळखी तरुण दुचाकीवरून त्यांच्याजवळ येऊन थांबले. बाजीराव मोबाइलमध्ये गुंग असल्याचे पाहून त्यांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पोबारा केला. बाजीराव आवरसावर करेपर्यंत चोरटे अंधारात गायब झाले. मात्र ते चोर गडबडीत गावाच्या दिशेने गेले होते. बाजीरावांनी लाजत-काजत गावातील तरुणांना आपबीती सांगितली. तरुणांनी त्या मार्गाच्या वस्तीवरील नागरिकांना फोन केला व मोबाइल लांबविणारे पकडले गेले. त्यातील दोघे अंधाराचा फायदा घेऊन पळाले, मात्र मोबाइलसह मुख्य सूत्रधार सापडला.

‘आरं पण तिथं कोणी मोबाइल पाहतं का?’उघड्यावर शौच करीत असताना चोरट्यांनी मोबाइल पळविल्याची घटना तात्काळ गावात पसरली होती. यामुळे बाजीरावांच्या इज्जतीचा चांगलाच पंचनामा झाला. ‘आरं पण तिथं कोणी मोबाइल पाहतं का?, घरी येऊन पाहायचा ना...’ असे म्हणून काही वृद्धांनी बाजीरावांना खडसावले. यामुळे बाजीरावांना काय बोलावे काहीच सुचत नव्हते. चोरटा पकडल्यानंतर मात्र खजील झालेल्या बाजीरावांनी या चोरट्याला चांगलाच चोप देऊन भडास काढली. इज्जतीचा आणखी पंचनामा नको, म्हणून पोलिसांत न देता त्यांनी चोरट्याला सोडून दिले.

गावांमधील टमरेल जाता जाईना...गावांसह शहरे आता डिजिटल क्रांतीकडे जात आहेत. मात्र अद्यापही गावांमधील टमरेल काही गेले नसल्याचे सिद्धपूरमधील घटनेवरून दिसून येत आहे. मोबाइल पकडणाऱ्या हाताला टमरेलमुक्त करण्यासाठी शासन स्तरावर अनेक उपक्रम राबविले जातात, मात्र नागरिकांना त्याचा काही फरक पडत नाही. 

टॅग्स :MobileमोबाइलtheftचोरीAurangabadऔरंगाबाद