शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

राज्य सरकारला सेवानिवृत्त ३३३ प्राध्यापकांना द्यावे लागले दीड कोटींचे व्याज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 16:40 IST

राज्य सरकारने न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची विहित मुदतीत अंमलबजावणी केली नाही. यामुळे सरकारला ३३३ प्राध्यापकांना मुळ रक्कमेसह तब्बल १ कोटी ६७ लाख ७३ हजार ५०० रूपये व्याज द्यावे लागले आहे.

- राम शिनगारे

औरंगाबाद :राज्य सरकारने न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची विहित मुदतीत अंमलबजावणी केली नाही. यामुळे सरकारला ३३३ प्राध्यापकांना मुळ रक्कमेसह तब्बल १ कोटी ६७ लाख ७३ हजार ५०० रूपये व्याज द्यावे लागले आहे. राज्य सरकारला व्याज द्यावे लागल्याची दुर्मिळ घटना घडली असून, याविषयीचा शासनादेशही निघाला आहे.

राज्य सरकारने १ जानेवारी २००६ ते ३१ आॅगस्ट २००९ या कालखंडातील सेवानिवृत्त प्राध्यापकांना ५ लाख रूपये ग्रॅच्युइटी दिली. मात्र सप्टेंबर २००९ नंतरच्या सेवानिवृत्त प्राध्यापकांना ७ लाख रूपये ग्रॅच्युइटी देण्याचा निर्णय घेतला. जानेवारी २००६ ते डिसेंबर २०१५ या कार्यकाळात सर्वांना समान वेतन आयोग होता. तरीही समान पदाच्या सेवानिवृत्तांमध्ये दुजाभाव केल्यामुळे असोशिएशन ऑफ कॉलेज अ‍ॅण्ड युनिर्व्हसिटी सुपर अ‍ॅनिएटेड टिचर्स या संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठात समान ग्रॅच्युइटी देण्याच्या मागणीसाठी २०१२ मध्ये याचिका दाखल केली. खंडपीठाने संघटनेच्या विरोधात निकाल दिल्यानंतर त्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्याठिकाणी २०१३ मध्ये संघटनेच्या बाजूने निकाल लागला. सर्व सेवानिवृत्त प्राध्यापकांना ७ लाख रूपये ग्रॅच्युटी तीन महिन्यात देण्याचे आदेश दिले. 

मात्र याची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे संघटनेतर्फे अवमान याचिका दाखल केली. तेव्हा उच्च शिक्षण विभागाचे तत्कालिन सचिव संजय कुमार यांनी बिनशर्त माफीनामा न्यायालयात सादर केला. यानंतर अंमलबजावणी झाली. असाच अन्याय झालेल्या ३३३ सेवानिवृत्त प्राध्यापकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत संघटनेतर्फे २०१४ मध्ये औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेचा निकाल ६ एप्रिल २०१६ रोजी लागला. यातही तीन महिन्यात ३३३ प्राध्यापकांना ७ लाख रुपये ग्रॅच्युटी देण्याचे आदेश दिले. येथेही दिरंगाई करण्यात आली. तेव्हा संघटनेने जितका काळ दिरंगाई करण्यात आली. त्याकाळात मुळ रकमेवर व्याज देण्याची मागणी केली. 

ही मागणी न्यायालयाने मान्य करत राज्य सरकारने सेवानिवृत्त प्राध्यापकांना व्याजासह रक्कम देण्याचे आदेश दिले. यानुसार ६ एप्रिल २०१६ ते ५ मार्च २०१८ या दिरंगाईच्या कार्यकाळात मुळे रकमेवर १ कोटी ६७ लाख ७३ हजार ५०० रुपये ऐवढे व्याज देण्याचा शासन निर्णय ५ मार्च रोजी सरकारने काढला आहे. तर उच्च शिक्षण विभाागाने १३ मार्च रोजी विभागीय कार्यालयांना संबंधित प्राध्यापकांना अतितात्काळ वेळेत व्याज अदा करण्याचा आदेश दिला आहे. मंत्रालयातील सरकारी बाबुंच्या अनास्थेमुळे राज्य सरकारला दिड कोटी रूपयांपेक्षा अधिक व्याज देण्याची नामुष्की ओढावली आहे. या प्रकरणी संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य एम.ए.वाहुळ, प्राचार्य जे. एम. मंत्री, प्राचार्य मोहम्मद शफी, प्रा.एस. बी. नाफडे आदींनी हा लढा दिला.

असे होणार व्याजाच्या पैशाचे वाटप

विभाग        प्राध्यापक    व्याजाची रक्कमऔरंगाबाद         ६१        २९,००६७०नागपूर           ११०        ४,७६,६६७जळगाव           ५०        २४,७६,१४६नांदेड                ७७        ३८,२३,०३५कोल्हापूर         २२        १२,३२,४४९सोलापूर          ३७        १८,६९,३०४पुणे                 ६७        ३५,१२,५२६पनवेल           ०५        २,९८,३७०-------------------------------------------------एकूण           ३३३        १,६५,८९,१६७

तरतुदींचा अभ्यास करुनच आदेश निघावेराज्य सरकारने निर्णय घेताना आपण बनविलेले नियम, कायदेशीर तरतुदींचा अभ्यास करुनच आदेश काढले पाहिजेत. अलिकडे शासनाचे आदेश कायद्याची आवेहलना करूनच काढले जातात. या त्रुटींमुळे आमची सेवानिवृत्तांची संघटना सरकारच्या विरोधात २८ खटले जिंकली आहे. यापुढेही सरकारने नियमानुसार काम केल्यास त्याचा ज्येष्ठांनाही त्रास होणार नाही आणि व्याज, दंड भरावे लागण्याचे प्रकारही घडणार नाहीत.- प्राचार्य एम. ए. वाहुळ, अध्यक्ष, असोशिएशन आॅफ कॉलेज अ‍ॅण्ड युनिर्व्हसिटी सुपर अ‍ॅन्युएटेड् टिचर्स संघटना

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रProfessorप्राध्यापकState Governmentराज्य सरकारAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठSupreme Courtसर्वोच्च न्यायालय