शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

मध्य रेल्वेचा अजब कारभार; रात्री ८ वाजेची औरंगाबाद-मुंबई रेल्वे आज सकाळी ७ वाजता गेली

By संतोष हिरेमठ | Updated: January 31, 2023 12:45 IST

‘मध्य रेल्वे’कडून प्रवाशांची थट्टा, रात्रभर प्रवाशांचे हाल, सिकंदराबादहून रिकामी रेल्वे बोलविण्याची वेळ

औरंगाबाद : मध्य रेल्वे मराठवाड्यावर अन्याय करते, अशी नेहमीच ओरड होते. आता मध्य रेल्वेने पुन्हा एकदा प्रवाशांची थट्टाच केल्याचा प्रकार सोमवारी घडला. औरंगाबाद- सी.एस.एम.टी. मुंबई ही विशेष रेल्वे प्रवासाच्या काही तास आधी रात्री ८ वाजेऐवजी ६ तास उशिराने पहाटे २ वाजता रवाना होणार असल्याचे मेसेज प्रवाशांना पाठविण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात रेल्वे आज सकाळी ७ वाजता रवाना झाली. संपूर्ण प्रवासाचे नियोजनच विस्कळीत झाल्याने प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.

मध्य रेल्वेने प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन ‘ट्रेन्स ऑन डीमांड’ श्रेणीत विशेष रेल्वेच्या फेऱ्या जाहीर केल्या. यात औरंगाबाद- सी.एस.एम.टी. मुंबई विशेष रेल्वे सोमवारी रात्री ८ वाजता सोडण्यात येणार होती. सलग सुट्यांमुळे मुंबईला जाणाऱ्या प्रत्येक रेल्वेचे आरक्षण फुल होते. या विशेष रेल्वेमुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना आधार मिळाला. परंतु प्रवासाच्या काही तास आधीच रेल्वे सुटण्याची वेळ बदलल्याचे मेसेज प्रवाशांना येऊन धडकले. अनेक प्रवासी स्टेशनवर पोहोचले होते, तर काही रस्त्यात होते.

मुंबईहून येणार होती रिकामी रेल्वे, पण...या विशेष रेल्वेसाठी मुंबईहून रिकामी रेल्वे (रॅक) येणार होती. परंतु ऐनवेळी सिकंदराबादहून जवळपास १७ बोगींची रिकामी रेल्वे मागविण्याची वेळ ओढवल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

रेल्वे तब्बल ११ तास उशिरा ही विशेष रेल्वे रात्री ८ वाजता रवाना झाल्यानंतर पहाटे ३.५० वाजता मुंबईला पोहोचणार होती. त्यामुळे मुंबईत जाऊन प्रवाशांना नियमित कामे प्रवाशांना करता येणार होती. परंतु वेळ बदलली आणि मुंबई पोहोचण्याच्या वेळे पेक्षाही तीन तास नंतर सकाळी ७ वाजता ही रेल्वे औरंगाबादहून रवाना झाली. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशनtourismपर्यटन