शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
5
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
6
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
7
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
9
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
10
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
11
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
12
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
13
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
14
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
15
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
16
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
17
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
18
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
19
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
20
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अशी असेल गणेश मंडळांसाठी पोलिसांची आचारसंहिता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 17:52 IST

शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याचा उद्देश

ठळक मुद्देधर्मादाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय वर्गणी सक्तीने गोळा करू नयेविसर्जन मिरवणूक लवकर काढून रात्री १२ वाजेपर्यंत पूर्ण करावी

औरंगाबाद : जातीय सलोखा कायम ठेवून सतत सर्वधर्मसमभाव जोपासणारे हे शहर सामाजिक बांधिलकी सांभाळते. संपूर्ण शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, सर्व जनतेला सुरक्षित व शांततापूर्ण जीवन लाभावे यादृष्टीने पोलीस आयुक्तालयाकडून प्रत्येक गणेश मंडळासाठी गणेशोत्सवासाठी आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. सामाजिक व सार्वजनिक स्वास्थ्य राखण्यास त्याची मदत होईल, असे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी मंगळवारी जाहीर केले आहे. 

अशी असेल आचारसंहिता- धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी आवश्यक, ताळेबंदाबाबत पूर्तता करावी, धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय वर्गणी सक्तीने गोळा करू नये, गणपतीपुढील मंडपाने रहदारीस अडथळा होऊ नये, ना हरकत प्रमाणपत्र हवे.- सजावटीस आग लागू नये, याची दक्षता घ्यावी, इतर धर्मीयांच्या भावना दुखावल्या जातील, अशी सजावट नसावी, प्रखर तेजाचे दिवे टाळावेत, रोषणाईत शॉर्टसर्किट होणार नाही, याची काळजी घ्यावी, पर्यायी प्रकाशाची व्यवस्था ठेवावी- देखाव्याची माहिती संबंधित ठाण्याला कळवावी, उत्सवकाळातील कार्यक्रमांची माहिती पोलिसांना द्यावी, बंदोबस्त देणे सोयीचे होऊ शकते.- लाऊडस्पीकरसाठी ठाण्यातून परवानगी आवश्यकच, बीभत्स गाणी नको, ध्वनिक्षेपण रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत करता येणार नाही, मूर्तीची देखभाल जबाबदारी मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांनी २४ तास करावी. त्यांची नावे प्रत्येक दिवशी कागदावर लिहून ठेवावीत.- गणपती देखावे आक्षेपार्ह असू नयेत, तिकीट शो असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय करमणूक शाखेकडून परवानगी घ्यावी. मिरवणूक देखाव्यात विजेच्या तारांचा संपर्क होणार नाही, याची दक्षता घ्यावी. - मद्यपान, बीभत्स वर्तन करणाऱ्यास पोलिसांच्या ताब्यात द्यावे. करमणुकीच्या कार्यक्रमात संयोजकांनी दोर लावून बंदोबस्त ठेवावा. मंडपात मेणबत्ती, दिवा, अगरबत्ती सुरक्षित असावी. - विसर्जन मिरवणुकीसाठीच्या वाहनाचे आरटीओकडून तपासून प्रमाणपत्र घ्यावे. देखावे पाहणाऱ्यासाठी सुरक्षा असावी. - मंडप व विसर्जन विहिरीजवळ फटाके फोडू नयेत. विसर्जनस्थळी प्रकाशव्यवस्था आहे; परंतु लहान मुलांना जपावे, पाण्यात उतरू देऊ नये. बेवारस वस्तूविषयी पोलिसांना कळवावे. मदतीसाठी स्थानिक पोलीस चौकी, ठाणे, नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. - मूर्तीशेजारी खाद्यपदार्थ ठेवू नयेत. वाहन बंद पडू नये याची दक्षता घ्यावी, वाहनावर मंडळ, अध्यक्ष-सचिवाची नावे लिहावीत, खिसेकापूपासून सावधान, अफवा पसरवू नका.- मिरवणूक अथवा देखावे पाहायला जाताना महिलांनी दागिने परिधान करणे टाळावे, मुलांना एकटे सोडू नका, मंडळाच्या स्वयंसेवक व कार्यकर्त्यांनी मद्य प्राशन करू नये, आरती सावधपणे हाताळावी, महिला-मुलींची छेडछाड होऊ नये, याची दक्षता घ्यावी, आरतीमध्ये अपरिचित व्यक्तीकडून प्रसाद, नैवेद्यासाठी मिठाई, पूजेसाठीची फुले स्वीकारू नयेत. - कार्यकर्ते, स्वयंसेवकांना फोटो पास द्यावेत, विसर्जन मिरवणूक लवकर काढून रात्री १२ वाजेपर्यंत पूर्ण करावी, मिरवणुकीत बैलगाडीचा वापर टाळावा, आगीचा बंब, रुग्णवाहिका, पोलीस वाहने सहजपणे जाऊ शकतील एवढी जागा मंडपाच्या बाजूला ठेवावी. - जुगार व अवैध धंदे, दारू, मटका, संशयास्पद व्यक्ती, समाजकंटकांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून नियंत्रण कक्ष व स्थानिक पोलिसांना संपर्क साधवा.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवAurangabadऔरंगाबादCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबादPoliceपोलिस