शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
5
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
6
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
7
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
8
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
9
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
10
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
11
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
12
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
13
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
14
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
15
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
16
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
17
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
18
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
19
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
20
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

वडगावात रस्त्यावर साचले सांडपाण्याचे तळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 11:33 PM

शिवाजीनगरात शनिवारी चेंबर तुंबून नागरी वसाहतीतील मुख्य चौकात सांडपाण्याचे तळे साचले.

वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपंचायतीकडून नियमित नालेसफाई केली जात नसल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. शिवाजीनगरात शनिवारी चेंबर तुंबून नागरी वसाहतीतील मुख्य चौकात सांडपाण्याचे तळे साचले. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान, ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर ग्रामपंचायतीने चेंबर सफाईचे काम सुरु केले.

येथील नागरी वसाहतीत ड्रेनज व सांडपाणी वाहून जाण्यासाठी भूमिगत गटारीची सोय करण्यात आली आहे. मात्र, स्थानिक प्रशासनाकडून चेंबरची नियमित सफाई केली जात नाही. चेंबरमध्ये अडकलेल्या कचरा व मतीमुळे सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. वारंवार चेंबर तुंबून सांडपाणी नागरिकांच्या घरासमोर साचत आहे.

घाणीमुळे साथीचे आजार जडत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याविषयी अनेकवेळा सांगून याकडे ग्रामपंचायत लक्ष देत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. संविधान चौकात शनिवारी चेंबर तुंबून सांडपाणी रस्त्यावर आले. महिला व लहान मुलांना तर घाण पाण्यातूनच ये-जा करावी लागली.

नागरिकांची ओरड सुरु होताच ग्रामपंचायतीने चेंबर सफाईचे काम हाती घेवून कामाला सुरुवात केली. कर्मचाऱ्यांकडून दुपारपर्यंत सफाईचे काम सुरु होते. सारखाच सांडपाण्याचा त्रास असल्याने आरोग्यविषयक समस्येला तोंड द्यावे लागत असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.

टॅग्स :Walujवाळूजwater pollutionजल प्रदूषण