शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

स्वाध्यायपासून विद्यार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:04 IST

योगेश पायघन औरंगाबाद : कोरोनामुळे शाळा बंद असली तरी विद्यार्थ्यांचा अभ्यास व्हावा यासाठी शिक्षण विभागाने स्टुडंट व्हाॅट्सॲप बेस्ड डिजिटल ...

योगेश पायघन

औरंगाबाद : कोरोनामुळे शाळा बंद असली तरी विद्यार्थ्यांचा अभ्यास व्हावा यासाठी शिक्षण विभागाने स्टुडंट व्हाॅट्सॲप बेस्ड डिजिटल होम असेसमेंट (स्वाध्याय) योजना सुरू केली; मात्र ऑनलाईन शिक्षणाकडे विविध कारणांनी ६० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी पाठ फिरवलेली असल्याने स्वाध्याय मालिकेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात केवळ ७.२३ टक्के विद्यार्थ्यांनीच स्वाध्याय सोडवण्यासाठी नोंदणी केली.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) स्टुडंट व्हाॅट्सॲप बेस्ड डिजिटल होम असेसमेंट (स्वाध्याय) योजना ३ नोव्हेंबरला सुरू केली. एकंदर जिल्ह्यात शाळा सुरू झाल्यावर याकडे दुर्लक्ष झाले होते; मात्र शाळा पुन्हा बंद झाल्यावर दर शनिवारी घेण्यात येणाऱ्या उपक्रमास गेल्या चार आठवड्यांत जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तर १९ व्या आठवड्यात या आकडेवारीत कमालीची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. स्मार्टफोन नाही, इंटरनेट नाही, व्हॉट्सॲप नाही, एका घरात पालक आणि विद्यार्थ्यांत एकच मोबाईल यासह अनेक तांत्रिक कारणांमुळे ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणात अडचणी येत असल्याने शिक्षणाची परिस्थिती चिंताजनक आहे.

अठराव्या आठवड्यात ३० हजारांपेक्षा कमी नोंदणी १९ व्या आठवड्यात ६० हजारांपर्यंत पोहोचली. आतापर्यंत पहिली ते दहावीच्या ६० हजार ९२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली तर ५७ हजार १६९ विद्यार्थ्यांनी स्वाध्याय सोडविला आहे. शिक्षण विभागानेही विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी डाएटमार्फत वेळोवेळी फाॅलोअप घेतला जात आहे. स्वाध्यायला आता प्रतिसाद मिळत असला तरी वंचित विद्यार्थी संख्या काळजीत टाकणारी आहे.

---

नोंदणीचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न

स्वाध्यायसाठी विद्यार्थ्यांकडून नोंदणी व ते सोडवून घेण्यासाठी शाळांना सूचना दिल्या आहेत; मात्र इतर जिल्ह्यांच्या तुलनेत औरंगाबादची परिस्थिती वेगळी आहे. फार कमी काळ शाळा सुरु राहिल्या. पुन्हा बंद झाल्या. त्यातच अनेक शिक्षक पाॅझिटिव्ह आल्याने शाळा बंद ठेवाव्या लागल्या आहेत. नोंदणीत जिल्हा मागे असून हे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु असून या आठवड्यात विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

-सूरजप्रसाद जयस्वाल, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग, जि.प. औरंगाबाद

--

जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी ८,०२,०२०

स्वाध्यायसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी ६०,९२४

स्वाध्याय सोडवलेले विद्यार्थी ५७,१६९

---

उर्दूृनंतर मराठी स्वाध्यायाला प्रतिसाद

उर्दूच्या स्वाध्याय मालिकेला सर्वाधिक प्रतिसाद आहे. त्यापाठोपाठ मराठी, त्यानंतर गणित आणि विज्ञान विषयांचा क्रमांक लागतो. तर नोंदणी व स्वाध्याय सोडवण्यात औरंगाबाद तालुक्यासह गंगापूर आघाडीवर असून फुलंब्री आणि खुलताबाद तालुक्यात विद्यार्थ्यांचा प्रतिसाद सर्वात कमी आहे.

---

स्वाध्यायची प्रश्नावली बहुपर्यायी असल्याने पटकन सोडवून होते. शिवाय अभ्यासाची उजळणी त्यामुळे सोपी झाली आहे. त्यामुळे किती कळलं तेही लगेच निकालामुळे कळते.

-प्रांजल सोनवणे, विद्यार्थिनी

पाच आठवड्यापासून प्रश्नावली सोडवत आहे. स्वाध्याय योजनेमुळे काय शिकलो ते किती कळाले लगेच लागणाऱ्या निकालातून कळते. त्यामुळे अभ्यासात त्याचा फायदा होत आहे.

-गाैरव खडके, विद्यार्थी