शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरील पादचारी पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 12:38 PM

शहरातील रेल्वेस्टेशनवरील पादचारी पुलांचे (दादरा) स्ट्रक्चरल आॅडिट कागदावरच आहे. रेल्वेस्टेशनवरील दोन पुलांवर प्रवाशांची भिस्त आहे; परंतु अरुंद जागेमुळे दररोज हजारो प्रवाशांना गर्दीतून ये-जा करावी लागत आहे, तर रेल्वेस्टेशन परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या पुलाची अत्यंत दुरवस्था झालेली आहे.

ठळक मुद्देदोन पुलांवरच प्रवाशांची भिस्तवाढत्या गर्दीमुळे तिस-या पुलाची दुरवस्था

औरंगाबाद, दि. २ : शहरातील रेल्वेस्टेशनवरील पादचारी पुलांचे (दादरा) स्ट्रक्चरल आॅडिट कागदावरच आहे. रेल्वेस्टेशनवरील दोन पुलांवर प्रवाशांची भिस्त आहे; परंतु अरुंद जागेमुळे दररोज हजारो प्रवाशांना गर्दीतून ये-जा करावी लागत आहे, तर रेल्वेस्टेशन परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या पुलाची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. त्याकडे कोणाचे लक्ष जात नसल्याने कधीही दुर्घटना घडू शकते.

औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरून दररोज धावणा-या, आठवड्यातून एकदा, दोनदा आणि तीनदा धावणाºया अशा ६१ रेल्वेंची येथून ये-जा होते. रेल्वेस्टेशनच्या नव्या आणि जुन्या इमारतीसमोर पादचारी पूल आहे. प्लॅटफॉर्म दोन आणि तीनवर येणाºया रेल्वेतील प्रवाशांना ये-जा करण्यासाठी हे दोन्ही पूल महत्त्वाचे ठरतात. पादचारी पुलांना जोडूनच सरकता जिना आणि लिफ्टची सुविधा आहे; परंतु अनेकदा ते बंद असतात. त्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक दोन व तीनवर रेल्वे आल्यानंतर प्रवाशांच्या गर्दीने पादचारी पूल खचाखच भरून जातो. शिवाय गर्दीच्या नियंत्रणासाठी क ोणीही नसते. याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. 

 तसेच रेल्वेस्टेशन परिसरातील हमालवाडा भागात राहणा-या नागरिकांच्या सुविधेसाठी मालधक्का ते रेल्वेस्टेशन पार्किंग असा पादचारी पूल बांधण्यात आला आहे. ये-जा करण्यासाठी रेल्वेस्टेशनवरील रुळांऐवजी हा पूल महत्त्वपूर्ण ठरतो; परंतु आजघडीला या पुलाची अवस्था वाईट आहे. जागोजागी फरशा उखडल्या आहेत, तसेच काही ठिकाणी पुलाचा स्लॅब धोकादायक अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिकांकडून त्याचा वापर टाळला जात आहे. त्यामुळे पुलाची वेळीच देखभाल-दुरुस्तीची गरज आहे. रेल्वेस्टेशनवरील दोन्ही पूल चांगल्या अवस्थेत आहेत. रेल्वेस्टेशन परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी असलेल्या पुलाची माहिती घेतली जाईल, असे रेल्वे अधिका-यांनी सांगितले.

पाय-या निसरड्या

जुन्या आणि नव्या इमारतीसमोरील पुलांवरील कठड्याच्या जाळ्या काही ठिकाणी तुटलेल्या आहेत. जुन्या इमारतीमधील पुलाच्या पाय-या काही ठिकाणी निसरड्या झाल्या आहेत. हमालवाडा परिसरात ये-जा करणा-या पुलाची तात्काळ दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी म्हणाले. 

आॅडिट करणार

सर्व रेल्वेस्टेशनवरील पादचारी पुलांवरून किती प्रवासी ये-जा करतात, याचे आॅडिट केले जाणार आहे. त्यातून पादचारी पुलांची रुंदी वाढविण्याची आवश्यकता आहे का, याचा आढावा घेतला जाईल. आजघडीला केवळ नांदेड, परभणी येथील पादचारी पूल रुंद करण्याची आवश्यकता आहे.-डॉ. ए. के. सिन्हा, विभागीय व्यवस्थापक, नांदेड, दमरे