शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

रेंगाळलेल्या रेल्वे मार्गांसाठी राज्य शासनाची अर्धा खर्च करण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 23:29 IST

मराठवाड्यातील औरंगाबाद (दौलताबाद)- चाळीगाव रेल्वे मार्ग तयार झाल्यास औरंगाबाद रेल्वे मार्गावरील उत्तरेकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांचे तीन ते चार तास वाचणार आहेत.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र दौलताबाद-चाळीसगाव, रोटेगाव-कोपरगाव मार्ग

औरंगाबाद : निवडणुकीच्या तोंडावर गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेल्या प्रस्तावित दौलताबाद - चाळीसगाव रेल्वे मार्ग आणि रोटेगाव - कोपरगाव  रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी राज्य शासनाकडून ५० टक्के खर्च करण्याची तयारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी एका पत्राद्वारे रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे दर्शविली आहे. 

मराठवाड्यातील लातूर रोड ते गुलबर्गा हा रेल्वे मार्ग जोडण्यासाठी राज्याचे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मागणी केली आहे. या मागणीनूसार लातूर रोड ते गुलबर्गा जोडल्यास प्रवासाचे अंतर कमी होईल. मराठवाड्यातील औरंगाबाद (दौलताबाद)- चाळीगाव रेल्वे मार्ग तयार झाल्यास औरंगाबाद रेल्वे मार्गावरील उत्तरेकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांचे तीन ते चार तास वाचणार आहेत.  तसेच शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांसाठी तसेच दक्षिण भारतात थेट गोवा येथे जाण्यासाठी रोटेगाव-कोपरगाव हा प्रस्तावित रेल्वे मार्ग फायदेशीर ठरणारा आहे

या दोन्ही रेल्वे मागार्चे सर्वेक्षण झाले आहे. परंतु प्रत्यक्षात पुढे काहीही हालचाली होत नसल्याने दोन्ही रेल्वे मार्ग रखडले आहेत. या मार्गांबाबत मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर, प्रल्हाद पारटकर, संतोष भाटिया, चंद्रकांत मेणे, वर्धमान जैन यांनी पीएमओ कार्यालयाकडे विचारणा केली होती. सदर मार्ग रद्द झाल्याचे उत्तर बोरकर यांना देण्यात आले होते. यानंतर या मार्गांसाठी मुख्यमंत्र्यांकडे मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांनीही पाठपुरावाही केला होता. 

प्रश्न सुटण्याची शक्यताया सगळ्याचा परिणाम म्हणून मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद - चाळीसगाव आणि रोटेगाव -  कोपरगाव या दोन मार्गाशिवाय लातूररोड ते गुलबर्गा या नविन रेल्वेमार्गाची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी केली. यासाठी महाराष्ट्र शासन ५० टक्के निधी उपलब्ध करुन देईल ,असे पत्रात नमुद करण्यात आले आहे. यामुळे मराठवाड्यातील रखडलेल्या या दोन्ही रेल्वे मार्गांचा प्रश्न सुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :railwayरेल्वेState Governmentराज्य सरकारfundsनिधीMarathwadaमराठवाडा