सोयाबीनवर चक्री भुंग्याचे ‘दुष्टचक्र’..!
By Admin | Updated: September 4, 2014 01:25 IST2014-09-04T00:52:34+5:302014-09-04T01:25:32+5:30
एस़ आऱ मुळे , शिरूर अनंतपाळ तालुक्यात गेली आठ-दहा दिवसांपासून पाऊस कमी आणि ढगाळ वातावरण अधिक, असा प्रकार सुरू असल्याने सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव तर वाढला आहेच,

सोयाबीनवर चक्री भुंग्याचे ‘दुष्टचक्र’..!
एस़ आऱ मुळे , शिरूर अनंतपाळ
तालुक्यात गेली आठ-दहा दिवसांपासून पाऊस कमी आणि ढगाळ वातावरण अधिक, असा प्रकार सुरू असल्याने सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव तर वाढला आहेच, त्याचबरोबर चक्री भुंग्याचे ‘दुष्टचक्र’ सुरू झाल्याने सोयाबीनची उभी पिके कोलमडून पडत असल्याने फवारणीचा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक ताण वाढला असून, कर्ज काढून फवारणी करण्याची वेळ आली आहे.
शिरूर अनंतपाळ तालुका सोयाबीन उत्पादनात मराठवाड्यात अव्वल आल्यापासून तालुक्यात सोयाबीनची पेरणी सर्वाधिक होत असून, चालू खरीप हंगामात २८ हजार ५०० हेक्टर्स लागवडी क्षेत्रापैकी १७ हजार ६५६ हेक्टर्सवर सोयाबीनची लागवड झाली आहे. पेरणीनंतर दोन महिने पावसाने मोठा ताण दिला. त्यामुळे सोयाबीनचे उभे पीक करपले. परंतु, आॅगस्ट अखेरीस पावसाला सुरुवात झाली तरी शिरूर अनंतपाळ तालुक्यात पाऊस कमी आणि ढगाळ वातावरणच अधिक असा प्रकार गेली आठ-दहा दिवसांपासून सुरू असल्याने अगोदरच करपलेल्या सोयाबीनचे निम्मे उत्पादन घटले असून, थोडीफार फळधारणा झाली असली, तरी त्यावर पाने गुंडाळणाऱ्या अळीसह चक्रीभुंग्याच्या दुष्टचक्राची लागण झाली आहे. त्यामुळे सोयाबीनचे सशक्त पीक तात्काळ अशक्त होत आहे. परिणामी थोडेफार तरी उत्पादन पदरी पडेल, अशी अपेक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अपेक्षाभंग झाल्या आहेत.
रोगाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने आणि पावसाची रिमझिम सुरू असल्याने किटकनाशक सेव्हर आणि घटकद्रव्य अशी तिहेरी फवारणी करावी लागत असल्यामुळे खर्च वाढला असून, कर्ज काढण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक ताण वाढला आहे.
४चक्री भुंग्याच्या दुष्टचक्राबाबत तालुका कृषी अधिकारी बी.बी. सुतार, अनंत गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ट्रायजोफास किंवा प्रोफोनोफॉस याची फवारणी करण्याचा उपाय असल्याचेही त्यांनी सांगितले. एकंदर, शेतकऱ्यांच्या मागे दुष्टचक्र लागले असल्याचे दिसून येत आहे.