शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

उड्डाणपुलांवरील रस्त्याचा थर उखडून नव्याने करा डांबरीकरण; औरंगाबाद खंडपीठाने खडसावले

By प्रभुदास पाटोळे | Updated: November 23, 2022 12:36 IST

खंडपीठाने काम पूर्ण करण्यासाठी २१ डिसेंबरची ‘डेडलाइन’ दिली आहे

औरंगाबाद : शहरातील उड्डाणपुलांवरील डांबरीकरणाचे थर आधी उकरून काढा. त्यानंतर एकाच थरात (लेअर) २१ डिसेंबरपर्यंत नव्याने डांबरीकरण करा. त्यासह उड्डाणपुलांलगतच्या रस्त्यांचे कामही वरील कालावधीतच पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. संजय देशमुख यांनी दिले.

संबंधित पुलांची दुरुस्ती एका थरात (लेअरमध्ये) करण्याची सूचना शासकीय अभियांत्रिकी विभागाच्या तज्ज्ञ समितीने केली असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले. उड्डाणपुलांची जबाबदारी ज्या विभागांकडे आहे, त्यांनी दुरुस्तीसाठी तत्काळ कारवाई करावी, असे निर्देश खंडपीठाने दिले. त्याचबरोबर शिवाजीनगर येथील प्रस्तावित रेल्वे भुयारी मार्गासंबंधी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि रेल्वेच्या विभागाने निधी आणि नकाशा बनविण्यासंदर्भात पुढील सुनावणीवेळी माहिती द्यावी, असेही निर्देश खंडपीठाने दिले.

शहरातील खड्डेमय रस्त्यासंबंधी ॲड. रुपेश जैस्वाल यांनी दाखल केलेली पार्टी इन पर्सन याचिका मंगळवारी (दि. २२) सुनावणीस निघाली. राज्य शासनाच्या वतीने औरंगाबाद-नगर रस्त्यावरील गोलवाडी उड्डाणपुलाच्या कामाची सविस्तर माहिती खंडपीठासमोर सादर करण्यात आली. खंडपीठाने कामाबद्दल समाधान व्यक्त केले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे सांगून, दोन सर्वेक्षण क्रमांकांमधील दोन मालमत्ताचे संपादन करायचे आहे. एक वर्षाच्या संपादन प्रक्रियेपूर्वीच कार्यवाही पूर्ण होईल, असे अतिरिक्त सरकारी वकील सुजित कार्लेकर यांनी खंडपीठात निवेदन केले.

संपादनाची प्रक्रिया सुरू असतानाच रेल्वे आपल्या हिश्शाचे काम सुरू करू शकते. रेल्वेला संबंधित भुयारी मार्गाचे डिझाईन तयार करून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात काहीच अडचण नसल्याचे ॲड. कार्लेकर यांनी सांगितले. रेल्वेच्या वतीने ॲड. मनिष नावंदर यांनी खंडपीठात निवेदन करताना सा. बां. विभागाने आम्हाला निधी आणि नकाशा उपलब्ध करून द्यावा. संबंधित नकाशा दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेल्या सिकंदराबाद येथे पाठविला जातो. सिकंदराबाद येथून त्यासंबंधी पडताळणी केली जाते. मान्यता प्रदान केल्यानंतर संयुक्त सर्वेक्षण होते. त्यानंतर निविदा प्रक्रियेला प्रारंभ केला जातो, असे निवेदन केले.पार्टी इन पर्सन म्हणून ॲड. रूपेश जैस्वाल, मनपाच्या वतीने ॲड. राजेंद्र देशमुख, एमएसआरडीसी ॲड. श्रीकांत अदवंत, एनएचए तर्फे ॲड. दीपक मनोरकर यांनी काम पाहिले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ