प्रवेशासाठी पालकांचे जागते रहो...

By Admin | Updated: May 21, 2014 00:48 IST2014-05-21T00:37:22+5:302014-05-21T00:48:37+5:30

नांदेड : उन्हाळी सुट्या संपत आल्या़ त्यामुळे सगळीकडे शाळांतील प्रवेशासाठी पालकवर्गाची धांदलघाई सुरु आहे़

Stay awake about parents for admission ... | प्रवेशासाठी पालकांचे जागते रहो...

प्रवेशासाठी पालकांचे जागते रहो...

नांदेड : उन्हाळी सुट्या संपत आल्या़ त्यामुळे सगळीकडे शाळांतील प्रवेशासाठी पालकवर्गाची धांदलघाई सुरु आहे़ चांगल्या शाळेत प्रवेशाच्या धडपडीत काही पालकांनी तर दोन-दोन दिवसांची रजाही टाकली असून दुसर्‍या दिवशी मिळणार्‍या बालवाडीच्या प्रवेशअर्जासाठी आदल्या दिवशी पहाटेपासूनच पालकांनी रांग लावली होती़ तर काहींनी विद्येच्या मंदिराबाहेरच जागरण केले़ यंदा शाळांतील प्रवेश वाढविण्यासाठी मनपा प्रशासनाने तयारी केली आहे़ त्यासाठी मुख्याध्यापकांना सर्वेक्षणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ गतवर्षी मनपाच्या शाळाही हाऊसफुल्ल झाल्या होत्या़ त्यामुळे यंदाही प्रवेश वाढतील अशी प्रशासनाला अपेक्षा आहे़ तर दुसरीकडे खाजगी शाळांची प्रवेश प्रक्रिया मात्र सुरु झाली आहे़ शहरातील काही नामवंत शाळांमध्ये बालवाडी व पहिल्या वर्गाचे प्रवेशअर्ज वाटपाचे काम सध्या सुरु आहे़ आपल्या पाल्याला चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी पालकवर्गाची कितीही शुल्क द्यावयाची तयारी आहे़ त्याचबरोबर लागेबांधीलाही सध्या ऊत आला आहे़ गुजराती हायस्कुलमध्ये बालवाडीची प्रवेश प्रक्रिया बुधवारपासून सुरु होणार आहे़ प्रवेशअर्जही बुधवारी सकाळी आठ वाजेपासून देण्यात येणार आहेत़ हे प्रवेश अर्ज मिळविण्यासाठी शेकडो पालकांनी मंगळवारी सकाळपासूनच शाळेबाहेर रांग लावण्यास सुरुवात केली़ ४० अशांच्या तळपत्या उन्हापासून बचाव करीत पालकवर्ग दिवसभर रांगेत उभे होते़ शाळेच्या संरक्षक भिंतीलगत लांबच लांब रांग लागलेली पहावयास मिळाली़ तर यामध्ये महिलाही मोठ्या संख्येने होत्या़ आपल्या चिमुकल्यासह त्याही रांगेला लागल्या होत्या़ शाळेच्या प्रांगणात येताच महिलांना जणू त्यांचे शाळेचे दिवस आठवले असून विरंगुळ्यासाठी त्या ह्यचंपूलह्ण खेळत असल्याचे पहावयास मिळाले़ रांगेतच बसल्या-बसल्या कुटुंबातील इतर सदस्य त्यांना अल्पोपहार, पाणी पुरवित होते़ सकाळपासून लागलेली ही रांग सायंकाळपर्यंत वाढतच गेली़ काहींनी तर रात्रीच्या जेवणाचे डबेही सोबत आणले होते़ बालवाडीच्या २५० जागा गुजराती हायस्कुलमध्ये बालवाडीच्या २५० जागा आहेत़ बालवाडी प्रवेश घेतल्यानंतर या ठिकाणी पुढील वर्गात प्रवेश मिळतो़ बालवाडीत प्रवेशासासाठी वयाची मर्यादा ४ वर्ष असून ९ हजार रुपये शुल्क आकारण्यात येत असून प्रवेशप्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे राबविण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे सचिव प्रवीणभाई पटेल यांनी दिली़ पालकांचे शाळेपुढेच जागरण दिवसभर रांगेत लागल्यानंतर पालकांनी रात्रभर शाळेपुढेच जागरण केले़ त्यासाठी घरुनच अंथरुण-पांघरुण आणले होते़ रात्रीच्या वेळी महिलांना घरी पाठवून पुरुष मंडळींनी त्यांची जागा घेतली होती़ एकमेकांचा कुठलाच परिचय नसतानाही अनेकांनी घरुन आणलेले जेवणाचे डबे आनंदाने सोबतच्यांना दिले़ तर काहींनी इतरांना थांबवून जेवणासाठी घर गाठले़ मनसेने व्यवस्थापनावर नोंदविला आक्षेप दरम्यान, गुजराती हायस्कुलच्या समोर प्रवेशासाठी उन्हातान्हात पालक रांगेत लागले होते़ त्याबद्दल मनसेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारावार यांनी आक्षेप नोंदविला़ शाळा व्यवस्थापनाने त्या ठिकाणी पालकांना थांबण्यासाठी टेन्ट किंवा इतर व्यवस्था करायला हवी होती़ त्याचबरोबर पिण्यासाठी पाणी ठेवणेही गरजेचे होते़ परंतु तशी कोणतीही व्यवस्था येथे नव्हती़ शाळेच्या बाहेर फलक लावून काही घटना घडल्यास जबाबदारीही झटकली़ बंदोबस्त वाढविला़ पालकांनी रात्री शाळेच्या समोरच मुक्काम केल्याने या भागात वजिराबाद पोलिसांनी रात्री गस्त वाढविली होती़ रांगेत महिलाही असल्याने महिला पोलिस कर्मचार्‍यांनाही पाचारण केले होते़

Web Title: Stay awake about parents for admission ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.