रिमझिम पावसातही पेरणीची सरासरी पार !
By Admin | Updated: July 25, 2014 00:28 IST2014-07-24T23:29:45+5:302014-07-25T00:28:33+5:30
दिनेश गुळवे , बीड गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील काही भागात झालेला पाऊस व तीन दिवसांपासून काही ठिकाणी पडत असलेला रिमझिम पाऊस यामुळे जिल्ह्यात आता खरीपाच्या पेरणीने सरासरी ओलांडली आहे.

रिमझिम पावसातही पेरणीची सरासरी पार !
दिनेश गुळवे , बीड
गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील काही भागात झालेला पाऊस व तीन दिवसांपासून काही ठिकाणी पडत असलेला रिमझिम पाऊस यामुळे जिल्ह्यात आता खरीपाच्या पेरणीने सरासरी ओलांडली आहे. धान्य तर पेरले आता शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यात यावर्षी पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला तरी पाऊसाने हुलकावणी दिली आहे. अजुनही जिल्ह्यात केवळ ११० ते १३० मि.मी. पाऊस पडलेला आहे. पावसाची ही सरासरी अत्यंत अल्प आहे. असे असले तरी जो काही पाऊस झाला, त्यावरच शेतकऱ्यांनी चाड्यावर मूठ ठेवली आहे.
जिल्ह्यात खरीप पेरणीचे ५ लाख ६२ हजार ७०० हेक्टर क्षेत्र आहे. गेल्यावर्षी २४ जुलै पर्यंत जिल्ह्यात तब्बल ७ लाख ६१ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. तर यावर्षी आतापर्यंत ६ लाख २१ हजार ४०० हेक्टरवर पेरणी झाली असल्याचे तंत्र अधिकारी पी. बी. बनसावीडे यांनी सांगितले. पेरणीचा हा आकडा सरासरी पेक्षा अधिक असला तरी आवश्यक त्या प्रमाणात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. गेल्यावर्षीपेक्षा यावषी २४ जुलैपर्यंत जवळपास एक लाख हेक्टरवर कापसाचे क्षेत्र कमी आहे.
कापसासह सोयाबीन, बाजरी, ज्वारी, तूर आदी पिकांचा पेराही यावर्षी पावसाअभावी कमालीचा घटला आहे. बाजरी, ज्वारी या पिकांचा पेरा घटल्याने धान्य उत्पादन तर घटणारच आहे, शिवाय जनावरांसाठी कडबाही उपलब्ध होणार नसल्याचे मत शेतकरी गंगाधर तळेकर यांनी व्यक्त केले.
गेवराई, माजलगाव, शिरूर, वडवणी या परिसरात पावच अगदीच अत्यल्प आहे. जिल्ह्याच्या सरासरीने जरी शंभरी ओलांडली असली तरी काही तालुक्याने अद्याप ५० मि.मी. ही पाऊस झालेला नाही. त्यामुळे त्या-त्या तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट निर्माण झाले असल्याचे दिसून येत आहे़
पेरा आणखी वाढण्याची शक्यता
पीक२०१४२०१३
कापूस३३८९००४१०४००
ज्वारी१३१००१९७००
बाजरी७४२००९२४००
मका६७००१४३००
तूर३१४००४०७००
मूग७४००१३९००
उडीद७५००१५१००
सोयाबिन१३२९९९१३३४००
भुईमूग१६८१४२००
सूर्यफूल३२९८००
तीळ१५३८२१००
कारळ३४५९००
भात३००७००
जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी आर. एस. भताने म्हणाले की, आतापर्यंत पाऊस गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असला, तरी येत्या काही दिवसांमध्ये खरिपाच्या पेरणीचे क्षेत्र आणखी वाढेल, अशी अपेक्षा आहे.
ज्या शेतकऱ्याने पेरा केलेला आहे, त्यांनी पीक विमाही भरावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
१०० मि़मी़ पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करु नयेत, असे आवाहन भताने यांनी केले आहे़