शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी मी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
3
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
4
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
5
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
6
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
7
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
8
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
9
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
10
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
11
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
12
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
13
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
14
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
15
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
16
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
17
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
18
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
19
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर

'काहीजण चुकीचं विधानं करत आहेत, सर्वांनी शांतता पाळावी'; ठाकरे गटाच्या नेत्यावरुन देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 12:53 PM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत, शातंता राखण्याचे आवाहन चुकीची विधानं न करण्याचे आवाहन केलं आहे. 

काल रात्री छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरातील राम मंदिराजवळ परिसरात काही समाज कंटकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन गटात दगडफेक झाली. यावेळी पोलिसांच्या गाड्याही जाळण्यात आल्या. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत, शातंता राखण्याचे आवाहन चुकीची विधानं न करण्याचे आवाहन केलं आहे. 

काल मध्यरात्री अचानक सुरू झालेल्या गोंधळामुळे पोलीस यंत्रणेवर ताण आला. या गोंधळात पोलिसांच्या गाड्याही जाळण्यात आली आहेत. पोलिसांनी तातडीने परिस्थिती हाताळली. पहाटे पाच वाजेपर्यंत पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणली. या घटनेनंतर आज राजकीय वर्तुळातून आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी सरकारवर आरोप केले. यावरुन आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.  

छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटांत वादानंतर शांतता; दगडफेक, पोलिसांच्या गाड्याही जाळल्या

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, संभाजीनगरमध्ये घडलेली घटना ही दुर्देवी आहे, आता तिथे शांतता प्रस्थापीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही नेत्यांकडून भडकवणारे स्टेटमेंट देण्याचे काम सुरू आहे. अशा परिस्थीतीत नेत्यांनी कसे वागले पाहिजे हे समजले पाहिजे, सर्वांनी शांतता पाळावी, ही सर्व नेत्यांची जबाबदारी आहे, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले. आता पोलीस गुन्हा दाखल करुन आरोपींना ताब्यात घेत आहेत, असंही फडणवीस म्हणाले. 

पालकमंत्री भुमरे यांनी केले आवाहन

काल झालेल्या वादातून त्याठिकाणी दहा ते बारा गाड्यांची जाळपोळ करण्यात आली, या ठिकाणी भुमरे यांनी भेट देत पाहणी केली. कोणी दोषी आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे यावेळी भुमरे यांनी सांगितले. पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणलेली आहे तरी जनतेने शांतता ठेवावी आणि रामनवमी पार पाडावी. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कारवाई होईलच परंतु आज आपण सर्वांनी शांतता पाळून शांततेत सणउत्सव पार पाडावेत, असंही पालकमंत्री भुमरे म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा