शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

गुंतागुंतीच्या काळात समाज संभ्रमित, त्यामुळे नायक कोण? हा दिग्दर्शकांसमोर पेच: जावेद अख्तर

By राम शिनगारे | Updated: January 4, 2024 12:53 IST

संभ्रमित समाजासोबतच दिग्दर्शकही नायकाच्या शोधात; पद्मभूषण जावेद अख्तर यांचे प्रतिपादन

छत्रपती संभाजीनगर : पूर्वीच्या काळी नायक कोण आणि खलनायक कोण आहे, याबद्दल समाजाची भूमिका स्पष्ट होती. परंतु, आजच्या गुंतागुंतीच्या काळात समाजाचीच भूमिका संभ्रमित असल्यामुळे नायक कोण असायला हवा हा दिग्दर्शकांसमोर मोठा पेच आहे, असे प्रतिपादन प्रख्यात गीतकार, संवादलेखक पद्मभूषण जावेद अख्तर यांनी केले.

नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक आर. बाल्की यांच्या हस्ते एमजीएम संस्थेतील रुक्मिणी सभागृहात बुधवारी (दि.३) सायंकाळी झाले. यावेळी जावेद अख्तर बोलत होते. यावेळी दिग्दर्शक अनुभव सिन्हा, एनएफडीसीच्या वरिष्ठ अधिकारी गौरी नायर, फिल्म सिटी मुंबईचे उपव्यवस्थापकीय संचालक संजय पाटील, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, महोत्सव संचालक अशोक राणे, कलात्मक संचालक चंद्रकांत कुलकर्णी यांची उपस्थित होती. यावेळी ‘पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कारा’ने जावेद अख्तर यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी जावेद अख्तर म्हणाले, २० वर्षांचा असताना मी मुंबईत आलो. देशातील इतर ठिकाणांपेक्षा महाराष्ट्रात साहित्य, संस्कृती, कविता, नृत्य आदी कलेचा सन्मान केला जातो. आपण वेगात प्रगती करीत आहोत. या प्रगतीची ट्रेन वेगात असून, सोबतचे सामान प्लॅटफॉर्मवरच राहिले आहे. साहित्य, संस्कृतीला प्रगतीमध्ये सोडू नये, असेही त्यांनी सांगितले. मुंबई ही व्यावसायिक असली तरी महाराष्ट्रातील इतर शहरे संस्कृती, मूल्य, नैतिकता जाेपासण्याचे काम करीत आहेत. पूर्वीच्या काळात नायक आणि खलनायक कोण, याविषयी समाजात भूमिका स्पष्ट होती. मात्र, आता समाजच संभ्रमित आहे. त्यामुळे लेखकासह दिग्दर्शकांसमोर नायक कोण आणि खलनायक कोणाला करायचे, असा संभ्रम असल्याचेही जावेद अख्तर यांनी सांगितले. दिग्दर्शक आर. बल्की व अनुभव सिन्हा यांनी भारतीय चित्रपटाच्या बदलाचा प्रवास सांगितला. चंद्रकांत कुलकर्णी यांनी महोत्सवामागील भूमिका स्पष्ट केली. अशाेक राणे यांनी महोत्सवाचा प्रवास सांगितला. अंकुशराव कदम यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक नंदकिशाेर कागलीवाल यांनी केले. कार्यक्रमाला शहरातील रसिकांची गर्दी होती.

प्रत्येकाला करोडपती बनायचंय!सध्या गरीब-श्रीमंत असे काही राहिले नाही. प्रत्येकाला करोडपती बनायचे आहे. गरिबाला श्रीमंताविषयी काही वाटत नाही. त्यालाही श्रीमंत बनायचे आहे. ही सध्याची वस्तुस्थिती असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्या काळात आम्ही लिहिले ते आता मागे वळून पाहताना विश्वास बसत नाही. पण, आम्ही लिहित गेलो, लोकांना आवडत गेले. ती लोकांची बात होती, मन की बात नव्हती, असेही जावेद अख्तर यांनी आवर्जून सांगितले.

पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानितचित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनात भारतीय चित्रपटातील योगदानाबद्दल जावेद अख्तर यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराने अंकुशराव कदम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. शाल, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप होते. यावेळी त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाचा आढावा चित्रफितीच्या माध्यमातून घेण्यात आला.

जावेद अख्तर यांची आज प्रकट मुलाखतगुरुवारी (दि.४) सायंकाळी ६ वाजता आयनॉक्स, प्रोझॉन मॉल या ठिकाणी जावेद अख्तर यांची प्रकट मुलाखत चित्रपट दिग्दर्शक जयप्रद देसाई घेणार आहेत. त्याशिवाय दुपारी २ वाजता आयनॉक्स येथेच दिग्दर्शक आर. बाल्की यांचा मास्टर क्लास होणार आहे. त्याशिवाय तीन स्क्रीन वेगवेगळ्या प्रकारचे १८ चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.

टॅग्स :Javed Akhtarजावेद अख्तरAurangabadऔरंगाबादcinemaसिनेमाSocialसामाजिकmgm campusएमजीएम परिसर