शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेचा अजब कारभार; रात्री ८ वाजेची औरंगाबाद-मुंबई रेल्वे आज सकाळी ७ वाजता गेली

By संतोष हिरेमठ | Updated: January 31, 2023 12:45 IST

‘मध्य रेल्वे’कडून प्रवाशांची थट्टा, रात्रभर प्रवाशांचे हाल, सिकंदराबादहून रिकामी रेल्वे बोलविण्याची वेळ

औरंगाबाद : मध्य रेल्वे मराठवाड्यावर अन्याय करते, अशी नेहमीच ओरड होते. आता मध्य रेल्वेने पुन्हा एकदा प्रवाशांची थट्टाच केल्याचा प्रकार सोमवारी घडला. औरंगाबाद- सी.एस.एम.टी. मुंबई ही विशेष रेल्वे प्रवासाच्या काही तास आधी रात्री ८ वाजेऐवजी ६ तास उशिराने पहाटे २ वाजता रवाना होणार असल्याचे मेसेज प्रवाशांना पाठविण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात रेल्वे आज सकाळी ७ वाजता रवाना झाली. संपूर्ण प्रवासाचे नियोजनच विस्कळीत झाल्याने प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.

मध्य रेल्वेने प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन ‘ट्रेन्स ऑन डीमांड’ श्रेणीत विशेष रेल्वेच्या फेऱ्या जाहीर केल्या. यात औरंगाबाद- सी.एस.एम.टी. मुंबई विशेष रेल्वे सोमवारी रात्री ८ वाजता सोडण्यात येणार होती. सलग सुट्यांमुळे मुंबईला जाणाऱ्या प्रत्येक रेल्वेचे आरक्षण फुल होते. या विशेष रेल्वेमुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना आधार मिळाला. परंतु प्रवासाच्या काही तास आधीच रेल्वे सुटण्याची वेळ बदलल्याचे मेसेज प्रवाशांना येऊन धडकले. अनेक प्रवासी स्टेशनवर पोहोचले होते, तर काही रस्त्यात होते.

मुंबईहून येणार होती रिकामी रेल्वे, पण...या विशेष रेल्वेसाठी मुंबईहून रिकामी रेल्वे (रॅक) येणार होती. परंतु ऐनवेळी सिकंदराबादहून जवळपास १७ बोगींची रिकामी रेल्वे मागविण्याची वेळ ओढवल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

रेल्वे तब्बल ११ तास उशिरा ही विशेष रेल्वे रात्री ८ वाजता रवाना झाल्यानंतर पहाटे ३.५० वाजता मुंबईला पोहोचणार होती. त्यामुळे मुंबईत जाऊन प्रवाशांना नियमित कामे प्रवाशांना करता येणार होती. परंतु वेळ बदलली आणि मुंबई पोहोचण्याच्या वेळे पेक्षाही तीन तास नंतर सकाळी ७ वाजता ही रेल्वे औरंगाबादहून रवाना झाली. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशनtourismपर्यटन