शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

'बहुमजली इमारतीला वर जाण्यास पायऱ्या,लिफ्ट नाही'; नगरनाका रेल्वे उड्डाणपुलाची अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 20:26 IST

रेल्वेचे वकील मनीष नावंदर यांनी ती छायाचित्रे आणि कामाचा थोडक्यात अहवाल न्यायालयात सादर केला.

औरंगाबाद : बहुमजली इमारत तयार झाली. मात्र, इमारतीवर जाण्यासाठी पायऱ्या अथवा उद्वाहन (लिफ्ट) नाही, अशी नगरनाका येथील रेल्वे उड्डाणपुलाची अवस्था असल्याचे गुरुवारी सुनावणी दरम्यान रेल्वेतर्फे सादर करण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या छायाचित्रांवरून निदर्शनास आले.

रेल्वेचे वकील मनीष नावंदर यांनी ती छायाचित्रे आणि कामाचा थोडक्यात अहवाल न्यायालयात सादर केला. मात्र, नगरनाका येथील रेल्वे उड्डाणपूल आणि शिवाजीनगर येथील रेल्वे भुयारी मार्गाच्या कामाची सद्यस्थिती, झालेले आणि राहिलेले काम, पूर्णत्वासाठीचा प्रस्तावित अवधी आदी तांत्रिक बाबी सविस्तरपणे न्यायालयात मांडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठतम अधिकाऱ्यांनी हजर राहण्याची अपेक्षा खंडपीठाने व्यक्त केली. या जनहित याचिकेवर शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र व्ही. घुगे आणि न्या. पानसरे यांच्या खंडपीठात सुनावणी होणार आहे.

ॲड. नावंदर यांनी खंडपीठात निवेदन केले की, नगरनाका येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. या उड्डाणपुलाला जोडणारे अहमदनगर ते औरंगाबाद आणि औरंगाबाद ते अहमदनगरकडे जाणाऱ्या रस्त्यांचे (ॲप्रोच रोड) सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात येणारे काम पूर्ण झाल्यास हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला जाऊ शकेल. अहमदनगरकडील रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून औरंगाबादकडील रस्त्याचे काम अद्याप सुरू झाले नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.शिवाजीनगर येथील रेल्वे भुयारी पुलासाठी भूसंपादन चालू असून त्याबाबतची जाहीर सूचना प्रसिद्ध झाली आहे. ज्यांची जमीन या कामासाठी संपादित केली जाणार आहे, त्यांची माहिती महापालिकेने उपलब्ध करून दिल्यास भूसंपादनाचे काम जलदगतीने होईल, असे सहायक सरकारी वकील सुजीत कार्लेकर यांनी निवेदन केले. त्यावर तशा सूचना विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांना देण्याचे ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांनी निवेदन केले. महापालिकेने येथील कामाचे ४ कोटी रुपये दिले असल्याचे ते म्हणाले. सुनावणीस याचिकाकर्ता ॲड. रुपेश जैस्वाल, रस्ते महामंडळातर्फे ॲड. एस. व्ही. अदवंत आदी उपस्थित होते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठrailwayरेल्वे