शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

... तर बीडमधील मराठा रस्त्यावर उतरेल; जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 16:24 IST

मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू असताना काही ठिकाणी मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं

मुंबई - मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तत्पूर्वी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना ओबीसी नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. ओबीसी नेत्यांच्या हट्टीपणामुळेच मराठा आणि ओबीसी बांधवांमध्ये संभ्रम होत असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यानंतर, आज जरांगे पाटील चितेपिंपळ येथे आले होते. त्यावेळी त्यांच्यावर फुलांची उधळण करत जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी गाडीच्या टपावर उभे राहूनच लोकांशी संवाद साधला. दरम्यान, बीडमधील मराठा समाजाच्या तरुणांना विनाकारण अडवलं जात असल्याचंही ते म्हणाले. 

मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू असताना काही ठिकाणी मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यातूनच, बीडमध्ये हिंसाचाराच्या घटनाही घडल्या. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घर व कार्यालयात जाळपोळ करण्यात आली होती. तसेच, काही नेत्यांच्या गाड्याही आंदोलकांनी अडवल्या होत्या. मात्र, जाळपोळ करणारे मराठा समाजाचे आंदोलक नाहीत, असा दावा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात येत आहे. तसेच, मराठा समजातील तरुणांना नाहक अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचंही जरांगे यांनी म्हटले. याप्रकरणी, बीडमधील मराठा समाजाच्या युवकांवर होणारा अन्याय थांबवा, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, त्यांना नाहक अडकवलं जात आहे, ते सरकारने थांबवावे. अन्यथा बीडमधील मराठा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.  

मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी बीडच्या प्रकरणात लक्ष्य घालावे. बीडच्या घटनेचं राजकारण होत असून गोरगरिबांची पोरं गुंतवली जात आहेत. दोन दिवसांत हे थांबवा, अन्यथा दोन दिवसांत बीडमधील मराठा समाज रस्त्यावर उतरणार आहे, पुन्हा तुमच्याच अधिकाऱ्यांमुळे कायदा व सुव्यवस्था भंग होऊ नये ही माझी तुम्हाला विनंती आहे, असा इशाराच जरांगे पाटील यांनी सरकारला दिला. 

दहा दिवसांनंतर उपोषणस्थळी

वडीगोद्री (जि. जालना) : छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे दहा दिवसांनी रविवारी सायंकाळी अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी दाखल झाले. अंतरवालीतील उपोषणस्थळी जरांगे पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच एका घरी लक्ष्मीपूजनही केले. 

भुजबळांवर निशाणा 

मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांची अंबडमध्ये जाहीर सभा नियोजित आहे. यावर जरांगे म्हणाले की, ओबीसी समाजालाच वाटते की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. केवळ ओबीसी नेते मराठा समाजाविरोधात विष पसरवीत आहेत. ओबीसी नेत्यांनी जाती-जातींमध्ये भांडण लावू नये.  

गावातील बोर्ड फाडल्यावरुन इशारा

जरांगे यांनी मराठा समाजाला एकजुटीचे आवाहनही केले. ते म्हणाले की, गावात यायचे असेल तर येऊ द्या; पण बोर्ड फाडून यायचे नाही. इथून पुढे जर प्रवेशबंदीचा बोर्ड फाडला तर महाराष्ट्रातील मराठे आम्ही तुमच्या मागे लागू. आमच्या नादी लागू नका. 

बीडमध्ये पोलिसांकडून धरपकड

बीडमधील जाळपोळ प्रकरणात पोलिसांकडून ३०७ सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी आरोपींची ओळख पटवत त्यांना अटक करण्याची मोहीम राबवली आहे. ज्यात आतापर्यंत १८१ जणांना बेड्या ठोकण्यात आले आहे. अजूनही पोलिसांची धरपकड सुरूच आहे. ऐन दिवाळीत पोलिसांची धरपकड सुरु असल्याने अनेकांनी शहर सोडले आहे. मात्र, या सर्व आरोपींना शोधून इतर जिल्ह्यात जाऊन पोलीस त्यांना ताब्यात घेत आहे. 

टॅग्स :marathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील