शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

राज्यस्तरीय इज्तेमाला उत्साहात सुरुवात; देश-विदेशातील लाखो साथींची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 22:44 IST

मागील अनेक महिन्यांपासून मुस्लिम बांधव चातकाप्रमाणे ज्या इज्तेमाची वाट पाहत होते त्याला आज सकाळी ‘फजर’च्या नमाजनंतर दिल्ली मरकजचे प्रमुख मौलाना साद साहब आणि मौलाना युसूफ कंधलवी यांच्या उपस्थितीत या सोहळ्याला सुरुवात झाली.

ठळक मुद्देलिंबेजळगाव येथे राज्यस्तरीय तीनदिवसीय तब्लिगी इज्तेमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. शनिवारी पहाटे ‘फजर’ची नमाज अदा झाल्यानंतर या भव्यदिव्य इज्तेमाला सुरुवात करण्यात आली. या राज्यस्तरीय इज्तेमासाठी देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांचे लिंबेजळगावला आगमन होत आहे.

-  मुजीब देवणीकर /शेख महेमूद 

औरंगाबाद / वाळूज महानगर : मागील अनेक महिन्यांपासून मुस्लिम बांधव चातकाप्रमाणे ज्या इज्तेमाची वाट पाहत होते त्याला आज सकाळी ‘फजर’च्या नमाजनंतर दिल्ली मरकजचे प्रमुख मौलाना साद साहब आणि मौलाना युसूफ कंधलवी यांच्या उपस्थितीत या सोहळ्याला सुरुवात झाली. इज्तेमाच्या पहिल्याच दिवशी लाखो साथींनी हजेरी लावली. उद्या इज्तेमाच्या दुसर्‍या दिवशी आणखी साथी येणार आहेत.

लिंबेजळगाव येथे राज्यस्तरीय तीनदिवसीय तब्लिगी इज्तेमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. शनिवारी पहाटे ‘फजर’ची नमाज अदा झाल्यानंतर या भव्यदिव्य इज्तेमाला सुरुवात करण्यात आली. या राज्यस्तरीय इज्तेमासाठी देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांचे लिंबेजळगावला आगमन होत आहे. मुंबई-पुणे, ठाणे, नाशिक, मालेगाव, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, जालना, सोलापूर, धुळे, परभणी, नांदेड, बीड, बुलडाणा, अकोला, सिंधुदुर्ग, औरंगाबाद आदी भागांतील, तसेच देश-विदेशातील भाविक लाखोंच्या संख्येने इज्तेमास्थळी हजर झाले आहेत. या इज्तेमाची पूर्वतयारी व इज्तेमाची ‘दावत’ देण्यासाठी राज्यभरातून निघालेल्या हजारो जमाअतच्या ‘साथी’चे इज्तेमास्थळी आगमन झाले आहे. तीन-चार दिवसांपासून शेकडो ट्रक, बसेस, जीप, कार, टेम्पो, रिक्षा, दुचाकी आदी वाहनांतून लाखोंच्या संख्येने मुस्लिम बांधव इज्तेमास्थळी पोहोचत आहेत. या इज्तेमासाठी आलेल्या मुस्लिम भाविकांसाठी संयोजकांच्या वतीने विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. इज्तेमा परिसरात चहा-नाश्ता, जेवण, शुद्ध पाणी, प्रसाधनगृह आदींची चांगली व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या इज्तेमा परिसरात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, जेवण, नाश्ता, वजूहखाने, स्वच्छतागृह, रुग्णालय, औषधी, रुग्णवाहिका, अग्निशमन बंब, तज्ज्ञ डॉक्टर्स आदींची व्यवस्था करण्यात आली असून, हजारो स्वयंसेवक इज्तेमाला येणार्‍या ‘साथी’ (भाविक) यांची खिदमत (सेवा) करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

अल्लाह व रसूलची शिकवण महत्त्वाची- हजरत मौलाना साद साहब फजरची नमाज झाल्यानंतर बयाण (प्रबोधन) करताना दिल्ली निजामुद्दीन मरकजचे हजरत मौलाना साद साहब म्हणाले की, इस्लाम धर्मात अल्लाह व रसूलची शिकवण अत्यंत महत्त्वाची आहे. जीवन हे क्षणभंगूर असल्यामुळे मृत्यूनंतर प्रत्येकाने केलेल्या पाप-पुण्याचा हिशेब द्यावा लागणार आहे. त्यामुळे जीवनात प्रत्येकाने सत्कार्य करण्याची गरज असून, पाच वेळा नमाज पढणे, कुरआनचे वाचन करणे, तसेच अल्लाहची भक्ती व अल्लाहचे शेवटचे प्रेषित (दूत) मोहंमद पैगंबर (सल्ल.) यांनी दाखविलेल्या मार्गानुसार जीवन जगण्याचा सल्ला मौलाना साद यांनी दिला. या प्रबोधन कार्यक्रमानंतर मौलाना युसूफ कंधलवी यांनीही उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन अल्लाही भक्ती, मोहंमद (सल्ल.) यांचे विचार आचरणात आणण्याचा सल्ला दिला. 

लाखो भाविकांच्या गर्दीने परिसर फुललाया राज्यस्तरीय इज्तेमासाठी दररोज शेकडो वाहनांतून मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव इज्तेमासाठी एकत्रित आले आहेत. इज्तेमाकडे येणारे रस्ते वाहनांच्या गर्दीमुळे फुलून गेले असून, ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला वाहने थांबवून स्वयंसेवक व नागरिक या भाविकांना थंडगार पाणी, खाद्यपदार्थ, थंडपेय आदींचा पाहूणचार करून त्यांचे आदरातिथ्य करताना दिसून येत आहेत. या इज्तेमास्थळी लाखो भाविकांनी गर्दी केल्यामुळे इज्तेमाचा परिसर गर्दीने फुलला. एवढा मोठा जनसमुदाय इज्तेमामुळे एकत्रित आल्याने अनेक जण भारावून गेले आहेत.

टॅग्स :Ijtema Aurangabad 2018इज्तेमा औरंगाबाद २०१८Aurangabadऔरंगाबाद