शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
4
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
5
"मुख्यमंत्रिपदावर मी नको होतो म्हणून मला..," फडणवीसांच्या आरोपांनंतर एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
7
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
8
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
9
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
10
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
11
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
12
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
13
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
14
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
15
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?
16
काँग्रेसच्या नेत्याने कार्यक्रमात म्हटलं बांगलादेशचं राष्ट्रगीत, भाजपा आक्रमक, काँग्रेसनं दिलं असं प्रत्युत्तर
17
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
18
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
19
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
20
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई

उड्डाणपुलांवरील रस्त्याचा थर उखडून नव्याने करा डांबरीकरण; औरंगाबाद खंडपीठाने खडसावले

By प्रभुदास पाटोळे | Updated: November 23, 2022 12:36 IST

खंडपीठाने काम पूर्ण करण्यासाठी २१ डिसेंबरची ‘डेडलाइन’ दिली आहे

औरंगाबाद : शहरातील उड्डाणपुलांवरील डांबरीकरणाचे थर आधी उकरून काढा. त्यानंतर एकाच थरात (लेअर) २१ डिसेंबरपर्यंत नव्याने डांबरीकरण करा. त्यासह उड्डाणपुलांलगतच्या रस्त्यांचे कामही वरील कालावधीतच पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. संजय देशमुख यांनी दिले.

संबंधित पुलांची दुरुस्ती एका थरात (लेअरमध्ये) करण्याची सूचना शासकीय अभियांत्रिकी विभागाच्या तज्ज्ञ समितीने केली असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले. उड्डाणपुलांची जबाबदारी ज्या विभागांकडे आहे, त्यांनी दुरुस्तीसाठी तत्काळ कारवाई करावी, असे निर्देश खंडपीठाने दिले. त्याचबरोबर शिवाजीनगर येथील प्रस्तावित रेल्वे भुयारी मार्गासंबंधी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि रेल्वेच्या विभागाने निधी आणि नकाशा बनविण्यासंदर्भात पुढील सुनावणीवेळी माहिती द्यावी, असेही निर्देश खंडपीठाने दिले.

शहरातील खड्डेमय रस्त्यासंबंधी ॲड. रुपेश जैस्वाल यांनी दाखल केलेली पार्टी इन पर्सन याचिका मंगळवारी (दि. २२) सुनावणीस निघाली. राज्य शासनाच्या वतीने औरंगाबाद-नगर रस्त्यावरील गोलवाडी उड्डाणपुलाच्या कामाची सविस्तर माहिती खंडपीठासमोर सादर करण्यात आली. खंडपीठाने कामाबद्दल समाधान व्यक्त केले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे सांगून, दोन सर्वेक्षण क्रमांकांमधील दोन मालमत्ताचे संपादन करायचे आहे. एक वर्षाच्या संपादन प्रक्रियेपूर्वीच कार्यवाही पूर्ण होईल, असे अतिरिक्त सरकारी वकील सुजित कार्लेकर यांनी खंडपीठात निवेदन केले.

संपादनाची प्रक्रिया सुरू असतानाच रेल्वे आपल्या हिश्शाचे काम सुरू करू शकते. रेल्वेला संबंधित भुयारी मार्गाचे डिझाईन तयार करून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात काहीच अडचण नसल्याचे ॲड. कार्लेकर यांनी सांगितले. रेल्वेच्या वतीने ॲड. मनिष नावंदर यांनी खंडपीठात निवेदन करताना सा. बां. विभागाने आम्हाला निधी आणि नकाशा उपलब्ध करून द्यावा. संबंधित नकाशा दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेल्या सिकंदराबाद येथे पाठविला जातो. सिकंदराबाद येथून त्यासंबंधी पडताळणी केली जाते. मान्यता प्रदान केल्यानंतर संयुक्त सर्वेक्षण होते. त्यानंतर निविदा प्रक्रियेला प्रारंभ केला जातो, असे निवेदन केले.पार्टी इन पर्सन म्हणून ॲड. रूपेश जैस्वाल, मनपाच्या वतीने ॲड. राजेंद्र देशमुख, एमएसआरडीसी ॲड. श्रीकांत अदवंत, एनएचए तर्फे ॲड. दीपक मनोरकर यांनी काम पाहिले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ