औरंगाबादच्या पर्यटन विकासाला गती द्या
By Admin | Updated: September 14, 2014 00:02 IST2014-09-13T23:59:25+5:302014-09-14T00:02:12+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात पर्यटन विकासाच्या दृष्टीने भरपूर संधी आहे. मात्र, मूलभूत असुविधांमुळे पर्यटनाची राजधानी असलेले ऐतिहासिक औरंगाबाद शहर दुर्लक्षित राहिले आहे.

औरंगाबादच्या पर्यटन विकासाला गती द्या
बारामती : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात शेतकरी संघटना रिंगणात उतरली आहे. पुणो जिल्ह्यात 5 ठिकाणी निवडणूक लढविणार, अशी घोषणा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी केली. या वेळी त्यांनी निवडणूक लढविणा:या उमेदवारांची नावे जाहीर केली.
विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पुणो येथील बैठकीत पाटील यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले, ‘‘इंदापूरमधून पांडुरंग संभाजी रायते, दौंडमधून शिवाजीराव रामभाऊ नांदखिले, शिरूरमधून बाळासाहेब जयसिंग घाडगे, आंबेगावमधून सुहास नामदेवराव काटे, तर जुन्नरमधून दिलीप गिरमे निवडणूक लढवणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी शेतकरी संघटनेने ‘आप’शी हातमिळवणी केली होती. ‘आप’ने प्रत्य़क्ष निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारदेखील उतरविले होते; मात्र, विधानसभा निवडणुकीसाठी ‘आप’ केवळ पाठिंबा देणार आहे. शेतकरी संघटनेच्या उमेदवारांचा प्रत्यक्षात प्रचार करण्यासाठीदेखील ‘आप’चे नेते सहभागी होणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे, शेतीसह सर्व प्रकारचे अनुदान थेट स्वरूपात मिळावे. त्यामुळे भ्रष्टाचार थांबेल, घराणोशाही संपुष्टात येईल. अशा विविध मुद्दय़ांवर विधानसभा निवडणूक लढविणार आहे, असे शेतकरी संघटनेतर्फे स्पष्ट करण्यात आहले. (प्रतिनिधी)