शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
5
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
6
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
7
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
8
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
9
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
10
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
11
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
12
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
13
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
14
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
15
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
16
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
17
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
18
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
19
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
20
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

स्वाध्यायपासून विद्यार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:04 IST

योगेश पायघन औरंगाबाद : कोरोनामुळे शाळा बंद असली तरी विद्यार्थ्यांचा अभ्यास व्हावा यासाठी शिक्षण विभागाने स्टुडंट व्हाॅट्सॲप बेस्ड डिजिटल ...

योगेश पायघन

औरंगाबाद : कोरोनामुळे शाळा बंद असली तरी विद्यार्थ्यांचा अभ्यास व्हावा यासाठी शिक्षण विभागाने स्टुडंट व्हाॅट्सॲप बेस्ड डिजिटल होम असेसमेंट (स्वाध्याय) योजना सुरू केली; मात्र ऑनलाईन शिक्षणाकडे विविध कारणांनी ६० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी पाठ फिरवलेली असल्याने स्वाध्याय मालिकेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात केवळ ७.२३ टक्के विद्यार्थ्यांनीच स्वाध्याय सोडवण्यासाठी नोंदणी केली.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) स्टुडंट व्हाॅट्सॲप बेस्ड डिजिटल होम असेसमेंट (स्वाध्याय) योजना ३ नोव्हेंबरला सुरू केली. एकंदर जिल्ह्यात शाळा सुरू झाल्यावर याकडे दुर्लक्ष झाले होते; मात्र शाळा पुन्हा बंद झाल्यावर दर शनिवारी घेण्यात येणाऱ्या उपक्रमास गेल्या चार आठवड्यांत जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तर १९ व्या आठवड्यात या आकडेवारीत कमालीची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. स्मार्टफोन नाही, इंटरनेट नाही, व्हॉट्सॲप नाही, एका घरात पालक आणि विद्यार्थ्यांत एकच मोबाईल यासह अनेक तांत्रिक कारणांमुळे ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणात अडचणी येत असल्याने शिक्षणाची परिस्थिती चिंताजनक आहे.

अठराव्या आठवड्यात ३० हजारांपेक्षा कमी नोंदणी १९ व्या आठवड्यात ६० हजारांपर्यंत पोहोचली. आतापर्यंत पहिली ते दहावीच्या ६० हजार ९२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली तर ५७ हजार १६९ विद्यार्थ्यांनी स्वाध्याय सोडविला आहे. शिक्षण विभागानेही विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी डाएटमार्फत वेळोवेळी फाॅलोअप घेतला जात आहे. स्वाध्यायला आता प्रतिसाद मिळत असला तरी वंचित विद्यार्थी संख्या काळजीत टाकणारी आहे.

---

नोंदणीचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न

स्वाध्यायसाठी विद्यार्थ्यांकडून नोंदणी व ते सोडवून घेण्यासाठी शाळांना सूचना दिल्या आहेत; मात्र इतर जिल्ह्यांच्या तुलनेत औरंगाबादची परिस्थिती वेगळी आहे. फार कमी काळ शाळा सुरु राहिल्या. पुन्हा बंद झाल्या. त्यातच अनेक शिक्षक पाॅझिटिव्ह आल्याने शाळा बंद ठेवाव्या लागल्या आहेत. नोंदणीत जिल्हा मागे असून हे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु असून या आठवड्यात विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

-सूरजप्रसाद जयस्वाल, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग, जि.प. औरंगाबाद

--

जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी ८,०२,०२०

स्वाध्यायसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी ६०,९२४

स्वाध्याय सोडवलेले विद्यार्थी ५७,१६९

---

उर्दूृनंतर मराठी स्वाध्यायाला प्रतिसाद

उर्दूच्या स्वाध्याय मालिकेला सर्वाधिक प्रतिसाद आहे. त्यापाठोपाठ मराठी, त्यानंतर गणित आणि विज्ञान विषयांचा क्रमांक लागतो. तर नोंदणी व स्वाध्याय सोडवण्यात औरंगाबाद तालुक्यासह गंगापूर आघाडीवर असून फुलंब्री आणि खुलताबाद तालुक्यात विद्यार्थ्यांचा प्रतिसाद सर्वात कमी आहे.

---

स्वाध्यायची प्रश्नावली बहुपर्यायी असल्याने पटकन सोडवून होते. शिवाय अभ्यासाची उजळणी त्यामुळे सोपी झाली आहे. त्यामुळे किती कळलं तेही लगेच निकालामुळे कळते.

-प्रांजल सोनवणे, विद्यार्थिनी

पाच आठवड्यापासून प्रश्नावली सोडवत आहे. स्वाध्याय योजनेमुळे काय शिकलो ते किती कळाले लगेच लागणाऱ्या निकालातून कळते. त्यामुळे अभ्यासात त्याचा फायदा होत आहे.

-गाैरव खडके, विद्यार्थी