शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

मध्य रेल्वेचा अजब कारभार; रात्री ८ वाजेची औरंगाबाद-मुंबई रेल्वे आज सकाळी ७ वाजता गेली

By संतोष हिरेमठ | Updated: January 31, 2023 12:45 IST

‘मध्य रेल्वे’कडून प्रवाशांची थट्टा, रात्रभर प्रवाशांचे हाल, सिकंदराबादहून रिकामी रेल्वे बोलविण्याची वेळ

औरंगाबाद : मध्य रेल्वे मराठवाड्यावर अन्याय करते, अशी नेहमीच ओरड होते. आता मध्य रेल्वेने पुन्हा एकदा प्रवाशांची थट्टाच केल्याचा प्रकार सोमवारी घडला. औरंगाबाद- सी.एस.एम.टी. मुंबई ही विशेष रेल्वे प्रवासाच्या काही तास आधी रात्री ८ वाजेऐवजी ६ तास उशिराने पहाटे २ वाजता रवाना होणार असल्याचे मेसेज प्रवाशांना पाठविण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात रेल्वे आज सकाळी ७ वाजता रवाना झाली. संपूर्ण प्रवासाचे नियोजनच विस्कळीत झाल्याने प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.

मध्य रेल्वेने प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन ‘ट्रेन्स ऑन डीमांड’ श्रेणीत विशेष रेल्वेच्या फेऱ्या जाहीर केल्या. यात औरंगाबाद- सी.एस.एम.टी. मुंबई विशेष रेल्वे सोमवारी रात्री ८ वाजता सोडण्यात येणार होती. सलग सुट्यांमुळे मुंबईला जाणाऱ्या प्रत्येक रेल्वेचे आरक्षण फुल होते. या विशेष रेल्वेमुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना आधार मिळाला. परंतु प्रवासाच्या काही तास आधीच रेल्वे सुटण्याची वेळ बदलल्याचे मेसेज प्रवाशांना येऊन धडकले. अनेक प्रवासी स्टेशनवर पोहोचले होते, तर काही रस्त्यात होते.

मुंबईहून येणार होती रिकामी रेल्वे, पण...या विशेष रेल्वेसाठी मुंबईहून रिकामी रेल्वे (रॅक) येणार होती. परंतु ऐनवेळी सिकंदराबादहून जवळपास १७ बोगींची रिकामी रेल्वे मागविण्याची वेळ ओढवल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

रेल्वे तब्बल ११ तास उशिरा ही विशेष रेल्वे रात्री ८ वाजता रवाना झाल्यानंतर पहाटे ३.५० वाजता मुंबईला पोहोचणार होती. त्यामुळे मुंबईत जाऊन प्रवाशांना नियमित कामे प्रवाशांना करता येणार होती. परंतु वेळ बदलली आणि मुंबई पोहोचण्याच्या वेळे पेक्षाही तीन तास नंतर सकाळी ७ वाजता ही रेल्वे औरंगाबादहून रवाना झाली. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशनtourismपर्यटन