शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
4
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
5
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
6
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
7
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
8
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
9
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
10
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
11
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
12
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
13
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
14
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
15
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
16
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
17
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास
18
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
19
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
20
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे

छत्रपती संभाजीनगरच्या शहर विकास आराखड्यावर आतापर्यंत ३०० आक्षेप दाखल

By मुजीब देवणीकर | Updated: March 14, 2024 15:16 IST

हरकती व सूचना मांडण्यासाठी ६० दिवसांचा कालावधी दिला.

छत्रपती संभाजीनगर : शहराचा प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केल्यानंतर नागरिकांकडून मोठ्या संख्येने आक्षेप दाखल करण्यात येत आहेत. आतापर्यंत ३०० पेक्षा अधिक आक्षेप दाखल करण्यात आले आहेत. हा आकडा आणखी बराच वाढण्याची शक्यता आहे. दाट नागरी वसाहतींमधून संभाव्य रस्ते दर्शविण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे सरकारी गायरान जमिनी बाजूला असूनही नागरिकांच्या खाजगी जमिनींवर बरीच आरक्षणे टाकली आहेत. त्यावर मोठ्या प्रमाणात सूचना-हरकती दाखल करण्यात येत आहेत.

७ मार्च रोजी मनपाच्या नगररचना विभागात प्रारूप विकास आराखड्याचे नकाशे नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले. हरकती व सूचना मांडण्यासाठी ६० दिवसांचा कालावधी दिला. आराखड्यातील जुनी आरक्षणे जशास तशी ठेवण्यात आली. महापालिकेने जुन्या आराखड्यानुसार अनेक ठिकाणी टीडीआर देऊन भूसंपादन केलेले रस्ते नवीन आराखड्यातून गायब करण्यात आले. दाट लोकवस्ती, शासनाच्या घोषित स्लममधून रस्ते प्रस्तावित केले आहेत. संजयनगर (जिन्सी) भागातील दाट लोकवस्तीतून १२ मीटरचे दोन रस्ते नवीन आराखड्यात दर्शविण्यात आले आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांची झोप उडाली आहे.

प्रारूप विकास आराखड्यावर नगररचना विभागात आक्षेप स्वीकारण्यात येत आहेत. ११ मार्चपासून आक्षेप स्वीकारले जात असून, तीन दिवसांत ३०० पेक्षा अधिक आक्षेप नोंदविण्यात आले. आक्षेप नोंदविण्यासाठी संबंधित बाधित मालमत्ताधारकाचा सातबारा, आराखड्यातील नकाशाची झेरॉक्स, लाइट बिल, आधार कार्ड इ. कागदपत्रे लागतात. ही कागदपत्रे जोडून आक्षेप अर्ज दाखल करता येणार आहे. शहरातील बहुतांश भागांतील नागरिकांकडून प्रारूप विकास आराखड्यावर आक्षेप दाखल केले जात आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका