शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

...तर आमच्यासमोर आत्महत्येशिवाय दुसरा मार्ग नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 12:49 IST

यंदाचा परतीचा पाऊस आतापर्यंतचे सर्वात मोठे संकट

- प्रशांत सोळुंके 

चिंचोली लिंबाजी (जि. औरंगाबाद) : शेतीवर यापूर्वीही अनेक संकटे आली; पण परवाचा परतीचा पाऊस हे सर्वात विनाशकारी संकट ठरले. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासोबत जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न शेतकऱ्यांना सतावत असून, शासनाने विनाविलंब आर्थिक मदत करावी, नाही तर आमच्यासमोर आत्महत्येशिवाय दुसरा मार्ग नाही, अशी प्रतिक्रिया हताश झालेल्या चिंचोली लिंबाजी परिसरातील शेतकऱ्यांनी दिली.

चिंचोली लिंबाजीसह नेवपूर जा., नेवपूर खा., रेऊळगाव, वाकी, घाटशेंद्रा, वडोद, टाकळी अंतूर, तळनेर, लोहगाव, बरकतपूर, रायगाव, गणेशपूर, जामडी, दहिगाव, शेलगाव, दिगाव, खेडी आदी सुमारे २५ गावांतील शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला. संपूर्ण शेतात पाणी साचले आहे. मका, ज्वारी, बाजरीच्या कणसाला कोंब फुटले आहेत. वेचणीला आलेल्या कापसाची बोंडे काळी पडून सडू लागली आहेत. मुसळधार पावसामुळे परिसरातील शेकडो हेक्टरमधील पिके नष्ट झाली आहेत.  पूर्णपणे सडल्याने  चाऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.  

नेवपूर येथील शेतकरी संजय  सोळुंके म्हणाले की, आमच्याकडे दीड एकर जमीन आहे. त्यात अर्धी मका व अर्ध्यात कापूस लागवड केली होती. ही दोन्ही पिके  गेली. खाजगी कंपनीत नोकरी करीत होतो. मात्र, आर्थिक मंदीमुळे ते कामही गेले. मागील वर्षी कर्ज काढून मुलीचे लग्न केले. आता ते कसे फेडावे, असे सांगत असताना त्यांचे डोळे पाणावले.

चिंचोली लिंबाजी येथील शेतकरी लक्ष्मण पंडित पवार यांची तीन एकर मका, त्यांचे भाऊ माधवराव पंडित यांची दीड एकर मका व दिगांबर बारकू गोरे यांची एक एकरातील मका परतीच्या पावसाने वाया गेली. ‘आम्ही शेतीमध्ये अनेक वेळा नैसर्गिक संकटे अनुभवली; पण हे संकट सर्वात भीषण ठरले. सरकारने आम्हाला तात्काळ आर्थिक मदत देऊन शेतीला उभारी द्यावी; अन्यथा आम्हा शेतकऱ्यांसमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही’, असे हताश होऊन हे शेतकरी म्हणाले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊसAurangabadऔरंगाबाद